Tuesday, January 27, 2026

श्रमप्रतिष्ठेचा खरा उत्सव

श्रमप्रतिष्ठेचा खरा उत्सव प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ ध्वज, भाषणे आणि औपचारिकता नव्हे; तर भारतीय लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांचा पुनरुच्चार होय. त्या मूल्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे मूल्य म्हणजे श्रमप्रतिष्ठा. अकोले तालुक्यातील राजूर येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने सफाई कामगार महिला नंदा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून या मूल्याला प्रत्यक्ष कृतीतून उजाळा दिला आहे. समाजात आजही श्रम करणाऱ्या घटकांकडे दुय्यम नजरेने पाहिले जाते. स्वच्छता कामगारांचे योगदान रोज अनुभवत असूनही त्यांचा सन्मान करण्याची मानसिकता अद्याप विकसित झालेली नाही, ही खंत आहे. अशा परिस्थितीत एका सर्वसामान्य सफाई कामगार महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श उभा करणे, ही केवळ शालेय कृती नसून सामाजिक परिवर्तनाची ठिणगी आहे. “काम लहान-मोठे नसते, माणूस मोठा असतो” हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचे कार्य या उपक्रमातून घडले. भविष्यातील डॉक्टर, अधिकारी, अभियंते घडणाऱ्या या वर्गखोल्यांमध्ये जर आजच श्रमाचे महत्त्व रुजले, तर उद्याचा समाज अधिक समतावादी व संवेदनशील बनेल. श्रमिकांच्या सन्मानातून राष्ट्राची ताकद वाढते. स्वच्छता कामगार हे समाजाचे मूक आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कष्टांवरच आरोग्य, स्वच्छता व शिस्त टिकून आहे. अशा हातांनी राष्ट्रध्वज फडकवला जाणे, हा खऱ्या अर्थाने प्रजासत्ताकाचा विजय आहे. अकोलेतील हा उपक्रम इतर शाळा, संस्था व प्रशासनासाठी प्रेरणादायी ठरावा, हीच अपेक्षा. कारण श्रमाचा सन्मान म्हणजेच खऱ्या अर्थाने राष्ट्राचा सन्मान होय. कोट - मी साधी सफाई कामगार राजूर मधील पहाटे ५वाजता उठून साफ सफाई केली साडी बदलली व बरोबर सात वाजता राजूर येथील स्वामी समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विधालायत हजर होऊन माझे हस्ते ध्वजवंदन झाले .माझ्या श्रमाची प्रतिष्ठा मला पाहायला मिळाली दोन तप कष्ट करून मला दिलेला सन्मान मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही पंतप्रधान यांनी श्रमाला प्रतिष्ठा देऊन स्वच्छतेचा संदेश दिला ते काम मी अविरत सुरू ठेवेन,नंदाबाई पवार (सफाई कामगार)

सफाई कामगार महिला नंदाबाई च्या हस्ते ध्वजारोहण

अकोले,ता.२६:सर्वसामान्य सफाई कर्मचारी असून सुद्धा ध्वजारोहणाचा सन्मान दिला याचा मला आनंद होत आहे. कष्टातून पुढे आलेल्यांचा सन्मान केला जातो असे प्रतिपादन नंदा पवार यांनी श्री स्वामी समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागाचे ध्वजारोहण प्रसंगी केले.यावेळी संस्थेचे सचिव बापू काळे ,अभिशेठ नवाळी, रामशेठ पन्हाळे ,डॉ. बाबासाहेब गोडगे ,रमाकांत डेरे , ऋषिकेश काळे ,कोरडे साहेब ,गजानन घाटकर,प्रियंका नवाळी, वर्षाताई शेलार,श्रीराम पन्हाळे,लहानु परबत उपस्थित होते. राजुर ग्रामपंचायतमध्ये सफाई कामगार असणाऱ्या श्रीमती नंदा पवार यांच्या हस्ते उच्च माध्यमिक विभागाचे ध्वजारोहण करण्यात आले तर माध्यमिक विभागाचे ध्वजारोहण अभिशेठ नवाळी यांच्या हस्ते करण्यात आले. नंदा पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचे आम्ही पाईक असल्याचे सांगितले. कचरा करणारे गावकरी असले तरी स्वच्छता करणारे आम्ही स्वच्छता दूत आहोत. आमच्या कामामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत नाही याचे आम्हाला समाधान मिळते.अशा सामान्य स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मला जो सन्मान दिला त्याचा खूप आनंद आहे. आयुष्यभर केलेल्या कामाचे चीज झाले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. माध्यमिक विभागाचे ध्वजारोहण करणाऱ्या अभिशेठ नवाळी यांनी प्रजासत्ताक दिन हा आनंदाचा क्षण आहे. या विद्यालयाने सर्व सामान्यांचा विचार करून ध्वजारोहणाला बोलावले त्याबद्दल समाधान व्यक्त केले. कष्टातून पुढे आलेल्यांचा सन्मान केला.तुमच्यासारखा विद्यार्थी असताना पाव लाद्या विकून, घरोघरी गॅस टाक्या पोहोच करून माझे कुटुंब चालवायचो. तुम्ही आदर्श समोर ठेवा,आपले ध्येय निश्चित करा तरच तुमचे स्वप्न साकार होईल. भविष्यात नोकरी लागेल याची शाश्वती नाही,त्यामुळे आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा वापर करून मार्गक्रमन करा. यासाठी मेहनत महत्त्वाची आहे.विश्वास ,इनामदार ,चिकाटी असेल तरच पुढे जाल. गरिबांच्या मुलांना पुढे नेणारे हे विद्यालय आहे ,विज्ञान प्रदर्शनातून राज्य पातळीवर निवड झालेला सिद्धेश हंगेकर तुमच्या समोर आदर्श आहे .आई,वडील,गुरुजन यांच्या आदर करा त्यांची जाणीव ठेवली तर नक्कीच यशाच्या पायरीकडे जाल असे सांगितले . कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव बापू काळे यांनी आज आपण श्रमिकाच्या हस्ते ध्वजारोहण केले ही गौरवाची बाब आहे. विद्यार्थ्यांसमोर श्रमप्रतिष्ठेचे समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा मूल्य नक्की रुजेल. समाज उपयोगी काम करा. प्रत्येक क्षेत्रात जाण्यासाठी स्पर्धा परीक्षा महत्त्वाची आहे. यासाठी विद्यालयात स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी केंद्र सुरू केले जाईल त्यातून मोठे अधिकारी व्हा व भारताचे प्रजासत्ताक मजबूत करा असे त्यांनी सांगितले. यावेळी ऋषिकेश काळे, रमाकांत डेरे, श्रीराम पन्हाळे, प्रवीण देठे यांनीही मनोगते व्यक्त केली. असद शेख, अभिनव भांगरे, शिवप्रसाद पंडित,मानसी खाडे या विद्यार्थ्यांनीही मनोगते व्यक्त केली. देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली.त्यानंतर अतिथी, पालक व ग्रामस्थांसमोर संगीत कवायत अतिशय सुंदर व तालबद्ध पद्धतीने सादर करण्यात आली. यावेळी नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात दिव्यांग गटातून जिल्ह्यात प्रथम आलेल्या सिद्धेश हंगेकर व प्रयोगशाळा कर्मचारी गटातून जिल्ह्यात प्रथम आलेल्या श्रीनिवास मुळे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. दिव्यांग सिद्धेश हंगेकरच्या राज्यस्तरीय सहभागासाठी मान्यवरांनी आर्थिक स्वरूपात मदत दिली तसेच विद्यार्थ्यांनीही खाऊच्या पैशातून सिद्धार्थला सहकार्य केले. यानंतर विद्यार्थ्यांना अभिशेठ नवाळी, राजुर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या बिस्किट व चॉकलेटच्या खाऊचे वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण भागवत यांनी केले. सूत्रसंचालन विनायक साळवे यांनी तर आभार तानाजी फापाळे यांनी मानले.

Thursday, January 15, 2026

पिण्याच्या पाण्याच्या टाकीत घोणस साप ,राजूर नळपाणी पुरवठा योजनेचे तीन तेरा

पिण्याच्या पाण्याच्या टाकीत घोणस साप ,राजूर नळपाणी पुरवठा योजनेचे तीन तेरा राजूर,ता.१५ : राजूरला पाणी पुरवठा करणाऱ्या ण्याच्या टाकीत चक्क दोन साप ढिळुन आले. या घटनेनंतर टाकीच्या उच्छतेचे काम हाती घेण्यात आले. मस्थांना पाचव्या दिवशी म्हणजेच हिन्यातून पाच ते सहा वेळा पिण्याचे णी मिळत आहे. णीपुरवठ्याच्या मूलभूत प्रश्नाकडे मपंचायतीला लक्ष देण्यास वेळ मिळत ही का? असा सवाल सामान्य गरिकांमधून व्यक्त केला जात आहे. नळ निळवंडे धरणाच्या बाजूस राजूर ाणी पुरवठ्यासाठी जॅकवेल उभारण्यात ाली आहे. या जॅकवेलमधून पाणी चलण्यासाठी अगोदर ८० अश्वशक्तीचे ान विद्युतपंप बसविण्यात आले होते. निंतर १०० अश्वशक्तीचे दोन पंप सविण्यात आले आहेत. शहराच्या रच्या बाजूला असलेल्या टाकीत हे णी सोडले जाते व तेथून फिल्टर होऊन णीपुरवठा करण्यात येतो. यात नेकदा एक पंप नादुरूस्त असतो. लोकांच्या जिवाशी खेळायचे आहे का ? पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत मंगळवारी दोन विषारी साप आढळून आले. तुम्हाला लोकांच्या जिवाशीच खेळायचे आहे का? स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील वर्षी काविळीच्या साथरोगात जिल्हा प्रशासन कामाला लागले होते. आताही पाण्याची टाकी स्वच्छ नाही, मंगळवारचा प्रकार लक्षात आल्यानंतर बुधवारी टाकीची स्वच्छता सुरू केली आहे. नियमितपणे टाकी स्वच्छ करण्यासाठी यांना वेळ देता येत नाही का?, असे सामाजिक कार्यकर्ते सचिन देशमुख म्हणाले. मागील वर्षी राजूरमध्ये दूषित पाण्यामुळे दोन महिन्यांहून अधिक काळ काविळीचा प्रादुर्भाव निर्माण झाला होता. यात अनेक ग्रामस्थ आजारी पडले तर दोन मुलींनी आपला जीव गमावला होता. असे होऊनही अद्यापही ग्रामपंचायत पाणीपुरवठा सुरळीत करण्यास अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.दिवसांनी पिण्याचे पाणी 66 मंगळवारी एक घोणस सर्प टाकीत आढळून आला. दुसरा बाजूला होता. हे दोन्ही सर्प पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. बुधवारी पाणी पुरवठा करणारी टाकी स्वच्छ करण्यात आली आहे जीवन प्राधिकरण विभागाने तयार केलेली ही योजना सदोष असल्याने पाणी पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. संतोष बनसोडे, उपसरपंच राजूर. कोट - पाण्याची टाकी स्वच्छ न करणे, टीसीएल न टाकणे तसेच पाणी फिल्टर न करता डायरेक्ट वापर यामुळे काविळीचा प्रादुर्भाव झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत स्थानिक प्रशासनास जबाबदार धरले होते. विद्युतपंप नेहमीच नादुरुस्त कसे होतात? त्यामुळे राजूरकरांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. महिन्यातून पाच ते सहा वेळा म्हणजेच वर्षात अडीच-तीन महिने पाणीपुरवठा होतो. मग पाणीपट्टी वर्षाची का आकारता ? संतोष मुर्तडक, शिवसेना नेते राजूर.

Saturday, January 3, 2026

अभयारण्य की उपेक्षेचा मृत्यूकक्ष?

अभयारण्य की उपेक्षेचा मृत्यूकक्ष?
हरिश्चंद्रगड–कळसूबाई अभयारण्यातील अस्वस्थ करणारे वास्तव हरिश्चंद्रगड–कळसूबाई अभयारण्य हे केवळ सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पर्यटनस्थळ नाही, तर शेकडो पशु-पक्ष्यांचे नैसर्गिक घर आहे. मात्र आज या अभयारण्याचे रूपांतर हळूहळू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वन्यजीवांच्या मृत्यूकक्षात होत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. कागदोपत्री संरक्षण, प्रत्यक्षात उपेक्षा—हीच आज या अभयारण्याची ओळख बनली आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना नैसर्गिक जलस्रोत आटले आहेत. गवताळ प्रदेश कोरडे पडले असून, फळझाडांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. परिणामी हरीण, सांबर, रानडुक्कर, माकडे तसेच असंख्य पक्षी भूक आणि तहानेने तडफडत आहेत. हा निसर्गाचा कोप नाही, तर मानवी आणि प्रशासकीय निष्काळजीपणाचा परिणाम आहे. दरवर्षी उन्हाळा येतो—हे प्रशासनाला माहीत नाही काय? मग पाणवठ्यांची वेळेत दुरुस्ती का होत नाही? कृत्रिम पाणवठे, टँकरद्वारे पाणीपुरवठा, चारा छावण्या या केवळ फाईलमध्येच का मर्यादित राहतात? निधी मंजूर होतो, योजना जाहीर होतात, पण अभयारण्यात मात्र वन्यजीव उपाशी मरत आहेत—ही तफावत कोणाच्या खिशातून बोलते? खाद्य आणि पाण्याअभावी वन्यजीव मानवी वस्तीकडे वळत आहेत. शेतीचे नुकसान होत आहे, अपघात वाढत आहेत आणि मानव-वन्यजीव संघर्ष उफाळून येत आहे. याची जबाबदारी कोणाची? वन्यजीवांना त्यांच्या हक्काच्या जंगलात सुरक्षित ठेवणे हेच प्रशासनाचे कर्तव्य असताना, ते कर्तव्य पार पाडण्यात अपयश येत आहे. पर्यावरण संवर्धनाच्या गप्पा, वन्यजीव दिनाचे औपचारिक कार्यक्रम आणि फलकांवरील घोषवाक्ये यांचा या उपाशी जीवांना काहीही उपयोग नाही. गरज आहे ती तत्काळ कृतीची—पाणवठे सुरू करा, चारा छावण्या उघडा, वन्यजीवांच्या आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्र पथके तैनात करा. अन्यथा उद्या एखाद्या दुर्मिळ प्रजातीचा मृत्यू झाल्यावर हळहळ व्यक्त करून काहीही साध्य होणार नाही. जर आजही प्रशासन जागे झाले नाही, तर इतिहास हे नोंद घेईल की हरिश्चंद्रगड–कळसूबाई अभयारण्य निसर्गामुळे नव्हे, तर प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे ओस पडले. प्रश्न फक्त वन्यजीवांचा नाही, तर आपल्या संवेदनशीलतेचा आणि जबाबदारीचाही आहे.

Sunday, December 14, 2025

१०८ चित्रपटाच्या शूटिंग भंडारदरा परिसरात

अकोले: अभिजात निसर्ग सौंदर्याचे कोंदण लाभलेल्या भंडारदरा धरणाची भुरळ निसर्गप्रेमी प्रमाणेच अनेक चित्रपट निर्मात्यांनाही अनेक वर्षांपासूनच पडलेली  आहे. शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या भंडारदरा धरणाच्या आयुष्यात १०८ पेक्षा अधिक चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. त्यात पन्नासपेक्षा अधिक गाण्याच्या चित्रीकरणांचा समावेश आहे. भंडारदरा येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक प्रभाकर देशमुख यांनी भंडारदऱ्याच्या शताब्दी वर्षातील एक उपक्रम म्हणून येथे चित्रीकरण झालेल्या चित्रपटांचा शोध घेण्याचे ठरविले. भंडारदरा, रंधा परिसरात चित्रीकरण झालेल्या १०८ चित्रपटांच्या चित्रीकरणाचे संदर्भ त्यांना आत्तापर्यंत मिळाले आहेत. त्यात पन्नास एक गाण्याचा समावेश आहे. भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या ब्रिटिशकालीन बागेत व भंडारदऱ्याच्या सौंदर्याचा मानबिंदू असणाऱ्या प्रसिद्ध ‘आंब्रेला फॉल’च्या सानिध्यात अनेक सदाबहार गीतांचे चित्रीकरण झालेले आहे. मधुमती चित्रपटात वैजयंतीमाला “आजा रे परदेशी मै तो कबसे खडी इस पार “अशी साद घालते, ती याच धबधब्याच्या साक्षीने तर उजाला मध्ये “झुमता मोसम मस्त महिना ” म्हणत शम्मी कपूर व मालासिन्हा जोशात नाचले ते याच परिसरात“सुहाना सफर और ये मौसम हसी” (मधुमती), “काशी देखी मथुरा देखी देखी तीरथ सारे ” (नागिन), “तेरी दुनियासे दूर, चले होके मजबूर (जबक ), “कोई प्यार की देखे जादुगरी,” (कोहिनूर), सौ बार जनम लेंगे, सौ बार पना होंगे ( उस्तादोंके उस्ताद ), क्या करते थे साजना, तुम इनसे दूर रहके (लाल दुपट्टा मलमलका) अशा अनेक प्रसिद्ध गाण्यांनाही या धबधब्याच्या कोसळत्या धारांची पार्श्वभूमी लाभलेली आहे. तर “ये धरती चांद सितारे, ये नादिया पवन घटाये”(कुर्बानी),  “ये शाम मस्तानी, मदहोश किये जा” (कटी पतंग) या गाण्यांना रंधा धबधब्याची पार्श्वभूमी लाभली आहे. केवळ हिंदीत नव्हे तर मराठी चित्रपटांतूनही भंडारदरा रंधा धबधबा यांनी भुरळ पाडली आहे. “सजना ग भुललो मी, काय जादू झाली” (भिंगरी) “तुझे ते फुलांचे श्रावणी झुल्यांचे, दिवस कोवळे ग (चिनू ) ही मराठी गाणीही या परिसरातच चित्रित झाली आहेत.आजपर्यंत अशी पन्नास गाणी प्रभाकर  देशमुख यांनी शोधली आहेत. या १०८ चित्रपटांचे चित्रीकरण रंधा फॉल, भंडारदरा परिसरात झाल्याचे संदर्भ त्यांनी मिळविले आहेत. राजकपूर, दिलीपकुमार, वैजयंतीमाला, मीनाकुमारी, नर्गिस, अशोककुमार, किशोरकुमार, राजेश खन्ना, शर्मिला टागोर, मलासिन्हा, मधुबाला सलमानखान, अजय देवगण, काजोल, अशोक सराफ, सुषमा शिरोमणी, जयश्री गडकर असे अनेक दिग्गज कलाकार चित्रीकरणासाठी येथे आलेले आहेत. शतक महोत्सवात प्रदर्शन आजपर्यंत भंडारदरा परिसरात चित्रित झालेल्या १०८ चित्रपटांची देशमुख यांनी वर्षनिहाय यादी केली आहे. या चित्रपटांच्या पोस्टरची छायाचित्र मिळवत त्याचा एक छान अल्बम त्यांनी तयार केला आहे. भंडारदऱ्याच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात याचे पोस्टर प्रदर्शन भरविण्याचा त्यांचा मानस आहे. अजूनही चित्रपट शोधण्याचे त्यांचे काम सुरूच आहे. होमी वाडिया यांच्या फिअरलेस नादियाची प्रमुख भूमिका असणाऱ्या व १९४० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डायमंड क्वीन’ या चित्रपटाचे चित्रीकरण येथे झाले होते. भंडारदरा धरण १९२६ मध्ये बांधून पूर्ण झाले. त्यामुळे हा भंडारदऱ्यात चित्रित झालेला पहिला, दुसरा चित्रपट असावा तर धनुष व अक्षरा हसन यांचा शमिताभ हा २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे चित्रीकरणही येथे झालेले आहेसबस्क्राईब करा Sign In Marathi News maharashtra bhandardara dam beauty attracts filmmakers for over 108 shoots akole news amy ‘भंडारदरा’चे निसर्ग सौंदर्य तब्बल १०८ चित्रपटे व गाण्यांतून; शताब्दीनिमित्त कलाशिक्षकाने शोधले चित्रीकरणाचे संदर्भ अभिजात निसर्ग सौंदर्याचे कोंदण लाभलेल्या भंडारदरा धरणाची भुरळ निसर्गप्रेमी प्रमाणेच अनेक चित्रपट निर्मात्यांनाही अनेक वर्षांपासूनच पडलेली  आहे. Written by लोकसत्ता टीम December 13, 2025 18:38 IST  Follow Us ‘भंडारदरा’चे निसर्ग सौंदर्य तब्बल १०८ चित्रपटे व गाण्यांतून; शताब्दीनिमित्त कलाशिक्षकाने शोधले चित्रीकरणाचे संदर्भ ( प्रातिनिधिक छायाचित्र ) अकोले: अभिजात निसर्ग सौंदर्याचे कोंदण लाभलेल्या भंडारदरा धरणाची भुरळ निसर्गप्रेमी प्रमाणेच अनेक चित्रपट निर्मात्यांनाही अनेक वर्षांपासूनच पडलेली  आहे. शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या भंडारदरा धरणाच्या आयुष्यात १०८ पेक्षा अधिक चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. त्यात पन्नासपेक्षा अधिक गाण्याच्या चित्रीकरणांचा समावेश आहे. भंडारदरा येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक प्रभाकर देशमुख यांनी भंडारदऱ्याच्या शताब्दी वर्षातील एक उपक्रम म्हणून येथे चित्रीकरण झालेल्या चित्रपटांचा शोध घेण्याचे ठरविले. भंडारदरा, रंधा परिसरात चित्रीकरण झालेल्या १०८ चित्रपटांच्या चित्रीकरणाचे संदर्भ त्यांना आत्तापर्यंत मिळाले आहेत. त्यात पन्नास एक गाण्याचा समावेश आहे. भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या ब्रिटिशकालीन बागेत व भंडारदऱ्याच्या सौंदर्याचा मानबिंदू असणाऱ्या प्रसिद्ध ‘आंब्रेला फॉल’च्या सानिध्यात अनेक सदाबहार गीतांचे चित्रीकरण झालेले आहे. मधुमती चित्रपटात वैजयंतीमाला “आजा रे परदेशी मै तो कबसे खडी इस पार “अशी साद घालते, ती याच धबधब्याच्या साक्षीने तर उजाला मध्ये “झुमता मोसम मस्त महिना ” म्हणत शम्मी कपूर व मालासिन्हा जोशात नाचले ते याच परिसरात. “सुहाना सफर और ये मौसम हसी” (मधुमती), “काशी देखी मथुरा देखी देखी तीरथ सारे ” (नागिन), “तेरी दुनियासे दूर, चले होके मजबूर (जबक ), “कोई प्यार की देखे जादुगरी,” (कोहिनूर), सौ बार जनम लेंगे, सौ बार पना होंगे ( उस्तादोंके उस्ताद ), क्या करते थे साजना, तुम इनसे दूर रहके (लाल दुपट्टा मलमलका) अशा अनेक प्रसिद्ध गाण्यांनाही या धबधब्याच्या कोसळत्या धारांची पार्श्वभूमी लाभलेली आहे. तर “ये धरती चांद सितारे, ये नादिया पवन घटाये”(कुर्बानी),  “ये शाम मस्तानी, मदहोश किये जा” (कटी पतंग) या गाण्यांना रंधा धबधब्याची पार्श्वभूमी लाभली आहे. केवळ हिंदीत नव्हे तर मराठी चित्रपटांतूनही भंडारदरा रंधा धबधबा यांनी भुरळ पाडली आहे. “सजना ग भुललो मी, काय जादू झाली” (भिंगरी) “तुझे ते फुलांचे श्रावणी झुल्यांचे, दिवस कोवळे ग (चिनू ) ही मराठी गाणीही या परिसरातच चित्रित झाली आहेत.आजपर्यंत अशी पन्नास गाणी प्रभाकर  देशमुख यांनी शोधली आहेत. हेही वाचा Mumbai-Goa Highway Accident: मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात; कोलाडजवळ बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू या १०८ चित्रपटांचे चित्रीकरण रंधा फॉल, भंडारदरा परिसरात झाल्याचे संदर्भ त्यांनी मिळविले आहेत. राजकपूर, दिलीपकुमार, वैजयंतीमाला, मीनाकुमारी, नर्गिस, अशोककुमार, किशोरकुमार, राजेश खन्ना, शर्मिला टागोर, मलासिन्हा, मधुबाला सलमानखान, अजय देवगण, काजोल, अशोक सराफ, सुषमा शिरोमणी, जयश्री गडकर असे अनेक दिग्गज कलाकार चित्रीकरणासाठी येथे आलेले आहेत. शतक महोत्सवात प्रदर्शन आजपर्यंत भंडारदरा परिसरात चित्रित झालेल्या १०८ चित्रपटांची देशमुख यांनी वर्षनिहाय यादी केली आहे. या चित्रपटांच्या पोस्टरची छायाचित्र मिळवत त्याचा एक छान अल्बम त्यांनी तयार केला आहे. भंडारदऱ्याच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात याचे पोस्टर प्रदर्शन भरविण्याचा त्यांचा मानस आहे. अजूनही चित्रपट शोधण्याचे त्यांचे काम सुरूच आहे. भंडारदरा परिसरातील निसर्ग अतिशय सुंदर आहे. राज्यातील धबधबे फक्त पावसाळ्यात कोसळत असतात. मात्र भंडारदरा धरणातून सिंचनासाठी आवर्तन सोडतात, तेव्हा आंब्रेला फॉल वाहू लागतो. त्यामुळे वर्षभर अगदी उन्हाळ्यातही आवर्तन काळात आंब्रेला फॉल, रंधा फॉल कोसळत असतात. यामुळे तसेच मुंबईहून भंडारदराचे अंतर २०० किमी पेक्षाही कमी असल्यामुळे चित्रीकरणासाठी भंडारदरा परिसराला प्राधान्य मिळत गेले.  होमी वाडिया यांच्या फिअरलेस नादियाची प्रमुख भूमिका असणाऱ्या व १९४० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डायमंड क्वीन’ या चित्रपटाचे चित्रीकरण येथे झाले होते. भंडारदरा धरण १९२६ मध्ये बांधून पूर्ण झाले. त्यामुळे हा भंडारदऱ्यात चित्रित झालेला पहिला, दुसरा चित्रपट असावा तर धनुष व अक्षरा हसन यांचा शमिताभ हा २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे चित्रीकरणही येथे झालेले आहे. दुर्गा खोटे शाहू मोडक यांचा भरत मिलाप (१९४२) दिलीपकुमार कामिनी कौशल यांची भूमिका असणारा आरजु (१९५०) राजकपूर नर्गिस यांचा आशियाना (१९५२) दिलीपकुमार नर्गिस यांचा आन (१९५२) औरत (१९५३) प्रेमनाथ बिना रॉय, नागिन (१९५४) प्रदीपकुमार वैजयंतीमाला, नाता (१९५५) मधुबाला अभि भट्टाचार्या, एकसाल (१९५७) अशोककुमार मधुबाला, परवरीष (१९५८) राजकपूर मालासिन्हा, कोहिनुर (१९६०) दिलीपकुमार मीनाकुमारी हे सुरवातीच्या वर्षांमध्ये येथे चित्रीकरण झालेले काही चित्रपट.  काही चित्रपटांच्या दृश्यांसाठी प्रसंगी सेट उभा करीत. महिपाल व श्यामा यांच्या जबक मधील “तेरी दुनियासे दूर, चले होके मजबूर हमे याद राखना” या गाण्यासाठी भंडारदरा धरण पायथ्याशी असणाऱ्या बागेत भव्य सेट उभारण्यात आला होता. तर परिसरातील भाषेत, नदीत, सपाट मैदानातही काही दृश्यांचे गाण्याचे चित्रीकरण करण्यात येत असे. गंगा जमुनामधील वैजयंतीमाला वर चित्रित “होरे होरे जनन घुंगरू बाजे” हे समूह नृत्य असेच शेतातील मैदानात चित्रित झालेले आहे. हिंदीच्या तुलनेत येथे चित्रीकरण झालेले मराठी चित्रपट फारच थोडे असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.