Sunday, May 8, 2022

कौठवाडी बिरोबा यात्रा १०० कठे पेटले

कौठवाडीचे ग्रामदैवत बिरोबाचा कठा उत्सव 

अकोले तालुक्याच्या पश्चिमेला आदिवासी भाग चाळीसगाव डांग परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात अनेक दैवते आहेत जगदंबा मंदिर, कळसूबाई मंदिर, हरिश्चंद्र मंदिर, अमृतेश्वराचे मंदिर, अगस्ति मंदिर, घोरपडा देवी मंदिर, कोतुळेश्वर मंदिर, खंडोबा मंदिर, बिरोबा मंदिर अशी अनेक मंदिरे असून ती भक्तांची श्रद्धास्थाने आहेत. अकोले तालुक्यात भंडारदरा ध
अकोले तालुक्याला प्राचीन परंपरा आहे. यातील कौठवाडी या आदिवासी खेड्यातील बिरोबाच्या यात्रेचे महत्त्व आगळेवेगळे असेच आहे. या ग्रामदैवताचे व यात्रा उत्सवाचे जे वेगळेपण आहे ते बघणे महत्त्वाचे आहे.

बिरोबा देवाची स्थापना

बिरोबा हे पूर्ण परिसरातील भाविकांचे  कुलदैवत मानले जाते.  या देवाची उपासना करतात. या देवाला शिवाचा अवतार मानतात. अकोले तालुक्यातील कौठवाडी या ग्रामदैवताच्या स्थापनेचा एक इतिहास सांगता येतो. या देवाची आख्यायिका पाहता चिलेवाडी (जिल्हा पुणे) या ठिकाणाहून एक आदिवासी महिला गुरे चारण्यासाठी या भागात आली. तिला एका दगडाचा साक्षात्कार झाला. तो दगड़ तिने पाटीत घालून आणला. या दगडाची बिरोबा या नावाने कौठवाडी येथे स्थापना करण्यात आली. तेव्हापासून हे जागृत देवस्थान म्हणून अकोले तालुक्यात प्रसिद्ध आहे.

बिरोबाची स्थापना झाल्यानंतर परिसरातले अनेक भक्त दर्शनासाठी कौठवाडीला येऊ लागले. मनातील सुखदुःख देवाला सांगू लागले. लोकांची या देवावरील श्रध्दा वाढू लागली. पूर्वीपासून भोईर आडनावाच्या माणसाकडे देवाच्या पूजेचा मान आहे. आता या मंदिराची पूजाअर्चा भोईर हे करतात. या देवाला वरणभाताचा नैवेदय दिला जातो. पूर्वी  भोईर या भक्ताच्या अंगात येत असे. गावचा कठा तेच उचलत असत. 

कौल लावणे

बिरोबा देवाला दर रविवारी मक्तगण कौल लावण्यासाठी येतात. कौल लावण्याची वेळ ही सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत असते. स्त्रियांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. भक्ताच्या हाताने कौल लावला जातो. आपल्या मनातील इच्छा देवाला बोलून दाखविली जाते. देवाला कौल लावतांनी पूजारी दोन प्रसाद (गोल वर्तुळाकार दगड) देवाच्या उजव्या व डाव्या बाजूला ठेवले जातात. नवस बोललेला नवस पूर्ण होणार असेल तर उजवा प्रसाद खाली येतो. व यात्रेला नवस फेडण्यासाठी कठा अर्पण केला जातो. कौल जर डाव्या बाजूचा खाली आला तर देव नवसाला पावत नाही अशी अख्यायिका आहे.

बिरोबाचा परिसर

बिरोबा मंदिराचा परिसर रम्य असा आहे. अनेक डोंगरांनी वेढलेले हे कौठवाडी गाव आहे. गावाच्या माथ्यावर बिरोबाचे भव्य असे मंदिर आहे. या परिसराची देखभाल  भोईर हेच करतात. मंदिरासमोर भव्य असा सभामंडप दिलेला आहे. त्यामुळे उत्सवप्रसंगी भक्तगणांची निवाऱ्याची चांगली सोय झालेली आहे. मंदिरासमोरच गरुडकाठी आहे. काही जुने थडगे बघावयास मिळतात. मंदिरासमोर वरसाचे झाड आहे, त्याला देवाचे झाड असेही म्हणतात. समोरच चार फुट उंचीच्या दोन दिपमाळा आहेत. कल्याच्या दिवशी त्या पेटवतात. भक्त गणांना या मंदिर परिसरात आल्यानंतर आनंदी न प्रसन्न वाटते. ईश्वराच्या ओढीने आलेला भक्त आनंदी होऊन परतीचा प्रवास करतो.
बिरोबाची यात्रा अक्षय तृतीयाच्या  येणारे पहिल्या रविवारी असते. नवस बोलणारे भक्त चन्दा सावण्यासाठी येतात. या दिवशी सर्व भक्त उपवास धरतात. यात्रेत पूर्वी बिरोबाचा पहिला कठा उचलण्याचा मान भोईरांचाच होता. आता कालपरत्वे त्यात बदल झालेला बघावयास मिळतो. कठा म्हणजे मडके याला भदी असेही म्हणतात. ही भदी पाठीमागून कापतात. सुतार समाजातील कारागीर ही मदी कापून व त्याचा देवाचा कठा बनवून देतात. दीन्याच्या धाग्याने त्याला विणून घेतात. सामत्याने त्याला छिद्र पाडले जातात. कापलेल्या मदीचा टुकडा आत ठेवला जातो. मदी उलटी करून त्यात खैर व सागाची लाकडे टाकली जातात.

पूजार्याच्या हाताने त्यात कापूर, सरकी, लिंबू, गोमुत्र, सुपारी, हाळद, कुंकु ठेवले जाते. कठयासाठी नवस बोलणारे लोक पाच किलो तेल कठ्यासाठी देतात. दुपारी बारावाजता कठे कापण्यास सुरूवात होते. ते संध्याकाठी आठ वाजेपर्यंत कठयाची तयारी चालते. ती सदी पेटवली की त्याला कठा असे म्हणतात. पूर्वी चिलवडीहून यात्रेच्या दिवशी बिरोबाची काठी येत असे. आता साकिरवाडीहून भांगरेची काठी येते. रात्री सात वाजता काठी येते. काठी आल्यावर देवाला परशी (देवाला भेटणे) लावतात. कठा पेटवण्याआधी परातीत ठेवतात. यानंतर कठे पेटवले जातात. गावकीचा एकच कठा असतो. कठा ठेवण्यासाठी नव्या टॉवेलाची चुबळ करतात. भक्ताच्या अंगात आल्यावर एक एक भक्त कठा उचलतो. नवस बोलणारा कठ्याच्या मागे चालतो. ज्याने कठा उचललेला आहे, त्याच्या अंगावर उकळलेले तेल पडत असते. त्याला पुसण्याचे काम नवस बोलणारा करत असतो.

दरवर्षी 70 ते 80 कठे उचलले जातात. एक फेरी पंधरा मिनिटाची असते. रात्री बारा वाजेपर्यंत कठयाला मिरविले जाते. भक्ताने कठा उचलल्यावर तेल टाकण्यासाठी भक्त खुटामेटावर बसतो व तेल टाकण्याचे काम नवस बोलणारा करतो. फेऱ्या मारल्यानंतर दीपमाळेजवळ कठे उतरवले जातात. रात्री बारा नंतर यात्रेकरू व गावकऱ्यांसाठी मनोरंजन म्हणून तमाशाचा कार्यक्रम असतो.

अकोले तालुक्यात अनेक देवस्थाने आहेत. त्यांचाही अभ्यास करावयाचा आहे. कौठवाडीच्या यात्रेला विशेष असे महत्त्व आहे. पुणे, मुंबई, नाशिक, अशा दूरवरून यात्रेच्या वेळी भक्त येतात. आनंदाने आपला नवस फेडतात. दोन-दोन दिवस या यात्रेसाठी भक्तगण गावात पाहुणे म्हणून येतात. यात्रेच्या काळात गावात उत्सवाचे वातावरण असते. कठा बघण्यासाठी हजारो लोक उपस्थित असतात. रात्रीच्या अंधारात कठयाचे दृश्य विलोभनिय असते. गावात दिवशी सर्व पाहुण्यांना आनंदाने जेवण दिले जाते. अशी ही बिरोबाची यात्रा स्मरणात राहिल अशीच असते.                         

Sunday, January 23, 2022

संगमनेरचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सध्या शहराबाहेर सुरु असलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे होत

चेहऱ्याचे सौदर्य दाखविण्याचे काम आरसा करत असतोत्याचप्रमाणे एखाद्या शहराचे सौदर्य दाखविण्याचे काम आरश्याच्या रुपाने गावातील रस्ते आणि इमारती करत असतातसंगमनेरचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सध्या शहराबाहेर सुरु असलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे होत आहेकाही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये प्रवेश करायचा अथवा संगमनेरमधुन पुढे जायचे म्हटले तर शहरातील वाहतुक कोंडीमुळ नाकीनऊ येतशहरात प्रवेश करतांनाच हतबल अवस्था झालेली व्यक्ती शहरातील अंतर्गत रस्त्यामुळे आणखीनच त्रस्त होत असेजुन्या गावठाणातील रस्त्यांची अडचण सोडली तर शहरातील रस्त्यांचा हा प्रश्न आता खुप अंशी मार्गी लागला आहेत्यामुळे शहराचे सौदर्यदेखील चकाकु लागले आहे.

              प्रवरा नदीवरील पुलतीन बत्ती चौकपंचायत समिती रस्ताकृषी उत्पन्न बाजार समिती परिसरबसस्थानक चौकअकोले नाका ही शहरातील प्रवेशद्वारे वाहतुकीच्या कोंडीची ठिकाणी म्हणुन परिचित होतीया ठिकाणच्या वाहतुक कोंडीत प्रवाश्यांच्या वाहनातील इंधनाची नासाडीधुरामुळे होणारे प्रदुषणवाहतुक कोंडीमुळे होणारा मनस्ताप तर नित्याचाच झाला होतावाहतुकीची ही कोंडी सोडविण्यासाठी पोलीस दलाचाही बराच वेळ जातवाहतुक कोंडी झाली की कोणीतरी पोलीसांना फोन करत आणि ही कोंडी सोडविण्याची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागत असेत्यातुन सत्ताधाऱ्यांचेदेखील अपयश समोर येतमात्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रस्त्याच्या प्रश्नात गांभीयार्ने लक्ष घातल्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातुन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी शहरातील अनेक रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करण्याला प्राधान्य दिलेशहरातील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण होत असतांना शहरातील प्रवेशद्वारावरील कोंडी सोडविण्यासाठी सर्वप्रथम मंत्री थोरात यांनी शहराबाहेरुन जाणाऱ्या बाह्यवळण मार्गाचे काम मार्गी लावलेयातुन काही अंशी कोंडी सुटली तरी मुळ प्रश्न तसाच होतात्यामुळे प्रवरा नदीवरील पुलाचे रुंदीकरण करण्यात आले.

              नाशिक-पुणे मार्ग शहराबाहेरुन गेल्यानंतर संगमनेर शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी पाऊले टाकली  गेलीमंत्री थोरात यांनी यासाठी आपले  मैत्रीपुर्ण संबध वापरत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच साकडे घातलेगडकरी यांनीदेखील राजकीय अभिनिवेष न बाळगता शहरातुन जाणाऱ्या आणि बाह्यवळण मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिलायात थोरात यांनी राज्य सरकारच्या माध्यमातुन आणखी निधी मिळवत या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ केलाएकूण चार टप्प्यात होणाऱ्या या कामाचे दोन टप्पे सुरुवातीला सुरु आहेमात्र रुंदीकरणाचा खरा कस शेवटच्या टप्प्यातील बसस्थानक ते प्रवरा पुल या कामात लागणार आहेसध्या सुरु असलेल्या अमृतवाहिनी कॉलेज ते सह्याद्री महाविद्यालयापर्यतच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे रस्ता भव्यदिव्य भासु लागला आहेयेत्या दिवाळीपर्यत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे ध्येय सार्वजनिक बांधकाम विभागाने समोर ठेवले आहे.

              या मार्गाच्या कामात रस्ता रुंदीकरण करतांना असलेले अडथळे हटविले जात असून काही ठिकाणी प्रशासनाचा हातोडादेखील पडत आहेमात्र कोणताही वादविवाद न होता हे काम विनासायास सुरु असले तरी उपनगराच्या तोंडाशी आलेले काम आता शहरात सुरु होणार असल्याने मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे काढावी लागणार आहेतरस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणामुळे येथे खरा कस लागणार आहेतिसऱ्या टप्प्यातील रायतेवाडी फाटा बाह्यवळण मार्ग ते प्रवरा पुलापर्यतच्या कामालादेखील फारसे अडथळे येतील असे वाटत नाहीत्यामुळे शेवटचा टप्पा निर्णायक ठरणार आहेतीन टप्प्याचे काम पुर्ण झाल्यानंतर हे काम पुढे जाणार असले तरी नाईलाजाने का होईना या मार्गातील अनेक अडथळे प्रशासनाला प्रसंगी बळाचा वापर करुन दुर करावे लागतीलतसे न झाल्यास सध्या शहरातील बाजारपेठेची जी अवस्था संगमनेरकर बघत आहे तशीच अवस्था शहरातील या भागातील होण्यास वेळ लागणार नाहीपरिणामी या भागातील सर्व व्यवसाय देखील बंद पडण्याची भिती आहेहे व्यवसाय नव्याने विकसीत होणाऱ्या भागात 

Saturday, September 4, 2021

आपल्या देशातील वनविभाग अजूनही ब्रिटिश काळात वावरत आहे. ब्रिटिशांच्या काळात वनखात्याचं नाव ‘वन व महसूल खातं’ असं होतं. कारण येथील जंगलं तोडून ब्रिटिशांना महसूल मिळायचा. त्यावेळचा वरिष्ठ अधिकारी (उप वनसंरक्षमक दर्जाचा) जणू संस्थानिक असायचा. बहुतांशी हे अधिकारी गोरेच असायचे. त्याचं जंगलातील निवासस्थान अतिशय अलिशान, त्याच्या घरात नोकर-चाकर, असा सगळा जामानिमा असायचा. ब्रिटिश जाऊन ७५ वर्षे झाली, तरी अजूनही आयएफएस अधिकारी स्वतःला संस्थानिकच समजत आहेत.हे अधिकारी प्रामुख्यानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांतून नियुक्त झालेले (आयएफएस) आहेत. ते व राज्य लोकसेवा आयोगाकडून आलेले अधिकारी यांच्यात पराकोटीची विषमता व अस्पृष्यता आहे. आयएफएस अधिकाऱ्यांची लॉबीही अतिशय ताकदवर, सरंजामी विचारसरणीची व कोणत्याही सरकारला न जुमानणारी आहे.वनखात्यात गेल्या मार्च महिन्यात गाजलेलं दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण दडपण्यासाठी आता ही लॉबी आपली सर्व ताकद लावत आहे. दीपाली राज्य लोकसेवा आयागोच्या परीक्षेतून झालेल्या वनक्षेत्रपाल किंवा वन परिक्षेत्र अधिकारी (रेंज फॉरेस्ट अधिकारी) होत्या. मेळघाट मधील हरिसाल येथे त्या कार्यरत होत्या. ‘लेडी सिंघम’ म्हणून लौकीक असलेल्या चव्हाण यांची कामातून मिळालेली लोकप्रियता त्यांचे वरिष्ठ असलेल्या विनोद शिवकुमार या आयएफएस अधिकाऱ्याला देखवली गेली नाही. त्यामुळे त्यानं त्यांना जगणं नकोसं वाटावं इतका छळ केला. त्यातूनच चव्हाण यांनी २५ मार्च रोजी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यांनी छळाची सर्व हकिकत लिहून ठेवली नसती, तर हे प्रकरण सहज दडपलं गेलं असतं. पण, त्यांनी सर्व तपशीलवार व हृदयाला भिडणाऱ्या अतिशय संवेदनशील शब्दांत हे सर्व लिहून ठेवलं. त्यामुळे वनखात्यातील दूर जंगलांत काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या छळाला वाचा फुटली. राज्यभर हे प्रकरण गाजलं.या प्रकरणी चौकशीसाठी वनखात्यानं नेमलेल्या समितीचे अध्यक्ष व नागपूरचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. के. राव यांनी, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांचे मनोधैर्य खचले म्हणून त्यांनी आत्महत्या केली, असा निष्कर्ष काढला आहे. सेवानिवृतीच्या शेवटच्या दिवशी अहवालातून त्यांनी समितीच्या आतापर्यंतच्या कामासंदर्भात एक नोट तयार करून ती समितीच्या सर्व सदस्यांना समोर मांडली. अर्थात, हा कथित अहवाल अंतिम नाही. या अहवालावर समितीमधील एकाही सदस्याची स्वाक्षरी नाही. ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत समितीने अहवालावर शिक्कामोर्तब केलेलं नाही, असंही सांगितलं जात आहे. पण, त्यातील माहिती बाहेर आल्यामुळे वनखात्यात संतापाची लाट उसळली आहे. वरिष्ठ आयएफएस अधिकारी आपल्या लॉबीतील अधिकाऱ्यांना निवृत्तीच्या शेवटच्या दिवशीही कसं वाचवण्याचा प्रयत्न करतात, याचं हे उदाहरण आहे.आत्महत्या करण्यापूर्वी चव्हाण यांनी वेगवेगळ्या तीन प्रकारच्या सुसाईड नोट लिहून ठेवल्या होत्या. यात एका चार पानी नोटमध्ये विनोद शिवकुमार हाच आत्महत्येस कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यावेळचे मेळघाटचे संचालक एम. एस. रेड्डी यांनी विनोद शिवकुमार याचे उद्योग वेळीच रोखले असते, तर आत्महत्या करण्याचा प्रसंग ओढवला नसता, ही बाब दीपाली यांनी स्पष्ट केली आहे. त्यांचा कसा छळ झाला, या संबंधी सर्व घटना त्यांनी तपशीलवार नोंदवल्या आहेत. त्यांचा विचार न करता राव यांनी स्वत: तयार केलेल्या अहवालातून विनोद शिवकुमार, एम.एस. रेड्डी हे दोषी नाहीत, असा अहवाल सादर केला आहे. अधिकाऱ्यांत हा निर्ढावलेपणा वनखात्याचे मंत्री य़ा लॉबीपुढे सपशेल लोटांगण घालत असल्यानंच आल्याचं वनखात्यात बोललं जात. आता ७ सप्टेंबर रोजी चौकशी समितीची बैठक होईल तेव्हा, राव यांच्या अहवालावर चर्चा होईल आणि त्यात सदस्य आपली बाजू मांडतील. तेव्हाच राव यांची नोट ग्राह्य धरायची की नाही, हे ठरवलं जाणार आहे. पण, राव यांचा अहवाल किंवा स्पेशल नोट बाहेर फुटल्यानं तिच्यावर पांघरूण घालणं अवघड जाणार आहे.या घटनेनं एक स्पष्ट झालं आहे, की वनखात्याचे वरिष्ठ अधिकारी अजूनही सरंजामशाहीच्या मानसिकतेतच आहेत. वनखात्याबाबत ते जंगलांत काय करतात हे कायम गूढ राहतं, असं बोललं जातं. कारण या खात्याची कार्यपद्धतीच अशी आहे.देशात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. ही समानता वनखात्यातील विनोद शिवकुमारसारख्याला मान्य नसावी. त्याला संरक्षण देणाऱ्यांचीही तीच मानसिकता या प्रकरणातून दिसून आली आहे. ही सरंजामशाही मोडून काढण्याची गरज आहे. त्यासाठी या अधिकाऱ्यांच्या विरोधात राज्य लोकसेवा अधिकाऱ्यांच्या संघटनांनी उठाव करणं आवश्यक आहे. कारण वनांसारख्या पर्यावरणासाठी संवेदनशील असलेल्या खात्यात चव्हाण यांच्यासारख्या वनांच्या संरक्षणासाठी सर्वस्व देणाऱ्या कर्तबगार व धडाडीच्या अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीनं आत्महत्येची वेळ आली, तर देशातील वनं व पर्यायानं पर्यावरणाला वाचवणं अवघड होणार आहे.


वनखात्यातील सरंजामशाही

आपल्या देशातील वनविभाग अजूनही ब्रिटिश काळात वावरत आहे. ब्रिटिशांच्या काळात वनखात्याचं नाव ‘वन व महसूल खातं’ असं होतं. कारण येथील जंगलं तोडून ब्रिटिशांना महसूल मिळायचा. त्यावेळचा वरिष्ठ अधिकारी (उप वनसंरक्षमक दर्जाचा) जणू संस्थानिक असायचा. बहुतांशी हे अधिकारी गोरेच असायचे. त्याचं जंगलातील निवासस्थान अतिशय अलिशान, त्याच्या घरात नोकर-चाकर, असा सगळा जामानिमा असायचा. ब्रिटिश जाऊन ७५ वर्षे झाली, तरी अजूनही आयएफएस अधिकारी स्वतःला संस्थानिकच समजत आहेत.

हे अधिकारी प्रामुख्यानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांतून नियुक्त झालेले (आयएफएस) आहेत. ते व राज्य लोकसेवा आयोगाकडून आलेले अधिकारी यांच्यात पराकोटीची विषमता व अस्पृष्यता आहे. आयएफएस अधिकाऱ्यांची लॉबीही अतिशय ताकदवर, सरंजामी विचारसरणीची व कोणत्याही सरकारला न जुमानणारी आहे.

वनखात्यात गेल्या मार्च महिन्यात गाजलेलं दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण दडपण्यासाठी आता ही लॉबी आपली सर्व ताकद लावत आहे. दीपाली राज्य लोकसेवा आयागोच्या परीक्षेतून झालेल्या वनक्षेत्रपाल किंवा वन परिक्षेत्र अधिकारी (रेंज फॉरेस्ट अधिकारी) होत्या. मेळघाट मधील हरिसाल येथे त्या कार्यरत होत्या. ‘लेडी सिंघम’ म्हणून लौकीक असलेल्या चव्हाण यांची कामातून मिळालेली लोकप्रियता त्यांचे वरिष्ठ असलेल्या विनोद शिवकुमार या आयएफएस अधिकाऱ्याला देखवली गेली नाही. त्यामुळे त्यानं त्यांना जगणं नकोसं वाटावं इतका छळ केला. त्यातूनच चव्हाण यांनी २५ मार्च रोजी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यांनी छळाची सर्व हकिकत लिहून ठेवली नसती, तर हे प्रकरण सहज दडपलं गेलं असतं. पण, त्यांनी सर्व तपशीलवार व हृदयाला भिडणाऱ्या अतिशय संवेदनशील शब्दांत हे सर्व लिहून ठेवलं. त्यामुळे वनखात्यातील दूर जंगलांत काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या छळाला वाचा फुटली. राज्यभर हे प्रकरण गाजलं.

या प्रकरणी चौकशीसाठी वनखात्यानं नेमलेल्या समितीचे अध्यक्ष व नागपूरचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. के. राव यांनी, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांचे मनोधैर्य खचले म्हणून त्यांनी आत्महत्या केली, असा निष्कर्ष काढला आहे. सेवानिवृतीच्या शेवटच्या दिवशी अहवालातून त्यांनी समितीच्या आतापर्यंतच्या कामासंदर्भात एक नोट तयार करून ती समितीच्या सर्व सदस्यांना समोर मांडली. अर्थात, हा कथित अहवाल अंतिम नाही. या अहवालावर समितीमधील एकाही सदस्याची स्वाक्षरी नाही. ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत समितीने अहवालावर शिक्कामोर्तब केलेलं नाही, असंही सांगितलं जात आहे. पण, त्यातील माहिती बाहेर आल्यामुळे वनखात्यात संतापाची लाट उसळली आहे. वरिष्ठ आयएफएस अधिकारी आपल्या लॉबीतील अधिकाऱ्यांना निवृत्तीच्या शेवटच्या दिवशीही कसं वाचवण्याचा प्रयत्न करतात, याचं हे उदाहरण आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी चव्हाण यांनी वेगवेगळ्या तीन प्रकारच्या सुसाईड नोट लिहून ठेवल्या होत्या. यात एका चार पानी नोटमध्ये विनोद शिवकुमार हाच आत्महत्येस कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यावेळचे मेळघाटचे संचालक एम. एस. रेड्डी यांनी विनोद शिवकुमार याचे उद्योग वेळीच रोखले असते, तर आत्महत्या करण्याचा प्रसंग ओढवला नसता, ही बाब दीपाली यांनी स्पष्ट केली आहे. त्यांचा कसा छळ झाला, या संबंधी सर्व घटना त्यांनी तपशीलवार नोंदवल्या आहेत. त्यांचा विचार न करता राव यांनी स्वत: तयार केलेल्या अहवालातून विनोद शिवकुमार, एम.एस. रेड्डी हे दोषी नाहीत, असा अहवाल सादर केला आहे. अधिकाऱ्यांत हा निर्ढावलेपणा वनखात्याचे मंत्री य़ा लॉबीपुढे सपशेल लोटांगण घालत असल्यानंच आल्याचं वनखात्यात बोललं जात. आता ७ सप्टेंबर रोजी चौकशी समितीची बैठक होईल तेव्हा, राव यांच्या अहवालावर चर्चा होईल आणि त्यात सदस्य आपली बाजू मांडतील. तेव्हाच राव यांची नोट ग्राह्य धरायची की नाही, हे ठरवलं जाणार आहे. पण, राव यांचा अहवाल किंवा स्पेशल नोट बाहेर फुटल्यानं तिच्यावर पांघरूण घालणं अवघड जाणार आहे.

या घटनेनं एक स्पष्ट झालं आहे, की वनखात्याचे वरिष्ठ अधिकारी अजूनही सरंजामशाहीच्या मानसिकतेतच आहेत. वनखात्याबाबत ते जंगलांत काय करतात हे कायम गूढ राहतं, असं बोललं जातं. कारण या खात्याची कार्यपद्धतीच अशी आहे.

देशात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. ही समानता वनखात्यातील विनोद शिवकुमारसारख्याला मान्य नसावी. त्याला संरक्षण देणाऱ्यांचीही तीच मानसिकता या प्रकरणातून दिसून आली आहे. ही सरंजामशाही मोडून काढण्याची गरज आहे. त्यासाठी या अधिकाऱ्यांच्या विरोधात राज्य लोकसेवा अधिकाऱ्यांच्या संघटनांनी उठाव करणं आवश्यक आहे. कारण वनांसारख्या पर्यावरणासाठी संवेदनशील असलेल्या खात्यात चव्हाण यांच्यासारख्या वनांच्या संरक्षणासाठी सर्वस्व देणाऱ्या कर्तबगार व धडाडीच्या अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीनं आत्महत्येची वेळ आली, तर देशातील वनं व पर्यायानं पर्यावरणाला वाचवणं अवघड होणार आहे.

LEAVE A REPLY


वनखात्यातील सरंजामशाही

आपल्या देशातील वनविभाग अजूनही ब्रिटिश काळात वावरत आहे. ब्रिटिशांच्या काळात वनखात्याचं नाव ‘वन व महसूल खातं’ असं होतं. कारण येथील जंगलं तोडून ब्रिटिशांना महसूल मिळायचा. त्यावेळचा वरिष्ठ अधिकारी (उप वनसंरक्षमक दर्जाचा) जणू संस्थानिक असायचा. बहुतांशी हे अधिकारी गोरेच असायचे. त्याचं जंगलातील निवासस्थान अतिशय अलिशान, त्याच्या घरात नोकर-चाकर, असा सगळा जामानिमा असायचा. ब्रिटिश जाऊन ७५ वर्षे झाली, तरी अजूनही आयएफएस अधिकारी स्वतःला संस्थानिकच समजत आहेत.

हे अधिकारी प्रामुख्यानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांतून नियुक्त झालेले (आयएफएस) आहेत. ते व राज्य लोकसेवा आयोगाकडून आलेले अधिकारी यांच्यात पराकोटीची विषमता व अस्पृष्यता आहे. आयएफएस अधिकाऱ्यांची लॉबीही अतिशय ताकदवर, सरंजामी विचारसरणीची व कोणत्याही सरकारला न जुमानणारी आहे.

वनखात्यात गेल्या मार्च महिन्यात गाजलेलं दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण दडपण्यासाठी आता ही लॉबी आपली सर्व ताकद लावत आहे. दीपाली राज्य लोकसेवा आयागोच्या परीक्षेतून झालेल्या वनक्षेत्रपाल किंवा वन परिक्षेत्र अधिकारी (रेंज फॉरेस्ट अधिकारी) होत्या. मेळघाट मधील हरिसाल येथे त्या कार्यरत होत्या. ‘लेडी सिंघम’ म्हणून लौकीक असलेल्या चव्हाण यांची कामातून मिळालेली लोकप्रियता त्यांचे वरिष्ठ असलेल्या विनोद शिवकुमार या आयएफएस अधिकाऱ्याला देखवली गेली नाही. त्यामुळे त्यानं त्यांना जगणं नकोसं वाटावं इतका छळ केला. त्यातूनच चव्हाण यांनी २५ मार्च रोजी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यांनी छळाची सर्व हकिकत लिहून ठेवली नसती, तर हे प्रकरण सहज दडपलं गेलं असतं. पण, त्यांनी सर्व तपशीलवार व हृदयाला भिडणाऱ्या अतिशय संवेदनशील शब्दांत हे सर्व लिहून ठेवलं. त्यामुळे वनखात्यातील दूर जंगलांत काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या छळाला वाचा फुटली. राज्यभर हे प्रकरण गाजलं.

या प्रकरणी चौकशीसाठी वनखात्यानं नेमलेल्या समितीचे अध्यक्ष व नागपूरचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. के. राव यांनी, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांचे मनोधैर्य खचले म्हणून त्यांनी आत्महत्या केली, असा निष्कर्ष काढला आहे. सेवानिवृतीच्या शेवटच्या दिवशी अहवालातून त्यांनी समितीच्या आतापर्यंतच्या कामासंदर्भात एक नोट तयार करून ती समितीच्या सर्व सदस्यांना समोर मांडली. अर्थात, हा कथित अहवाल अंतिम नाही. या अहवालावर समितीमधील एकाही सदस्याची स्वाक्षरी नाही. ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत समितीने अहवालावर शिक्कामोर्तब केलेलं नाही, असंही सांगितलं जात आहे. पण, त्यातील माहिती बाहेर आल्यामुळे वनखात्यात संतापाची लाट उसळली आहे. वरिष्ठ आयएफएस अधिकारी आपल्या लॉबीतील अधिकाऱ्यांना निवृत्तीच्या शेवटच्या दिवशीही कसं वाचवण्याचा प्रयत्न करतात, याचं हे उदाहरण आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी चव्हाण यांनी वेगवेगळ्या तीन प्रकारच्या सुसाईड नोट लिहून ठेवल्या होत्या. यात एका चार पानी नोटमध्ये विनोद शिवकुमार हाच आत्महत्येस कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यावेळचे मेळघाटचे संचालक एम. एस. रेड्डी यांनी विनोद शिवकुमार याचे उद्योग वेळीच रोखले असते, तर आत्महत्या करण्याचा प्रसंग ओढवला नसता, ही बाब दीपाली यांनी स्पष्ट केली आहे. त्यांचा कसा छळ झाला, या संबंधी सर्व घटना त्यांनी तपशीलवार नोंदवल्या आहेत. त्यांचा विचार न करता राव यांनी स्वत: तयार केलेल्या अहवालातून विनोद शिवकुमार, एम.एस. रेड्डी हे दोषी नाहीत, असा अहवाल सादर केला आहे. अधिकाऱ्यांत हा निर्ढावलेपणा वनखात्याचे मंत्री य़ा लॉबीपुढे सपशेल लोटांगण घालत असल्यानंच आल्याचं वनखात्यात बोललं जात. आता ७ सप्टेंबर रोजी चौकशी समितीची बैठक होईल तेव्हा, राव यांच्या अहवालावर चर्चा होईल आणि त्यात सदस्य आपली बाजू मांडतील. तेव्हाच राव यांची नोट ग्राह्य धरायची की नाही, हे ठरवलं जाणार आहे. पण, राव यांचा अहवाल किंवा स्पेशल नोट बाहेर फुटल्यानं तिच्यावर पांघरूण घालणं अवघड जाणार आहे.

या घटनेनं एक स्पष्ट झालं आहे, की वनखात्याचे वरिष्ठ अधिकारी अजूनही सरंजामशाहीच्या मानसिकतेतच आहेत. वनखात्याबाबत ते जंगलांत काय करतात हे कायम गूढ राहतं, असं बोललं जातं. कारण या खात्याची कार्यपद्धतीच अशी आहे.

देशात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. ही समानता वनखात्यातील विनोद शिवकुमारसारख्याला मान्य नसावी. त्याला संरक्षण देणाऱ्यांचीही तीच मानसिकता या प्रकरणातून दिसून आली आहे. ही सरंजामशाही मोडून काढण्याची गरज आहे. त्यासाठी या अधिकाऱ्यांच्या विरोधात राज्य लोकसेवा अधिकाऱ्यांच्या संघटनांनी उठाव करणं आवश्यक आहे. कारण वनांसारख्या पर्यावरणासाठी संवेदनशील असलेल्या खात्यात चव्हाण यांच्यासारख्या वनांच्या संरक्षणासाठी सर्वस्व देणाऱ्या कर्तबगार व धडाडीच्या अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीनं आत्महत्येची वेळ आली, तर देशातील वनं व पर्यायानं पर्यावरणाला वाचवणं अवघड होणार आहे.

LEAVE A REPLY

Thursday, August 26, 2021

राघोजी भांगरे यांचा भूतकाळ

भांगरे, राघोजी : ( ८ नोव्‍हेंबर १८०५ – २ मे १८४८ ). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक. त्‍यांचा जन्‍म अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव (ता. अकोले) येथे रामजी व रमाबाई या दाम्पत्यापोटी महादेव कोळी जमातीत झाला. रामजी हे कोळी साम्राज्य असलेल्या जव्‍हारच्‍या मुकणे संस्‍थानच्‍या राजूर प्रांताचे सुभेदार होते. रामजी यांनी राघोजींना घरी शिक्षणाची व्‍यवस्‍था केली. पुढे राघोजी तलवारबाजी, भालाफेक, पट्टा चालविणे, बंदुकीने निशाणा साधणे, घोडेस्‍वारी करणे यांत तरबेज झाले.


राघोजी भांगरे यांचे स्मारक, अकोले, अहमदनगर (महाराष्ट्र).
पेशव्यांच्या पराभवानंतर (१८१८) ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारांत असलेले किल्ले, वतने यांकडे मोर्चा वळविला. त्यामुळे रामजी भांगरे यांच्या नेतृत्‍वाखाली रतनगडावर गोविंदराव खाडे, वाळोजी भांगरे, लक्षा ठाकर इत्यादींनी इग्रजांच्या विरोधात जाहीर उठाव केला; तथापि त्यांचा पराभव झाला (१८२१). रामजी भांगरे व गोविंदराव खाडे यांना अटक केली. पुढे खटला चालवून त्‍यांना काळ्या पाण्‍याची शिक्षा दिली. वडिलांच्‍या अनुपस्थितीत राघोजी आपल्‍या गावात पोलीस पाटील पदाचा कारभार पाहत होते. आपल्‍या चोख कारभारामुळे राजूर पोलीस ठाण्‍यात राघोजींना इतरांपेक्षा अधिक मान होता. राजूर प्रांताच्‍या रिक्‍त असलेल्‍या पोलीस अधिकारी पदासाठी राघोजींनी अर्ज केला; परंतु ब्रिटिशांनी ही मागणी फेटाळून अमृतराव कुलकर्णी यांची पोलीस अधिकारी म्‍हणून नेमणूक केली. पुढे कोकणातील एका दरोडा प्रकरणात राघोजींचा सहभाग असल्‍याचा खोटा अभिप्राय अमृतराव कुलकर्णी यांनी सरकारला पाठविला. वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी पुरेसा तपास न करताच राघोजींना अटक करण्‍याचा आदेश काढला. राघोजी पोलीस ठाण्‍यात हजर झाले. आपल्‍यावरील खोट्या आरोपाचा जाब त्यांनी विचारला. या दरम्‍यान राघोजी व अमृतराव यांच्‍यात बाचाबाची झाली. या वादात अमृतराव मारले गेले. पुढे राघोजी आणि इंग्रज यांच्यातील संघर्ष तीव्र झाला.

राघोजींचे संघटन कौशल्‍य चांगले होते. त्‍यांना मुळा खोरे, चाळीसगाव डांगाण, बारागाव पठार या परिसरातून विविध जातीजमातीचे अनेक तरुण येऊन मिळाले. अन्‍यायी अत्‍याचारी सरकार, सावकार, जमीनदार यांच्या विरोधात आवाज उ‍ठविण्‍याचे काम राघोजींच्‍या नेतृत्‍वाखाली सुरू झाले. राया ठाकर, देवजी आव्‍हाड हे त्यांचे सहकारी. पुढे त्यांनी कोतुळ राजूर व खीरवीरे परिसरातील जुलमी व अत्‍याचारी सावकारांवर धाडी टाकल्या. त्‍याची संपत्‍ती लुटून गोरगरिबांना वाटून टाकली, तसेच सावकारांनी कब्‍जा केलेल्‍या जमिनींचे सर्व कागद व दस्‍तऐवज यांची होळी केली. महिलांवर हात टाकणाऱ्या सावकारांचे कान, नाक कापले. राघोजींच्या वाढत्‍या दबदब्‍यामुळे या भागातील सावकार व जमीनदार आपले सर्व अधिकार सोडून अकोले व संगमनेर परिसरात गेले. पुढे राघोजींनी सावकारशाही विरोधातील लढा अधिक व्‍यापक करत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, सुरगाणा, पेठ, कळवण येथील सावकारशाहीविरुद्ध संघर्ष केला.

राघोजींचा बंदोबस्‍त करण्‍यासाठी ब्रिटिशांनी सु. दोनशे बंदूकधारी शिपायांची तुकडी पाठविली. याचवेळी राघोजींनी आपले निवासस्थान बाडगीच्‍या माचीवरून अलंग व कुलंग किल्‍ल्‍यावर हलविले. ब्रिटिश शिपाई घनदाट जंगलातून वाट काढत असताना राघोजींच्या साथीदारांनी त्यांच्यावर जोरदार हल्‍ला केला. या हल्‍ल्‍यामुळे शिपाई जंगलात सैरावैरा पळू लागले. देवजी आव्‍हाड, बापू भांगरे व खंडू साबळे या साथीदारांसह राघोजींनी अनेक शिपायांची कत्‍तल केली. या लढाईत राघोजींना मोठ्या प्रमाणात काडतुसे व बंदुका मिळाल्‍या. राघोजींच्या या कृत्याने इंग्रज सरकार हादरले. त्यांना पायबंद घालण्यासाठी इंग्रजांनी वेगवेगळे प्रयत्‍न केले. बक्षिसांचे आमिष दाखवले; परंतु यश येत नव्‍हते. शेवटी इंग्रज अधिकाऱ्यांनी राघोजींचा ठावठिकाणा शोधण्‍यासाठी अत्‍याचारी मार्ग अवलंबिला. त्यांच्या घरातील माणसांना त्रास द्यायला सुरुवात केली. वारंवार राघोजींच्‍या घरी धाडी घातल्‍या. तरीही काही हाती न लागल्‍याने शेवटी त्‍यांची आई रमाबाईला ताब्‍यात घेतले. तसेच गावागावांत जाऊन महादेव कोळी व ठाकर समाजातील इतर लोकांना छळले; परंतु त्‍याचाही उपयोग झाला नाही.

सातारचे छ. प्रतापसिंह भोसले यांनी राघोजींना सातारा भेटीचे आमंत्रण देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली होती. सातारा येथील पदच्युत छत्रपतींना पुन्हा गादीवर बसवावे म्हणून झालेल्या बंडात राघोजींचा सहभाग असावा, असे अभ्यासकांचे मत आहे.

राघोजी इंग्रजांशी छुप्‍या मार्गाने लढत होते. इंग्रजांशी समोरासमोर लढण्यासाठी त्यांनी जुन्नर येथे जाहीर उठाव केला (१८४५). यावेळी राघोजी व इंग्रज सैन्यांत तुंबळ लढाई झाली. राघोजी जुन्नर बाजारपेठेचा फायदा उठवत सहीसलामत बाहेर पडले. या उठावात त्यांनी मोठ्या प्रमाणात आपले साथीदार गमावले. त्‍यामुळे पुढे भूमिगत राहून लढा देण्‍याचे ठरविले. त्यांना पकडण्‍यासाठी इंग्रजांनी दहा हजार रुपये व गाव इनाम देण्‍याची घोषणा केली. पुढे ते पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आले असताना लेफ्टनंट जनरल गेल याने शेकडो पोलिसांचा फौजफाटा घेऊन मंदिराला वेढा दिला व राघोजींना ताब्यात घेतले (१८४७). त्‍यांच्यावर खटला भरून ठाणे येथील कारागृहात फाशी देण्यात आली.

Tuesday, August 3, 2021

भंडारदरा

दशरथ खाडे,भंडारदरा
दि.३-८-२०२१

भंडारदरा परिसरात भात आवणी

भंडारदरा(वार्ताहर)भंडारदरा ता.अकोले परिसरात गेल्या काही दिवसांपासुन मुसळधार पाऊस सुरु असुन भात आवणी करण्यास सुरुवात केली आहे.
            अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वत रांगांमध्ये आदिवासी बांधव राहतात.येथील शेतक-याच्या जमिनी डोंगर माथ्यावर अधिक प्रमाणात आहेत.
            येथील शेतक-यांचे भातपिक हे महत्वाचे असुन त्यामध्ये काळभात,इंद्रायणी या विविध भातपिके येथील शेतकरी घेतात.जवळपास सहा महिने भातपिकाचे उत्पन्न घेण्यास लागतात.त्यातही वेळेत पाऊस झाला तर पिक चांगले येते. पाऊस वेळेत आला नाही तर भातपिकही पुरेसे होत नाही.या पिकात कष्ठ जास्त असुन उत्पन्नही कमी आहे.
.............................................................