Thursday, April 17, 2014

अकोले ,ता . १८: महाराष्ट्रातील आदिवासी भिल्ल समाजाची कुलदेवता व पंढरी असलेल्या " येडूबाई देवी  " च्या जत्रेत लाखो भिल्ल समाज बांधव व भाविकांनी दर्शन घेतले तर नवसपूर्ती म्हणून कोंबड्या व हजारो बकरांची आहुती देण्यात आली . यावेळी देवीचा जयजयकार करत  अंगावर असूड मारत , कापूर जाळत , लोटांगण घेत भिल्ल समाजाने गडावर जाऊन एकच जल्लोष केला .महाराष्ट्रातील भिल्ल समाजाचा हा एकमेव उत्सव असून एकमेकांचे सुख दुखं ,सवांद ,लग्न कार्य ,न्यायनिवाडा यासाठी भिल्ल बांधव आपला मुक्काम वाढवतात यात्रेचे  वैशिष्टे म्हणजे एकमेकांना जगायला बळ  व उर्जा मिळते अखिल भिल्ल समाजाचे आराध्यदैवत असल्याने वर्षभरात इथल्या जत्रेला हजेरी लावली नाही असा भिल्ल बांधव विरळच अकोले येथील अगस्ती आश्रमात भरणाऱ्या यात्रला होणाऱ्या  गर्दी इतकीच गर्दी इथे पाहायला मिळते एरवी शांत , निवांत अंधाराच्या कुशीत पहुडलेले मुळा खोरे यात्रेच्या  निमित्ताने चार सहा दिवस सारखे जागते राहते .महाराष्ट्र व बाहेरील राज्यातून लोक इथे येतात
अकोले तालुक्यातील पिपंळ दरीच्या येडूबाई गडाचा परिसर ,महाराष्ट्र भरातून हजारोच्या संख्येनी जमलेले भिल्ल बांधव त्यांच्या  शेतांमध्ये पडलेल्या राहुट्या  जागा मिळावी म्हणून ३ दिवस अगोदरच आलेले त्यांचे सर्व कुटुंब व जत्रेत नवस पुरती साठी गडाच्या खाली असलेल्या " वाघाई व गाडीवान "या देवतासमान असणाऱ्या मंदिरासमोर एक हजारपेक्षा अधिक मुलांनीमार्फत  (मुस्लिम समाजाचे लोक )बकारांची देण्यात आलेली आहुती ,निघालेली पारंपारिक वाद्य डफ , हलगीच्या निनादात व तालावर म्हटली जाणारी पारंपारिक देवीची महती सागणारे खड्या आवाजात म्हटली जाणारी पारंपारिक" गवने "हजारोच्या संख्येने निघालेल्या काठ्या , व त्यासोबत देवीचा गडावर चालवलेला नैवैध्य , त्याच वेळी ४० एकरपरिसरात तीन दगडावर पेटवलेल्या चुली व त्यावर शिजणारे मटन  हे दृश्य म्हणजे भिल्ल समाजाची येडूबाई विषयी असलेली श्रद्धा व त्याला अहुतीची असणारी काळी किनार असे दृश्य पाहायला मिळाले . अकोल्यापासून ३२ किलोमीटर वर असणारे पिपंऴदरी गाव तिथे गडावर येडूबाई चे १८५० पासूनचे सर्वे नंबर ५८ मध्ये मंदिर आहे . या मंदिराची दर चैत्र पोर्णिमे च्या दुसर्या दिवशी येथे जत्रा  व यात्रा भरते तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवास पहाटे  ४ वाजता नानासाहेब रंधे यांच्या हस्ते देवीला अभिषेक करून होते. सकाळी ८ वाजेपर्यंत हा कार्यक्रम झाल्यानंतर ८. ३० ला मुकुट ,चोळी , पातळ व अलंकार मांडव डहाळ्या व पारंपारिक वाद्याच्या गजरात गडावर जाऊन देवीला पोशाख नेसविला जातो . दुपारी २ वाजता गोंधळ व देवीच्या आरती व गाण्याचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर दुपारी ४ वाजता  देवीची काठी निघते त्याला देवीचा छबिना म्हणतात या काठीची मिरवणूक पिंपऴ दरी गावातून निघते यावेळी वाद्य वाजवून काठी नाचवली जाते तर नवसपूर्ती साठी अंगावर असूड  मारणे , गडापर्यंत लोटांगण घालणे , देवीचे अंगात येउन गडावर हाई।  हाई करीत गडावर  धावत  जाने आदी परंपरा भिल्ल समाज जपतो तर मुलाचा नवस असेल तर यावेळी नवसपूर्ती करण्यात येते तीन दिवस भिल्ल  समाज देवीच्या ओव्या व गीते म्हणतात त्यामुळे भक्तिमय वातावरण तयार होते . सायंकाळी ५ वाजता छबिना च्या काठ्या मंदिराच्या कळसाला लागल्यावर मुख्य कार्यक्रमाला सुरवात होते  कोंबड्या बोकड घेऊन भक्त व नवसपूर्ती वाले वाघाई  व गाडीवान या दिशेने जाऊन तिथे   नवसपूर्ती फेडण्यासाठी सुमारे एक हजार बोकडांची व कोंबड्यांची आहुती दिली गेली . यावेळी बकराच्या ओरडण्याचा आवाज आसमंतात गेला हे पाहण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते . त्यानंतर भिल्ल समाजाच्या चुली पेटल्या व यावेळी तमाश्या कलावंतानी हजेरी लाऊन उपस्थितांचे मनोरंजन केले . या येडूबाई मंदिराच्या बाबत भिल्ल समाज व ग्रामस्थ यांच्यात मतभेद आहे . गडावर शासनाने पायऱ्या  ,वीज द्यावी हे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित व्हावे अशी मागणी दिलीप बर्डे व सुभाष पवार यांचे मत आहे मात्र शासन याबाबीकडे दुर्लक्ष्य करीत आहे गडाची जागा वनक्षेत्रात येत असून ती मंदिराल देऊन कायमस्वरूपी तिचा विकास व्हावा असेही भिल्ल समाजाचे पुढारी म्हणतात  . देवस्थानचे विश्वस्थ रामदास पंधे बाबा यांनी मंदिर उभारणीसाठी व सोयी सुविधांसाठी सरकार व समाज यांनी मदत करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे . तर सामाजिक कार्यकर्त्या शकुंतला खरात , जनाभाऊ जाधव , सखुबाई जाधव यांनी हजार बकरे व कोंबड्यांचा बळी देण्याऐवजी हा नवस फेडताना बकरे सोडून त्याचा लिलाव करून ती रक्कम देवस्थान विकास व भिल्ल समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिल्यास हत्या होणार नाही . व सामाजिक काम होईल . मात्र भिल्ल समाजाचे दिलीप  बर्डे चंदू बर्डे यांनी हि प्रथा बंद होणार नाही आम्ही देवीला बळी देत नाही भिल्ल समाज वाघाई व गाडीवानला बोकड देऊन जल्लोष करतात . देवीला भाजी भाकरीचा नैवद्य  दिला जातो याबाबत कुणीही अडचण अणु  नये व आमच्या धार्मिक भावना बिघडू नये असे भिल्ल समाजाचे म्हणणे आहे .   सोबत फोटो -  akl18p1 akl18p2 akl18p3 akl18p4  
7 Attachments

No comments:

Post a Comment