Tuesday, December 29, 2020

*अहमदनगर जिल्ह्यातील मॉरिशस म्हणजे

*अहमदनगर जिल्ह्यातील मॉरिशस  म्हणजे अकोल्यातील "फोपसंडी" गांव*
               अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुका म्हणजे निसर्ग सौदर्याचे माहेरघर. भंडारदरा धरण, रंधा फॉल, रतनगड, कळसुबाई शिखर, हरीचंद्र गड, सांदण दरी  हे पर्यटन स्थळे महाराष्ट्राच्या नकाशात पर्यटनाचे माहेरघर म्हणून जनतेला माहीत आहे.पावसाळ्यात हजारो पर्यटक सुट्टीच्या दिवशी येथे भेट देतात.अगदी तासनतास ट्रॅफिक जॅमचा इकडे येतांना अकोला सोडल्यानंतर  अनुभव घ्यावा लागतो. 
                  मात्र  पर्यटकांच्या नजरेतून सुटलेलं व निसर्ग सोंदर्याने भरलेलं प्रति "मॉरिशस" असलेलं हे 1200 लोकवस्तीचे " फोपसंडी" गांव अकोलेपासून अवघे अंदाजे 40 कि. मी. अंतरावरील अनेक मोठमोठे डोंगर पार करून दरीच्या तळाशी वाड्या, पाड्यावर वसलेलं अतिदुर्गम गांव आहे.
             या गांवचा इतिहास ही रंजक आहे. साधारणतः 1925 च्या सुमारास संगमनेर प्रांताचे इंग्रज अधिकारी  "फोप" हे  घोड्यावरूनजंगलात फिरत फिरत या दरीत उतरले. तेथे त्यांना आदिवासींची वस्ती आढळली. या "पोफला" येथील निसर्ग खूप आवडला.व येथे तो दर रविवारी येऊ लागला. येथे राहण्यासाठी त्यांनी "मांडवी नदीच्या" तिरावरील टेकडीवर त्याचे रेस्ट हाऊस बांधले. तेथून तो वरील चार ही जिल्ह्याच्या सिमेवरील डोंगर,  कोंबड किल्ला(कुंजीर गड),  चोहोबाजूंनी धबधबे  पाहण्याचा आनंद घेत असे. पोफच्या या राहण्याने नंतर या गावाला "पोफसंडी" म्हणू लागले. नंतर त्याचा अपभ्रंश होऊन "फोपसंडी" हे नांव रूढ झाले.ते आजतागायत तसेच आहे.
                      स्वातंत्र्यानंतर ही 50 वर्षे हे गांव शासनाच्या सर्व सोई सुविधांपासून वंचित होते. अगदी निवडणुकीच्या वेळी ही गाढवावरून 10 कि.मी. मतदान पेट्या नेल्या जात होत्या. 1997 मधील गावातीलच दत्तात्रय मुठे ही व्यक्ती पुणे येथून परत गावांकडे आली. व गांवात  रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, दळणवळण, एस टी इत्यादी सुधारणा घडवून आणण्यासाठी पंतप्रधानांपासून ते तालुका स्तरापर्यंत सतत पत्रव्यवहार केले,पायपीट केली. सर्वात प्रथम गावांत बस येण्यासाठी त्यांनी सरकारदरबारी प्रयत्न केले.शेवटचे हत्यार गावकऱ्यांनी गावातच  सांघिक आमरण उपोषणाबाबतचे हत्यार उपसले. नाईलाजाने अधिकारी वर्गांना गावात  पायी यावे लागले. शेवटी गावांत रस्ते आले, बस आली. 2005 ला गावांत रस्ते, वीज यासाठी स्थानिकांनी श्रमदानाचा मोठा सहभाग उचलल्याचे या योजना इथपर्यंत पोहचू शकल्या. आज गांव 100 टक्के हागणदारी मुक्त दिसून आले. गावांत 10 वी पर्यंत शाळा, आहे. वाड्या वस्त्यांवर सिमेंट रस्ते आहेत. नळयोजना आहेत.अकोले येथून रोज एक मुक्कामी बस येते. गावांत अंगणवाड्या आल्या आहेत. नदीवर, ओढ्यावर बंधारे आहेत.
     💐 अजूनही काय सुधारणा आवश्यक आहे 💐
१) गावांत पर्यटनवाढीच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. म्हणजे स्थानिकांना पर्यटनातून रोजगार मिळेल.
२) दळणवळणासाठी रस्ते अजून मोठे व चांगले होणे गरजेचे आहे.
३) येथून माळशेज घाट अवघा 10 कि. मी. अंतरावर आहे. किमान 3 कि. मी. डोंगर फोडून रस्ता केला तर माळशेज अगदी जवळ येईल.व दळणवळण, पर्यटन वाढेल.
४) गावांत बँक येणे आवश्यक आहे.
५) सर्वात महत्वाचे म्हणजे कुठलीही दूरध्वनी सेवा, मोबाईल सेवा, इंटरनेट सुविधा गावात नाही.ते होणे गरजेचे आहे.
६) गावातील दूध दररोज 5 कि.मी घेऊन जावे लागते.त्यासाठी गावातच डेअरी होणे आवश्यक आहे.
             या गांवचे अनेक  वैशिष्टये सांगता येतील त्यातील काही प्रामुख्याने खाली देत आहे.
१) अहमदनगर, नाशिक, पुणे, ठाणे जिल्ह्याच्या सीमारेषेवर वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेवटचे गांव)
२) पावसाळ्यात तुफान पर्जन्यवृष्टी होत असल्याने अजूनही गावातील बहुतांश आदिवासी गुराढोरांसह पावसाळ्याचे चार महिने गुहेचा आसरा घेतात..
३)) या गावात  सकाळी नऊ वाजता सूर्योदय व संध्याकाळी साडेचार वाजता सूर्यास्त होतो. हा दोन्ही देखावा पर्यटकांनी पाहणे म्हणजे पर्यटकांना  कपिलाषष्टीचा योग होय.
४) पर्यटनाच्या दृष्टीने फोपसंडी परिसरात " कोंबड किल्ला, भदभद्याचा धबधबा,धुळगडीचा धबधबा, धारीचा धबधबा, कावड्याचा धबधबा,चोहडीचा धबधबा, काजवा महोत्सव, आदिवासी नृत्य, निसर्गसॊदर्याने भरलेला  मानखांदा गायदरा, सानदरी, निखळीचा डोंगर, बाळूबाईचा डोंगर, रांजण्याचा डोंगर, टकोरीची खिंड, वारल्याचा कडा, चारण गडद, दोंड्याची गडद, घोडगडद, केमसावण्याचे पाणी, उंबारले,  अनेक गुहा, तसेच कळमजाई मंदिर, बर्डीनाथ मंदिर, दर्याबाई मंदिर, राणूबाई मंदिर इतके प्रचंड निसर्ग सॊदर्याने भरलेले पॉईंट  येथे पहावयास मिळतात. मात्र त्यासाठी किमान तीन दिवस  पायी भटकण्याची तयारी हवी.
५) या गावचे पाणी पिण्यासाठी अतिशय गोड आहे. तसेच धबधब्याखाली आंघोळ केल्यावर शांपू न लावता ही केस कुरळे होतात.
६)पर्यटकांना राहण्याची, जेवण्याची व पर्यटन घडवून आणण्याची व्यवस्था या गावातीलच फोपसंडीचा कायापालट धडवून आणणारे तथा गाईड श्री.दत्तात्रय हनुमंता मुठे यांचे सह्याद्री दर्शन पथिकालय आहे. मात्र त्यासाठी पर्यटकांना 7218327435, 8669754121, 9850989183 या क्रमांकावर संपर्क साधावा लागेल. वरील मोबाईलला फोपसंडीत रेंज नसल्याने दुसऱ्या गावात आल्यावरच फोन लागतो.त्यामुळे वारंवार फोन लावावा लागेल.
                मॉरिशससारखा छोटा देश आज केवळ तिथल्या सरकारने पर्यटन सुविधेवर भर दिल्याने तिथला निसर्ग पाहण्यासाठी जगभरातील लोक तिथे जातात. भारतात ही फोफसंडी सारखे अनेक निसर्ग सॊदर्य असलेली ठिकाणे आज पर्यटकांपासून वंचित असल्याने तेथील जनतेचा विकास खुंटला आहे.तसेच पर्यटक निसर्ग सॊदर्याला मुकले आहे.चला आपण ही पर्यटनासाठी  या निसर्गरम्य व शांतताप्रिय दरीखोऱ्यातील "फोपसंडी" पर्यटन स्थळांना अवश्य भेट द्या.  पर्यटन करून आल्यावर  तेथील सुवासिक तांदूळ, मध, व चुलीवरच्या तांदळाच्या भाकरी, मासवडी, लज्जतदार शेवंती तसेच  गावरान कोंबडीचाही आस्वाद घ्या.
                     चला तर मग कधी निघताय पर्यटनाला"फोपसंडी"येथे.

Tuesday, December 8, 2020

पदे येतील जातील.....

अकोले,ता.८: पदे येतील जातील मात्र तुमचे आमचे कुटुंबाचे नाते आमदारकीची वाट कशाला पाहता आजच संतश्रेष्ठ संताजी महाराज मंगल कार्यालयाची सुरुवात करा तुमच्या या कामास सर्वोतोपरी मदत करू असे सांगतानाच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गाथा चे लिखाण श्री संत संताजी महाराज यांनी करून त्याचे जतन केले ही संतांची परंपरा भविष्यातील पिढ्यांना निश्चित मार्गदर्शक ठरेल असे भावोद्गार माजी आमदार वैभव पिचड यांनी राजूर येथे श्री संताजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्त बोलताना काढले .यावेळी तेली समाजाचा मोठा जनसमुदाय कोरोना निर्देश पाळून उपस्थित होता प्रास्तविक बापू काळे यांनी केले  अकोले तालुक्यातील सर्व तेल समाज बांधवानी श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९६ वि जयंती साजरी केली . यावेळी संताजी महाराजांचे पूजन करून त्याची प्रतिमा श्री वैभव पिचड याना भेट दिली . प्रसंगी उपसभापती दत्तात्रय देशमुख , सरपंच गणपतराव देशमुख ,उपसरपंच गोकुळ कान काटे,राजेंद्र वाघ ,प्राचार्य सौ मंजुषा काळे , बालाजी चोथवे  नंदकुमार चोथवे ,श्रीराम पन्हाळे ,सौ.चोथवे,विनायक घटकर नामदेव घाटकर ,देविदास शेलार , संतोष बनसोडे व सर्व समाज बांधव उपस्थित होते. प्रास्तविक जिल्हा तैलिक समाजाचे उपाध्यक्ष बापू काळे यांनी केले .तर श्रीराम पन्हाळे उपसभापती दत्त देशमुख यांची भाषणे झाली प्रसंगी प्राचार्या सौ मंजुषा काळे म्हणाल्या समाजाने शिका , संगठीत  व्हा , संघर्ष करा या त्रिसूत्रीचा वापर करून कार्य केल्यास समाजाचा विकास झपाट्याने होईल व संत श्रेष्ठ संताजी महाराजांना ती खरी श्रद्धांजली ठरेल  तर समाजाच्या संताजी मंगल कार्यालयास सुरुवात करून समाजात आदर्श निर्माण करावा असे आव्हान केले .मा . आमदार वैभव  पिचड यांनी तालुक्यात तेली समाज सोबतच सर्व ओबीसी समाज बांधवएकत्र व गुण्यागोविंदाने नांदत असून त्याच्या कामासाठी माझ्याकडे आमदार पद आल्यावर आमचे काम करा असे काही वक्त्यांनी सांगितले त्याचा पदर धरून मी आमदार असेल नसेल मात्र मी तुमच्या हक्काचा कार्यकर्ता आहे तुमच्या का मा ला सदैव तत्पर राहील पदे येतात जातात मात्र पदापेक्षा तुम्ही मला महत्वाचे आहेत असे भावनिक उद्गार काढले यावेळी जिल्हा स्तरावर व विभागीय स्थरावर निवड झाल्याबद्दल देविदास शेलार व संतोष बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला सुत्रसंचलन व आभार अविनाश बनसोडे यांनी मानले . सोबत फोटो  akl ८प १,२

Tuesday, December 1, 2020

डॉक्टरांच्या हातात रिपोर्ट होते. निदान झालं .... नॉन ALCOHOLIC लिव्हर सिरॉसिस .. व्यसनापासून हजारो हात लांब असलेला मी .. लिव्हर खराब झालं होतं.. फक्त ३ महिन्याचा अवधी ... मुलगा आणि मुलगी तयार झाली त्यांचं लिव्हर द्यायला. पण ... मुलीचा आणि माझा ब्लड ग्रुप match नाही झाला.... १ पर्याय संपला... मुलाची लिव्हर साईझ ३५ हवी होती .... ती फक्त २९ होती... (अश्या केस मध्ये donar १% सुद्धा कमी असता कामा नये) दुसरा पण पर्याय संपला.. मग सुरु झाला माझा प्रवास ... मीही एक डॉक्टर... डर्मीटोलॉजिस्ट... खर तर एक हजाम सुद्धा... डॉक्टरकी करता करता काहीतरी वेगळं करायचं आयुष्यात म्हणून लंडन ला जाऊन हेअर कट चा कोर्से केला. पुण्यात आल्यावर ८० एक ९० च्या दशकातील पुरुष्यांसाठी भारतातील पाहिलं Beauty parlour सुरु केलं. लोकांनी वेड्यात काढलं. पुरुषांसाठी palour हि संकल्पनाच त्यावेळी लोकांच्या पचनी पडत नव्हती. हळू हळू लोक केस कापायला का असेना यायला लागले ... बघता बघता एकाच्या दोन ..दोनाच्या चार अशा ११ शाखा भारतात् चालू केल्या... अनेकांना रोजगार मिळाला... क्लिनिक ... palour वेळ पुरेनासा झाला. पण .... पण नियतीला कुठेतरी हे मान्य नव्हतं .. म्हणूनच तर लिव्हर खराब होणे यासारखा भयंकर आजार मला झाला. वाटलं ... मीच / मलाच का ??? पण ,,, कुणीतरी दाता आपल्याला लिव्हर देईल .... याची वाट पाहण्याशिवाय माझ्या हातात काहीच उरल नव्हतं (डॉक्टर असूनही) वेळ कमी होता फक्त ३ महिने .... २ महिने होऊन गेले... तिसरा महिना उजाडला. या केस मध्ये हातापायाच्या काड्या झाल्या होत्या, जलोदर झालं होत (३२ लिटर पोटात पाणी होत) वाटू लागलं आपला प्रवास संपला. पण इथेही नियतीने तिची किमया दाखवली. एका accident मध्ये ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीच लिव्हर मला देण्याचा निर्णय झाला. ८ ते १० अतिशय हुशार ... जगातल्या मोठं मोठ्या युनिव्हर्सिटी मधून शिकून आलेले ... ध्यासाने झपाटलेले डॉक्टर .. ५.३० तासांच्या अथक प्रयत्नांनी ( लिव्हर ट्रान्सप्लांट करणे हे कमीत कमी २४ तासांचे operation ... आणि कमीत कमी २५ रक्ताच्या बाटल्या लागतात हे आधी वर्ल्ड रेकॉर्ड होत) यशस्वी झालं तेही एकही रक्ताचा थेंबही न देता. खर तर आपल्या डोळ्यात कचरा जरी गेला (Foreign Body) तरी आपलं शरीर तो कचरा बाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असते. इथे शरीरात एक (Foreign Body) लिव्हर बसवल होत. शरीर ती Foreign Body बाहेर फेकण्याच्या प्रयत्नात असते, म्हणून जोपर्यंत शरीर ते accept करत नाही तोपर्यंत शरीराची संपूर्ण प्रतिकारशक्ती निकामी केली जाते. त्याच काळात बाकी कसलं इन्फेकशन झालं तरी तेहीं शरीराला कळत नाही म्हणून घरात बायको आणि मूलं ... जेवायला देतानाही मास्क. हँडग्लोव्हस ... संपूर्ण steralize होऊन येत, दिवसाला ४२ गोळ्या. डॉक्टरांना थोडासा व्यायाम सुरु करू का विचारलं... पोटावर फक्त १०४ टाके होते म्हणून त्यांनी नकार दिला. पण मी हट्ट केला तर ... सायकलिंग करू शकता म्हणाले. थोडं थोडं बागेत जाऊन सायकलिंग सुरु केलं. तीथेच एक सायकलिंग करणारा ग्रुप भेटला. १ वर्ष गेलं. पुणे एक गोवा अशी सायकलिंगची स्पर्धा होती. ३१ तासाच्या आत ६०० किमी अंतर कापायचे होते. मी म्हणालो मला घ्यायचा आहे सहभाग. माझा विश्वास पाहून एक महिला आणि एक तरुण मुलगा तयार झाले. ६०० किमी चे अंतर . त्यात मी १८३ किमी चे अंतर सायकलिंग केले. आज चार वर्ष झाली. योग्य आहार, व्यायाम आणि सर्वात महत्वाचे इच्छाशक्ती.... हि त्रिसूत्री कधीच नाही सोडली. पुन्हा जोमाने कामाला लागलो. माझं क्लिनिक आणि माझं passion असलेलं Parlour .... पुन्हा ४ शाखा पुण्यात सुरु केल्या. papillon mens parlour हे नाव पुन्हा पॉप्युलर झालं. पण हे सगळं पुन्हा करताना घरच जेवण ... ५० मिनिटे उकळलेलं पाणी .. आणि खूप सारी पथ्ये ... माझ्याकडे आज खूप पैसा आहे. पण पैसा असूनही जगात कुठेच अस शॉप नाही जिथून मी हृदय, किडनी, फुफ्फुस, हात, पाय विकत घेईल. माझ्यासमोर बसलेले तुम्ही सगळे खूप श्रीमंत आणि नशीबवान आहात. निसर्गाने दिलेले सगळे अवयव तुमच्याकडे आहेत. त्याची काळजी घ्या. व्यसन करून छातीच खोक करून घेऊ नका. कुणीतरी अज्ञात (गव्हरमेंट कायद्यानुसार अवयव देणारा आणि घेणारा हे कधीच कुणाला कळत नाही) माणसाच्या घरच्यांच्या अवयव दानाच्या योग्य निर्णयामुळे आज मी तुमच्या समोर उभा आहे. मरणाच्या पश्चात कर्मकांडात अडकून शरीराची माती होण्यापेक्षा हृदय, किडनी, फुफ्फुस, डोळे इ. दान करून कुणालातरी जीवदान द्या. हि छोटी गोष्ट आहे डॉ. विनय कोपरकर यांची ...... यातून काय घ्यायचं हे आपलं आपणच ठरवुया..!!Forwarded ....

डॉक्टरांच्या हातात रिपोर्ट होते. निदान झालं .... नॉन ALCOHOLIC लिव्हर सिरॉसिस .. व्यसनापासून हजारो हात  लांब असलेला मी .. लिव्हर खराब झालं होतं.. फक्त ३ महिन्याचा अवधी ... मुलगा आणि मुलगी तयार झाली त्यांचं लिव्हर द्यायला.  पण ... मुलीचा आणि माझा ब्लड ग्रुप match  नाही झाला.... १ पर्याय संपला...  मुलाची लिव्हर साईझ ३५ हवी होती .... ती फक्त २९ होती... (अश्या केस मध्ये donar १% सुद्धा कमी असता कामा नये)  दुसरा पण पर्याय संपला.. मग सुरु झाला माझा प्रवास ... मीही एक डॉक्टर... डर्मीटोलॉजिस्ट... खर तर एक हजाम सुद्धा... डॉक्टरकी करता करता काहीतरी वेगळं करायचं आयुष्यात म्हणून लंडन ला जाऊन हेअर कट चा कोर्से केला. पुण्यात आल्यावर ८० एक ९० च्या दशकातील पुरुष्यांसाठी भारतातील पाहिलं  Beauty  parlour सुरु केलं. लोकांनी वेड्यात काढलं. पुरुषांसाठी palour हि संकल्पनाच त्यावेळी लोकांच्या पचनी पडत नव्हती. हळू हळू लोक केस कापायला का असेना यायला लागले ... बघता बघता एकाच्या दोन ..दोनाच्या चार अशा ११ शाखा भारतात् चालू केल्या... अनेकांना रोजगार मिळाला... क्लिनिक ... palour वेळ पुरेनासा झाला. पण .... पण नियतीला कुठेतरी हे मान्य नव्हतं .. म्हणूनच तर लिव्हर खराब होणे यासारखा भयंकर आजार मला झाला. वाटलं ... मीच / मलाच का ??? पण ,,, कुणीतरी दाता  आपल्याला लिव्हर देईल .... याची वाट पाहण्याशिवाय माझ्या हातात काहीच उरल नव्हतं (डॉक्टर असूनही) वेळ कमी होता फक्त ३ महिने .... २ महिने होऊन गेले... तिसरा महिना उजाडला. या  केस मध्ये हातापायाच्या काड्या झाल्या होत्या, जलोदर झालं होत (३२ लिटर पोटात पाणी होत) वाटू लागलं आपला प्रवास संपला.  पण इथेही नियतीने तिची किमया दाखवली. एका accident  मध्ये ब्रेन डेड  झालेल्या व्यक्तीच लिव्हर मला देण्याचा निर्णय झाला. ८ ते १० अतिशय हुशार ... जगातल्या मोठं मोठ्या युनिव्हर्सिटी मधून शिकून आलेले ...  ध्यासाने झपाटलेले डॉक्टर .. ५.३० तासांच्या अथक प्रयत्नांनी ( लिव्हर ट्रान्सप्लांट करणे हे कमीत कमी २४ तासांचे operation ... आणि कमीत कमी २५ रक्ताच्या बाटल्या लागतात हे आधी वर्ल्ड रेकॉर्ड होत) यशस्वी झालं तेही एकही रक्ताचा थेंबही न देता. खर तर आपल्या डोळ्यात कचरा जरी गेला (Foreign Body)  तरी आपलं शरीर तो कचरा बाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असते. इथे शरीरात एक (Foreign Body) लिव्हर बसवल होत. शरीर ती Foreign Body बाहेर फेकण्याच्या प्रयत्नात असते, म्हणून जोपर्यंत शरीर ते accept करत नाही तोपर्यंत शरीराची संपूर्ण प्रतिकारशक्ती निकामी केली जाते. त्याच काळात बाकी कसलं इन्फेकशन झालं तरी तेहीं शरीराला कळत नाही म्हणून घरात बायको आणि मूलं ... जेवायला देतानाही मास्क. हँडग्लोव्हस ... संपूर्ण steralize होऊन येत, दिवसाला ४२ गोळ्या. डॉक्टरांना थोडासा व्यायाम सुरु करू का विचारलं... पोटावर फक्त १०४ टाके होते  म्हणून त्यांनी नकार दिला. पण मी हट्ट केला तर ... सायकलिंग करू शकता म्हणाले. थोडं थोडं बागेत जाऊन सायकलिंग सुरु केलं. तीथेच एक सायकलिंग करणारा ग्रुप भेटला. १ वर्ष गेलं. पुणे एक गोवा अशी सायकलिंगची स्पर्धा होती. ३१ तासाच्या आत ६०० किमी अंतर कापायचे होते. मी म्हणालो मला घ्यायचा आहे सहभाग. माझा विश्वास पाहून एक महिला आणि एक तरुण मुलगा तयार झाले. ६०० किमी चे अंतर . त्यात मी १८३ किमी चे अंतर सायकलिंग केले. आज चार वर्ष झाली. योग्य आहार, व्यायाम आणि सर्वात महत्वाचे इच्छाशक्ती.... हि त्रिसूत्री कधीच नाही सोडली. पुन्हा जोमाने कामाला लागलो. माझं क्लिनिक आणि माझं passion असलेलं Parlour .... पुन्हा ४ शाखा पुण्यात सुरु केल्या. papillon mens parlour हे नाव पुन्हा पॉप्युलर झालं. पण हे सगळं पुन्हा करताना घरच जेवण ... ५० मिनिटे उकळलेलं पाणी .. आणि खूप सारी पथ्ये ... माझ्याकडे आज खूप पैसा आहे. पण पैसा असूनही जगात कुठेच अस शॉप नाही जिथून मी हृदय, किडनी, फुफ्फुस, हात, पाय विकत घेईल. माझ्यासमोर बसलेले तुम्ही सगळे खूप श्रीमंत आणि नशीबवान आहात. निसर्गाने दिलेले सगळे अवयव तुमच्याकडे आहेत. त्याची काळजी घ्या. व्यसन करून छातीच खोक करून घेऊ नका. कुणीतरी अज्ञात (गव्हरमेंट कायद्यानुसार अवयव देणारा आणि घेणारा हे कधीच कुणाला कळत नाही)  माणसाच्या घरच्यांच्या अवयव दानाच्या योग्य निर्णयामुळे आज मी तुमच्या समोर उभा आहे. मरणाच्या पश्चात कर्मकांडात अडकून  शरीराची माती होण्यापेक्षा हृदय, किडनी, फुफ्फुस, डोळे इ. दान करून कुणालातरी  जीवदान द्या. 
हि छोटी गोष्ट आहे डॉ. विनय कोपरकर यांची ...... यातून काय घ्यायचं हे आपलं आपणच ठरवुया..!!

Forwarded .... लिव्हर खराब झालं होतं.. फक्त ३ महिन्याचा अवधी ... मुलगा आणि मुलगी तयार झाली त्यांचं लिव्हर द्यायला.  पण ... मुलीचा आणि माझा ब्लड ग्रुप match  नाही झाला.... १ पर्याय संपला...  मुलाची लिव्हर साईझ ३५ हवी होती .... ती फक्त २९ होती... (अश्या केस मध्ये donar १% सुद्धा कमी असता कामा नये)  दुसरा पण पर्याय संपला.. मग सुरु झाला माझा प्रवास ... मीही एक डॉक्टर... डर्मीटोलॉजिस्ट... खर तर एक हजाम सुद्धा... डॉक्टरकी करता करता काहीतरी वेगळं करायचं आयुष्यात म्हणून लंडन ला जाऊन हेअर कट चा कोर्से केला. पुण्यात आल्यावर ८० एक ९० च्या दशकातील पुरुष्यांसाठी भारतातील पाहिलं  Beauty  parlour सुरु केलं. लोकांनी वेड्यात काढलं. पुरुषांसाठी palour हि संकल्पनाच त्यावेळी लोकांच्या पचनी पडत नव्हती. हळू हळू लोक केस कापायला का असेना यायला लागले ... बघता बघता एकाच्या दोन ..दोनाच्या चार अशा ११ शाखा भारतात् चालू केल्या... अनेकांना रोजगार मिळाला... क्लिनिक ... palour वेळ पुरेनासा झाला. पण .... पण नियतीला कुठेतरी हे मान्य नव्हतं .. म्हणूनच तर लिव्हर खराब होणे यासारखा भयंकर आजार मला झाला. वाटलं ... मीच / मलाच का ??? पण ,,, कुणीतरी दाता  आपल्याला लिव्हर देईल .... याची वाट पाहण्याशिवाय माझ्या हातात काहीच उरल नव्हतं (डॉक्टर असूनही) वेळ कमी होता फक्त ३ महिने .... २ महिने होऊन गेले... तिसरा महिना उजाडला. या  केस मध्ये हातापायाच्या काड्या झाल्या होत्या, जलोदर झालं होत (३२ लिटर पोटात पाणी होत) वाटू लागलं आपला प्रवास संपला.  पण इथेही नियतीने तिची किमया दाखवली. एका accident  मध्ये ब्रेन डेड  झालेल्या व्यक्तीच लिव्हर मला देण्याचा निर्णय झाला. ८ ते १० अतिशय हुशार ... जगातल्या मोठं मोठ्या युनिव्हर्सिटी मधून शिकून आलेले ...  ध्यासाने झपाटलेले डॉक्टर .. ५.३० तासांच्या अथक प्रयत्नांनी ( लिव्हर ट्रान्सप्लांट करणे हे कमीत कमी २४ तासांचे operation ... आणि कमीत कमी २५ रक्ताच्या बाटल्या लागतात हे आधी वर्ल्ड रेकॉर्ड होत) यशस्वी झालं तेही एकही रक्ताचा थेंबही न देता. खर तर आपल्या डोळ्यात कचरा जरी गेला (Foreign Body)  तरी आपलं शरीर तो कचरा बाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असते. इथे शरीरात एक (Foreign Body) लिव्हर बसवल होत. शरीर ती Foreign Body बाहेर फेकण्याच्या प्रयत्नात असते, म्हणून जोपर्यंत शरीर ते accept करत नाही तोपर्यंत शरीराची संपूर्ण प्रतिकारशक्ती निकामी केली जाते. त्याच काळात बाकी कसलं इन्फेकशन झालं तरी तेहीं शरीराला कळत नाही म्हणून घरात बायको आणि मूलं ... जेवायला देतानाही मास्क. हँडग्लोव्हस ... संपूर्ण steralize होऊन येत, दिवसाला ४२ गोळ्या. डॉक्टरांना थोडासा व्यायाम सुरु करू का विचारलं... पोटावर फक्त १०४ टाके होते  म्हणून त्यांनी नकार दिला. पण मी हट्ट केला तर ... सायकलिंग करू शकता म्हणाले. थोडं थोडं बागेत जाऊन सायकलिंग सुरु केलं. तीथेच एक सायकलिंग करणारा ग्रुप भेटला. १ वर्ष गेलं. पुणे एक गोवा अशी सायकलिंगची स्पर्धा होती. ३१ तासाच्या आत ६०० किमी अंतर कापायचे होते. मी म्हणालो मला घ्यायचा आहे सहभाग. माझा विश्वास पाहून एक महिला आणि एक तरुण मुलगा तयार झाले. ६०० किमी चे अंतर . त्यात मी १८३ किमी चे अंतर सायकलिंग केले. आज चार वर्ष झाली. योग्य आहार, व्यायाम आणि सर्वात महत्वाचे इच्छाशक्ती.... हि त्रिसूत्री कधीच नाही सोडली. पुन्हा जोमाने कामाला लागलो. माझं क्लिनिक आणि माझं passion असलेलं Parlour .... पुन्हा ४ शाखा पुण्यात सुरु केल्या. papillon mens parlour हे नाव पुन्हा पॉप्युलर झालं. पण हे सगळं पुन्हा करताना घरच जेवण ... ५० मिनिटे उकळलेलं पाणी .. आणि खूप सारी पथ्ये ... माझ्याकडे आज खूप पैसा आहे. पण पैसा असूनही जगात कुठेच अस शॉप नाही जिथून मी हृदय, किडनी, फुफ्फुस, हात, पाय विकत घेईल. माझ्यासमोर बसलेले तुम्ही सगळे खूप श्रीमंत आणि नशीबवान आहात. निसर्गाने दिलेले सगळे अवयव तुमच्याकडे आहेत. त्याची काळजी घ्या. व्यसन करून छातीच खोक करून घेऊ नका. कुणीतरी अज्ञात (गव्हरमेंट कायद्यानुसार अवयव देणारा आणि घेणारा हे कधीच कुणाला कळत नाही)  माणसाच्या घरच्यांच्या अवयव दानाच्या योग्य निर्णयामुळे आज मी तुमच्या समोर उभा आहे. मरणाच्या पश्चात कर्मकांडात अडकून  शरीराची माती होण्यापेक्षा हृदय, किडनी, फुफ्फुस, डोळे इ. दान करून कुणालातरी  जीवदान द्या. 
हि छोटी गोष्ट आहे डॉ. विनय कोपरकर यांची ...... यातून काय घ्यायचं हे आपलं आपणच ठरवुया..!!

Forwarded ....