चेहऱ्याचे सौदर्य दाखविण्याचे काम आरसा करत असतो. त्याचप्रमाणे एखाद्या शहराचे सौदर्य दाखविण्याचे काम आरश्याच्या रुपाने गावातील रस्ते आणि इमारती करत असतात. संगमनेरचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सध्या शहराबाहेर सुरु असलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे होत आहे. काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये प्रवेश करायचा अथवा संगमनेरमधुन पुढे जायचे म्हटले तर शहरातील वाहतुक कोंडीमुळ नाकीनऊ येत. शहरात प्रवेश करतांनाच हतबल अवस्था झालेली व्यक्ती शहरातील अंतर्गत रस्त्यामुळे आणखीनच त्रस्त होत असे. जुन्या गावठाणातील रस्त्यांची अडचण सोडली तर शहरातील रस्त्यांचा हा प्रश्न आता खुप अंशी मार्गी लागला आहे. त्यामुळे शहराचे सौदर्यदेखील चकाकु लागले आहे.
प्रवरा नदीवरील पुल, तीन बत्ती चौक, पंचायत समिती रस्ता, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, बसस्थानक चौक, अकोले नाका ही शहरातील प्रवेशद्वारे वाहतुकीच्या कोंडीची ठिकाणी म्हणुन परिचित होती. या ठिकाणच्या वाहतुक कोंडीत प्रवाश्यांच्या वाहनातील इंधनाची नासाडी, धुरामुळे होणारे प्रदुषण, वाहतुक कोंडीमुळे होणारा मनस्ताप तर नित्याचाच झाला होता. वाहतुकीची ही कोंडी सोडविण्यासाठी पोलीस दलाचाही बराच वेळ जात. वाहतुक कोंडी झाली की कोणीतरी पोलीसांना फोन करत आणि ही कोंडी सोडविण्याची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागत असे. त्यातुन सत्ताधाऱ्यांचेदेखील अपयश समोर येत. मात्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रस्त्याच्या प्रश्नात गांभीयार्ने लक्ष घातल्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातुन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी शहरातील अनेक रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करण्याला प्राधान्य दिले. शहरातील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण होत असतांना शहरातील प्रवेशद्वारावरील कोंडी सोडविण्यासाठी सर्वप्रथम मंत्री थोरात यांनी शहराबाहेरुन जाणाऱ्या बाह्यवळण मार्गाचे काम मार्गी लावले. यातुन काही अंशी कोंडी सुटली तरी मुळ प्रश्न तसाच होता. त्यामुळे प्रवरा नदीवरील पुलाचे रुंदीकरण करण्यात आले.
नाशिक-पुणे मार्ग शहराबाहेरुन गेल्यानंतर संगमनेर शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी पाऊले टाकली गेली. मंत्री थोरात यांनी यासाठी आपले मैत्रीपुर्ण संबध वापरत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच साकडे घातले. गडकरी यांनीदेखील राजकीय अभिनिवेष न बाळगता शहरातुन जाणाऱ्या आणि बाह्यवळण मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला. यात थोरात यांनी राज्य सरकारच्या माध्यमातुन आणखी निधी मिळवत या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ केला. एकूण चार टप्प्यात होणाऱ्या या कामाचे दोन टप्पे सुरुवातीला सुरु आहे. मात्र रुंदीकरणाचा खरा कस शेवटच्या टप्प्यातील बसस्थानक ते प्रवरा पुल या कामात लागणार आहे. सध्या सुरु असलेल्या अमृतवाहिनी कॉलेज ते सह्याद्री महाविद्यालयापर्यतच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे रस्ता भव्यदिव्य भासु लागला आहे. येत्या दिवाळीपर्यत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे ध्येय सार्वजनिक बांधकाम विभागाने समोर ठेवले आहे.
या मार्गाच्या कामात रस्ता रुंदीकरण करतांना असलेले अडथळे हटविले जात असून काही ठिकाणी प्रशासनाचा हातोडादेखील पडत आहे. मात्र कोणताही वादविवाद न होता हे काम विनासायास सुरु असले तरी उपनगराच्या तोंडाशी आलेले काम आता शहरात सुरु होणार असल्याने मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे काढावी लागणार आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणामुळे येथे खरा कस लागणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील रायतेवाडी फाटा बाह्यवळण मार्ग ते प्रवरा पुलापर्यतच्या कामालादेखील फारसे अडथळे येतील असे वाटत नाही. त्यामुळे शेवटचा टप्पा निर्णायक ठरणार आहे. तीन टप्प्याचे काम पुर्ण झाल्यानंतर हे काम पुढे जाणार असले तरी नाईलाजाने का होईना या मार्गातील अनेक अडथळे प्रशासनाला प्रसंगी बळाचा वापर करुन दुर करावे लागतील. तसे न झाल्यास सध्या शहरातील बाजारपेठेची जी अवस्था संगमनेरकर बघत आहे तशीच अवस्था शहरातील या भागातील होण्यास वेळ लागणार नाही. परिणामी या भागातील सर्व व्यवसाय देखील बंद पडण्याची भिती आहे. हे व्यवसाय नव्याने विकसीत होणाऱ्या भागात
No comments:
Post a Comment