Sunday, May 31, 2020

अकोले तालुक्याचे लोकनेते आणि राज्याच्या राजकीय पटलावर

अकोले तालुक्याचे लोकनेते आणि राज्याच्या राजकीय पटलावर 
 अकोले 2020-05-30


अकोले , ता. ३०: विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्राप्त लौकिकापलीकडे काही निराळे पैलू असतात . हे पैलू जनमानसात फारसे झोतात नसतात . अपरिचित असतात . असे काही विलक्षण , हटके पैलू नजरेस आल्यास जाणवते ते वेगळेपण . अकोले तालुक्याचे लोकनेते आणि राज्याच्या राजकीय पटलावर प्रदीर्घ काळ मंत्रीपदाच्या दखलपात्र कार्याने चर्चेत राहिलेले मा . मधुकर पिचड हेदेखील असेच व्यक्तित्व .

राजकारण , सत्ता , आमदारकी , मंत्रीपद , कार्यकर्त्यांचा गोतावळा यापलीकडे मधुकर पिचड यांचा आगळा परिचय ठराविक परिघापलीकडे सुप्त स्वरूपात राहिला आहे , आणि तसा तो परिचय फार थोड्या लोकांना ठाऊक आहे ! असा वेगळा , पूर्णतः भिन्न पैलूंचा मागोवा याठिकाणी नजरेस आणून द्यायचा उद्देश आहे .

मा . पिचड हे , विख्यात तत्वचिंतक , स्वातंत्र्य संग्रामातील थोर सेनानी , ज्येष्ठ समाजवादी , हाडाचे शिक्षक तसेच ' साधना ' साप्ताहिकाचे माजी संपादक दिवंगत प्रा . ग . प्र . प्रधान ( प्रधान मास्तर ) यांचे लाडके विद्यार्थी ! पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रधान मास्तर पिचड यांचे शिक्षक होते . पिचड यांचे वक्तृत्व , धडाडीचे नेतृत्व गुण हेरून प्रधान यांनी स्नेह जपला ! ऐतिहासिक , चरित्रपर , तात्विक आणि चिंतनपर पुस्तकांचे वाचन हे पिचड साहेबांचे वैशिष्ट्य .

समाजकारणासह सर्वच क्षेत्री पिचड यांनी मुत्सद्देगिरी टिकवून ठेवली . माणसांची पारख तसेच सूक्ष्म अभ्यास वृत्ती त्यांच्याकडे आहे . प्रादेशिक क्षेत्राविषयी ससंदर्भ असलेला त्यांचा अभ्यास थक्क करणारा . स्मरणशक्तीची त्यांना असलेली देण ही वेगळी बाब विलक्षणच . पुरोगामी , परिवर्तनशील विचारांचा पिचड यांच्या आयुष्यावर असणारा प्रभाव मोलाचा आहे . छत्रपती शिवाजी महाराज , राजर्षी शाहू महाराज , महात्मा जोतीराव फुले - सावित्रीमाय फुले , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , गाडगेबाबा , क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्यासह अन्य महापुरुषांच्या विचारांचा - कार्याचा प्रभाव जसा पिचड यांच्यावर आहे तसाच कृतीशील ध्यासही त्यांना राहिला आहे .

अभ्यासक , संशोधक , साहित्यिक , कलाकार , विद्वत्ता यांविषयी पिचड यांना कायमच आदर राहिला आहे . जिद्द , धैर्य , मेहनत हे त्यांचे सद्गुण ठरलेत . शैक्षणिक क्षेत्राचा आदर ठेवणारे साहेब गुणांची कदर करणारे आहेत . प्रसंगोपात् सडेतोड बाणा , परखड स्वभावाने निर्णयक्षमतेची चुणूक दाखविणारे पिचड आदरयुक्त दबदबा टिकवून राहिले . प्रश्नांच्या चौफेर बाजू समजावून घेऊन चुकीची तडजोड न करता फैसला करायचा पिचड यांचा स्वभाव . आदिवासी , उपेक्षित वर्गातील जनतेच्या समस्यांवर पुरेपूर कागदपत्रे , आधारभूत पुरावे आणि मुळापासून संदर्भीय दुवे मिळवून सातत्यपूर्वक पाठपुरावा करणे हे पिचड यांचे वेगळे वैशिष्ट्य .

सत्य समजल्यावर वैर न करता खिलाडूपणाने परिस्थितीवर मात करणे आणि पुढे वाटचाल करणे हा आहे त्यांचा स्वभाव . क्षमाशील भाव हा कौतुकास्पद पैलू त्यांनी कायमस्वरूपी , सुरुवातीपासून जपला . सकारात्मक विचारसरणी हा आहे त्यांचा स्थायी भाव !

जन्मदिनाच्या स्नेहपूर्वक सदिच्छा ..

Saturday, May 30, 2020

गावाचा आधारवड

*गोष्ट परीसासारख्या माणसाची....*

*आहेर वसंतराव दिनकर(जादूगार,सर)प्रस्तुत-:मो-:9423387988*

*गणोऱ्या चा परीस...9423387988…*

गावचा आधारवड--: भाग-  *1*  2..3...4..5

[ *कै.पंढरीनाथ जिजाबा पा.आंबरे* ]

*अंबामातेची पवित्र नगरी अन आढळा माईचा काठ,या तीरावर वसलेलं गणोरे हे आमचं छोटंसं खेडेगाव..गावच्या चोहोबाजूंनी लाभलेलं निसर्गसौंदर्य ...गावात एकवटलेली बारा बलुतेदार जमात...पण या गावात जन्मलेली हाताच्या बोटावर मोजण्या इतकी,माणसं मात्र परिसा सारखी जगली..! आज गावची लोकसंख्या चार ते साडेचार ह्जार इतकीचं आहे*

*अज्ञान,अंधश्रद्धा आणि दारिद्र्यात पिचलेली माणसं घराघरात होती...अगदी किरकोळ गरजांसाठी संघर्षात जगणारी माणसं गणोऱ्या त एकवटलेली होती...सततचे कष्ट,मेहनत,रक्त आटेस्तोवर काम करून हि संसारात सुबत्ता येत नव्हती....पावसाच्या भरवश्यावर पेरणी करून आक्काशाकडे डोळे लावून बसलेल्या कष्टकऱ्याना तीन महिने काय खायचे याची भ्रांत असायची*

*याच अगतिकतेचा फायदा त्यावेळची सावकार मंडळी घ्यायची...पाऊस पाणी नीट पडला तर ठीक...नाहीतर याच जमिनी कर्जाच्या मुद्दल आणि व्याजापायी सावकाराच्या घशात जायच्या...!!*

*हि गोष्ट आहे १९२०-२१ या स्वातंत्र पूर्व काळातली-आंबरे जिजाबा आणि बजुबाई हे आमच्या गणोरे गावचं गरीब जोडपं*

*त्यांना चार मुलं पंढरी,तात्याबा,लक्ष्मण आणि पांडुरंग आणि एक मुलगी--बागायती जमीन एक दीड एकर....पंढरी,तात्याबा,लक्ष्मण आणि पांडुरंग या चार मुलांची  लग्न झाल्यानंतर त्यांच्या बायका,मुलं-मुली असं संसाराचा गाडा वाढत गेला—हाताची अन तोंडाची गाठ पडणं [पोट भरणं] मुश्कील होवून बसलं....खाणारी तोंड वाढतच होती.....*

*म्हणून वडिलांणी म्हणजे जिजाबांनी आपला मोठा मुलगा पंढरी याला आमच्या गणोरे गावचा मोहन दादा त्याचे वडील -किसन दळवी यांचा चुलत भाऊ सखाराम दळवी अशा एक दूरचे नातेसंबंध त्यावेळी पुण्याला होते-त्यांच्याकडे काहीतरी कामधंदा करावा म्हणून पंढरीला पुण्याला पाठवून दिले....*

*पंढरी पिळदार आणि चांगला धडधाकट शरीरयष्टीचा...पुण्यात पंढरी ला काय काम द्यायचे..?? असां पाहुण्यांना प्रश्न पडलेला —पंढरीचे शिक्षण चौथी-पाचवी पर्यंत झालेले...पण अक्षर मात्र मोत्यासारखे सुंदर...*

*पण मोठ्ठ्या आशेने पुण्यात आलेल्या पोराला काहीतरी कामधंदा मिळवून दिला पाहिजे म्हणून पाहुण्यांनी पंढरीला एका डाळमिल वाल्याकडे डाळीचे कट्टे उचलणे,त्याच्या थप्प्या लावणे,गाडीत माल भरने,तसा तो खाली हि करणे अशी कामे मिळवून दिली...*

*”चोरी-शिंदळकीची लाज असावी कामाची कासाली लाज” हि आईनं सांगितलेली उक्ती पंढरीच्या तनामनात भरली होती,म्हणून पंढरी हे हमालीचं काम देखिल मन लावून काम करू लागला...*

*त्याचं डाळमिलमध्येचं एक सदाशिव कोंडरे नावाचा,मावळ तालुक्यातील पोरगा पंढरी बरोबर हमालीचं काम करायचा...काम करता करता त्यांची  छान मैत्री जमली होती...पण हा सदाशिव निरक्षर होता...पण त्यांची मैत्री अभेद्य होती*

*व्हायचं काय कि,कधी कधी डाळमिल वाल्या मालकाच्या गैरहजेरीत मालाची गाडी यायची मग पंढरीच त्या गाडीचे बिल बनवायचा... गाडी खाली करून घायचा..मालकाने विकलेल्या मालाची बिले अचूक करून द्यायचा...*

*मालकाने त्याची हि हुशारी पाहून एकदा जमाखर्चाची बिले पंढरीला करायला सांगितली-अगदी अचूक तयार केलेली बिले पाहून मालक आश्चर्यचकित झाला..त्यात पंढरीचे अक्षर एकदम सुंदर आणि मोत्यासारखे---या पंढरीच्या कामावर मालकाची मर्जी बसली. आणि डाळमिल वाल्या मालकाने पंढरीचे हमालीचे काम काढून घेतले व आर्थिक व्यवहाराचे काम पंढरीकडे सोपावले*

*आता पंढरीचे  अनेक व्यापाऱ्यासोबात संबध येवू लागले..अन पंढरीला या धंद्यातील गणित समजले...माल कासा खरेदी करायचा.??तो मार्केटला कसा पाठवायचा..?? येथपासून ते डाळीची स्वच्छता ...माल भरणे ...ते मालाचा तेरीज ताळेबंद या साऱ्या गोष्टी जमायला लागल्या...पंढरी या कामात पारंगत झाला..!!*

*काही वर्ष काम केल्यानंतर एके दिवशी असंच गप्पा करता करता दादांनी आपला मित्र सदाशिव याला आपण स्वतंत्र डाळीचा व्यवसाय चालू करूया का..??हि कल्पना मांडली—सदाशिवला दादांचं व्यापारातलं कौशल्य एव्हाना कळालं होतचं.त्या रात्री दोघा मित्रांनी भागीदारीत डाळीचा व्यवसाय चालू करायच ठरवलं.दादांची टेकनिकल अक्कल हुशारी आणि सदाशिवचं भांडवल असं भागीदारीत धंदा चालू केला...*

पण काही वर्षातच जोमात चाललेला हा व्यवसाय-:

*तुझ्या भागभांडवला वर हा पंढरी नफा कमावतोय अशी कुणीतरी सदाशिव ला पिन मारली आण हां धंदा मोडीत काढला....*

पण????
*पंढरी आता हार मानणारा नव्हता...इतक्या दिवसाच्या अनुभवाची शिदोरी आणि  केलेल्या बचतीच्या जोरावर पंढरीने पुण्यामध्येच एक पाच गुंठे मोकळी जागा असलेल तीन मजली घर भाड्याने घेतले....आणि स्वतंत्र व्यवसायाला सुरुवात केली....*

*मोकळ्या जागेत तूर,मुग,मठ,हरबरा भिजवून वाळत टाकण्याची सोय केली आणि उर्वरित मोकळ्या जागेत हे धान्य भरडून त्यापासून डाळी तयार करण्याचं काम चालू केलं...घरच्या माणसांनी पंढरीला या कामात मदत केली अन अल्पावधीतच पंढरीचा धंदा जोमात सुरु झाला....*

*याच डाळमिलच्या धंद्याच्या जोरावर पंढरीने गनोऱ्याला गावाकडे बऱ्याचश्या शेतजमिनी खरेदी केल्या...व्यापार पण जोरात चालू होता...झालेल्या नफ्यातून गावाकडे जमिनी खरेदी चालूच होती असं करता करता पंढरीची गावाकडे गनोऱ्याला चालीस ते पन्नास एकर जमीन झाली... ...!!..धाकटा भाऊ लक्ष्मण जमीन कसू लागाला...त्याने हि भावाला साथ  देत शेती सांभाळली.!!*

*हमाली करणारा पोरगा स्वताच्या स्वकर्तृत्वावर मालदार झाला होता...आता गावाकडे आणि पुण्यात सर्वजण पंढरीला “आंबरे पाटील” म्हणू लागले....लहान भाऊ पंढरीला दादा म्हणत-ते पाहून इतर लोक हि हळूहळू पंढरीला आंबरे दादा म्हणू लागले...अशा पद्धतीने ते नंतर साऱ्या गावाचे पुणेकर/आंबरे पाटील/दादा म्हणून नावारुपास आले*

*एक दिवस दादांना पुण्यात समजल कि दातारांच्या अन काही आंबरेच्या जमिनी शेतकऱ्यांच्या अज्ञानापायी सावकाराने हडप केल्यात ...त्या रात्री दादांना निट झोप आली नाही—सलग आठवडाभर ते या विचाराने या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होते...सारा गाव मला दादा म्हणतोय,अन मी मात्र माझ्या या गावातल्या लहान भावंडाच्या जमिनी सावकाराच्या घशात जाताना ऐकतोय....*

*आणि एक दिवस दादांनी पुणं सोडण्याचा निर्णय घेतला....निव्वळ निर्णय घेवून ते थांबले नाहीत—तर आपल्या दोन पुतण्यांच्या ताब्यात डाळमिलचा धंदा सोपवून लगेच बैलगाडीने त्यांनी गावाकडची गणोऱ्याची वाट धरली....!!*

*पुण्यातील मित्र परीवाराने गावापायी स्व:ताचं वाटोळ करून घ्यायला निघाला म्हणून मुर्खात काढलं—पण दादांचा निश्चय पक्का झाला होता.....कारण पुण्यात आता त्यांना सुखाची झोप येणार नव्हती..!!*

*दादांच राहणीमान अगदी साधं होतं-दादांच्या मनावर त्यावेळी कॉग्रेसचा पगडा असल्याने,खादीचं धोतर,त्यावर खादीचाच शर्ट,डोक्याला खादिचीच टोपी,शर्ट वर घालायला कोट देखिल खादीचाच असायचा....इतके ते कॉग्रेसप्रेमी  होते*

*कोणत्याही मोठ्ठ्या कामाची सुरुवात हि अगोदर बाळपावलाने होत असते हे दादांना स्वातंत्रपूर्व काळात माहित होते...त्याचीच नांदी म्हणून------:दादांनी गावात आल्या आल्या दादांनी बालपणीचे मित्र-सवंगडी,जवळचे नातेवाईक-काही प्रेमाची माणसं यांच्या सोबत चर्चा केली..आपलं गावाला परत येण्याचं प्रयोजन सांगितल....*

*तेव्हा महाराष्ट्रात कुठ कुठ सोसायट्या सुरु होत होत्या.पण आमच्या गावातील लोकाना याबद्दल काही माहित नव्हत—दादांनी सोसायटीच महत्व समजावून सांगत,सहकरी तत्वावर हि योजना गणोऱ्यात राबवण्याचं मनावर घेतलं....स्व:ता मोठी आर्थिक झळ सोसून परिसरातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत शेतकऱ्याना नाममात्र फी भरून सभासद करून घेतलं....*

*आणि पहिली सहकारी तत्वावर चालनारी सोसायटी आमच्या गणोरे गावात अस्तित्वात आली.दादांनी गावासाठी उचललेलं हे पहिलं पाऊल....आणि येथून त्यांनी गावच्या विकास कार्याला सुरुवात केली..!! आता गरीब शेतकऱ्यांना शेती,बी-बियाणं यासाठी सावकारावर अवलंबून राहावं लागणार नव्हतं...*

*सोसायटीतून अगदी अल्प व्याजदरावर कर्ज मिळण्याची सोय दादांनी करून दिली....गावातील हातावर-मोलमजुरी करणारी श्रमिक जनता यांचेसाठी किराणा माल व धान्य मिळण्याची सोय देखिल सोसायटीतच केली....वर्षाच्या आतच सहकारी तत्वावर एक कापड दुकान देखिल गावात चालू केले.......*

*आता अन्न/वस्त्र/निवारा या लोकांच्या मुलभूत गरजा गावातल्या गावात भागू लागल्या...आणि दादांनी सहकारी तत्वावर स्थापन केलेल्या सोसायटी ची ख्याती महाराष्ट्रात दूर दूर पसरली...*

*त्याकाळी गनोऱ्याच्या सोसायटी चा कारभार कसा चालतो हे पाहण्यासाठी व माहिती करून घेण्यासाठी एकदा मराठवाड्यातील एकशे तीस सधन-श्रीमंत शेतकरी तीन बस-गाड्या करून गणोऱ्याला आले होते..”अतिथी देवो भव:”या उक्तीप्रमाणे तेव्हा सर्वांच्या जेवणाची,चहा-पाण्याची अन मुक्कामची सोय दादांनी आपल्या गणोरे गावात केली होती...हि घटना १९५६ साली घडली..!!*

*पडत-धडपडत विकासाचं पहिलं बालपाऊल पाऊल पडल होतं...आता तोल सांभाळत सांभाळत दादांनी विकासाच्या मार्गावर चालायचं [गावाला न्यायचं]ठरवल होतं.....!!*

क्रमशः....
[पुढील भाग सलग चार दिवस ठीक एक वाजता पोस्ट केले जातील.-]

गोष्ट पॅरिस माणसाची

*गोष्ट परीसासारख्या माणसाची....*

*आहेर वसंतराव दिनकर(जादूगार,सर)प्रस्तुत-:मो-:9423387988*

*गणोऱ्या चा परीस...9423387988…*

गावचा आधारवड--: भाग-  *1*  2..3...4..5

[ *कै.पंढरीनाथ जिजाबा पा.आंबरे* ]

*अंबामातेची पवित्र नगरी अन आढळा माईचा काठ,या तीरावर वसलेलं गणोरे हे आमचं छोटंसं खेडेगाव..गावच्या चोहोबाजूंनी लाभलेलं निसर्गसौंदर्य ...गावात एकवटलेली बारा बलुतेदार जमात...पण या गावात जन्मलेली हाताच्या बोटावर मोजण्या इतकी,माणसं मात्र परिसा सारखी जगली..! आज गावची लोकसंख्या चार ते साडेचार ह्जार इतकीचं आहे*

*अज्ञान,अंधश्रद्धा आणि दारिद्र्यात पिचलेली माणसं घराघरात होती...अगदी किरकोळ गरजांसाठी संघर्षात जगणारी माणसं गणोऱ्या त एकवटलेली होती...सततचे कष्ट,मेहनत,रक्त आटेस्तोवर काम करून हि संसारात सुबत्ता येत नव्हती....पावसाच्या भरवश्यावर पेरणी करून आक्काशाकडे डोळे लावून बसलेल्या कष्टकऱ्याना तीन महिने काय खायचे याची भ्रांत असायची*

*याच अगतिकतेचा फायदा त्यावेळची सावकार मंडळी घ्यायची...पाऊस पाणी नीट पडला तर ठीक...नाहीतर याच जमिनी कर्जाच्या मुद्दल आणि व्याजापायी सावकाराच्या घशात जायच्या...!!*

*हि गोष्ट आहे १९२०-२१ या स्वातंत्र पूर्व काळातली-आंबरे जिजाबा आणि बजुबाई हे आमच्या गणोरे गावचं गरीब जोडपं*

*त्यांना चार मुलं पंढरी,तात्याबा,लक्ष्मण आणि पांडुरंग आणि एक मुलगी--बागायती जमीन एक दीड एकर....पंढरी,तात्याबा,लक्ष्मण आणि पांडुरंग या चार मुलांची  लग्न झाल्यानंतर त्यांच्या बायका,मुलं-मुली असं संसाराचा गाडा वाढत गेला—हाताची अन तोंडाची गाठ पडणं [पोट भरणं] मुश्कील होवून बसलं....खाणारी तोंड वाढतच होती.....*

*म्हणून वडिलांणी म्हणजे जिजाबांनी आपला मोठा मुलगा पंढरी याला आमच्या गणोरे गावचा मोहन दादा त्याचे वडील -किसन दळवी यांचा चुलत भाऊ सखाराम दळवी अशा एक दूरचे नातेसंबंध त्यावेळी पुण्याला होते-त्यांच्याकडे काहीतरी कामधंदा करावा म्हणून पंढरीला पुण्याला पाठवून दिले....*

*पंढरी पिळदार आणि चांगला धडधाकट शरीरयष्टीचा...पुण्यात पंढरी ला काय काम द्यायचे..?? असां पाहुण्यांना प्रश्न पडलेला —पंढरीचे शिक्षण चौथी-पाचवी पर्यंत झालेले...पण अक्षर मात्र मोत्यासारखे सुंदर...*

*पण मोठ्ठ्या आशेने पुण्यात आलेल्या पोराला काहीतरी कामधंदा मिळवून दिला पाहिजे म्हणून पाहुण्यांनी पंढरीला एका डाळमिल वाल्याकडे डाळीचे कट्टे उचलणे,त्याच्या थप्प्या लावणे,गाडीत माल भरने,तसा तो खाली हि करणे अशी कामे मिळवून दिली...*

*”चोरी-शिंदळकीची लाज असावी कामाची कासाली लाज” हि आईनं सांगितलेली उक्ती पंढरीच्या तनामनात भरली होती,म्हणून पंढरी हे हमालीचं काम देखिल मन लावून काम करू लागला...*

*त्याचं डाळमिलमध्येचं एक सदाशिव कोंडरे नावाचा,मावळ तालुक्यातील पोरगा पंढरी बरोबर हमालीचं काम करायचा...काम करता करता त्यांची  छान मैत्री जमली होती...पण हा सदाशिव निरक्षर होता...पण त्यांची मैत्री अभेद्य होती*

*व्हायचं काय कि,कधी कधी डाळमिल वाल्या मालकाच्या गैरहजेरीत मालाची गाडी यायची मग पंढरीच त्या गाडीचे बिल बनवायचा... गाडी खाली करून घायचा..मालकाने विकलेल्या मालाची बिले अचूक करून द्यायचा...*

*मालकाने त्याची हि हुशारी पाहून एकदा जमाखर्चाची बिले पंढरीला करायला सांगितली-अगदी अचूक तयार केलेली बिले पाहून मालक आश्चर्यचकित झाला..त्यात पंढरीचे अक्षर एकदम सुंदर आणि मोत्यासारखे---या पंढरीच्या कामावर मालकाची मर्जी बसली. आणि डाळमिल वाल्या मालकाने पंढरीचे हमालीचे काम काढून घेतले व आर्थिक व्यवहाराचे काम पंढरीकडे सोपावले*

*आता पंढरीचे  अनेक व्यापाऱ्यासोबात संबध येवू लागले..अन पंढरीला या धंद्यातील गणित समजले...माल कासा खरेदी करायचा.??तो मार्केटला कसा पाठवायचा..?? येथपासून ते डाळीची स्वच्छता ...माल भरणे ...ते मालाचा तेरीज ताळेबंद या साऱ्या गोष्टी जमायला लागल्या...पंढरी या कामात पारंगत झाला..!!*

*काही वर्ष काम केल्यानंतर एके दिवशी असंच गप्पा करता करता दादांनी आपला मित्र सदाशिव याला आपण स्वतंत्र डाळीचा व्यवसाय चालू करूया का..??हि कल्पना मांडली—सदाशिवला दादांचं व्यापारातलं कौशल्य एव्हाना कळालं होतचं.त्या रात्री दोघा मित्रांनी भागीदारीत डाळीचा व्यवसाय चालू करायच ठरवलं.दादांची टेकनिकल अक्कल हुशारी आणि सदाशिवचं भांडवल असं भागीदारीत धंदा चालू केला...*

पण काही वर्षातच जोमात चाललेला हा व्यवसाय-:

*तुझ्या भागभांडवला वर हा पंढरी नफा कमावतोय अशी कुणीतरी सदाशिव ला पिन मारली आण हां धंदा मोडीत काढला....*

पण????
*पंढरी आता हार मानणारा नव्हता...इतक्या दिवसाच्या अनुभवाची शिदोरी आणि  केलेल्या बचतीच्या जोरावर पंढरीने पुण्यामध्येच एक पाच गुंठे मोकळी जागा असलेल तीन मजली घर भाड्याने घेतले....आणि स्वतंत्र व्यवसायाला सुरुवात केली....*

*मोकळ्या जागेत तूर,मुग,मठ,हरबरा भिजवून वाळत टाकण्याची सोय केली आणि उर्वरित मोकळ्या जागेत हे धान्य भरडून त्यापासून डाळी तयार करण्याचं काम चालू केलं...घरच्या माणसांनी पंढरीला या कामात मदत केली अन अल्पावधीतच पंढरीचा धंदा जोमात सुरु झाला....*

*याच डाळमिलच्या धंद्याच्या जोरावर पंढरीने गनोऱ्याला गावाकडे बऱ्याचश्या शेतजमिनी खरेदी केल्या...व्यापार पण जोरात चालू होता...झालेल्या नफ्यातून गावाकडे जमिनी खरेदी चालूच होती असं करता करता पंढरीची गावाकडे गनोऱ्याला चालीस ते पन्नास एकर जमीन झाली... ...!!..धाकटा भाऊ लक्ष्मण जमीन कसू लागाला...त्याने हि भावाला साथ  देत शेती सांभाळली.!!*

*हमाली करणारा पोरगा स्वताच्या स्वकर्तृत्वावर मालदार झाला होता...आता गावाकडे आणि पुण्यात सर्वजण पंढरीला “आंबरे पाटील” म्हणू लागले....लहान भाऊ पंढरीला दादा म्हणत-ते पाहून इतर लोक हि हळूहळू पंढरीला आंबरे दादा म्हणू लागले...अशा पद्धतीने ते नंतर साऱ्या गावाचे पुणेकर/आंबरे पाटील/दादा म्हणून नावारुपास आले*

*एक दिवस दादांना पुण्यात समजल कि दातारांच्या अन काही आंबरेच्या जमिनी शेतकऱ्यांच्या अज्ञानापायी सावकाराने हडप केल्यात ...त्या रात्री दादांना निट झोप आली नाही—सलग आठवडाभर ते या विचाराने या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होते...सारा गाव मला दादा म्हणतोय,अन मी मात्र माझ्या या गावातल्या लहान भावंडाच्या जमिनी सावकाराच्या घशात जाताना ऐकतोय....*

*आणि एक दिवस दादांनी पुणं सोडण्याचा निर्णय घेतला....निव्वळ निर्णय घेवून ते थांबले नाहीत—तर आपल्या दोन पुतण्यांच्या ताब्यात डाळमिलचा धंदा सोपवून लगेच बैलगाडीने त्यांनी गावाकडची गणोऱ्याची वाट धरली....!!*

*पुण्यातील मित्र परीवाराने गावापायी स्व:ताचं वाटोळ करून घ्यायला निघाला म्हणून मुर्खात काढलं—पण दादांचा निश्चय पक्का झाला होता.....कारण पुण्यात आता त्यांना सुखाची झोप येणार नव्हती..!!*

*दादांच राहणीमान अगदी साधं होतं-दादांच्या मनावर त्यावेळी कॉग्रेसचा पगडा असल्याने,खादीचं धोतर,त्यावर खादीचाच शर्ट,डोक्याला खादिचीच टोपी,शर्ट वर घालायला कोट देखिल खादीचाच असायचा....इतके ते कॉग्रेसप्रेमी  होते*

*कोणत्याही मोठ्ठ्या कामाची सुरुवात हि अगोदर बाळपावलाने होत असते हे दादांना स्वातंत्रपूर्व काळात माहित होते...त्याचीच नांदी म्हणून------:दादांनी गावात आल्या आल्या दादांनी बालपणीचे मित्र-सवंगडी,जवळचे नातेवाईक-काही प्रेमाची माणसं यांच्या सोबत चर्चा केली..आपलं गावाला परत येण्याचं प्रयोजन सांगितल....*

*तेव्हा महाराष्ट्रात कुठ कुठ सोसायट्या सुरु होत होत्या.पण आमच्या गावातील लोकाना याबद्दल काही माहित नव्हत—दादांनी सोसायटीच महत्व समजावून सांगत,सहकरी तत्वावर हि योजना गणोऱ्यात राबवण्याचं मनावर घेतलं....स्व:ता मोठी आर्थिक झळ सोसून परिसरातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत शेतकऱ्याना नाममात्र फी भरून सभासद करून घेतलं....*

*आणि पहिली सहकारी तत्वावर चालनारी सोसायटी आमच्या गणोरे गावात अस्तित्वात आली.दादांनी गावासाठी उचललेलं हे पहिलं पाऊल....आणि येथून त्यांनी गावच्या विकास कार्याला सुरुवात केली..!! आता गरीब शेतकऱ्यांना शेती,बी-बियाणं यासाठी सावकारावर अवलंबून राहावं लागणार नव्हतं...*

*सोसायटीतून अगदी अल्प व्याजदरावर कर्ज मिळण्याची सोय दादांनी करून दिली....गावातील हातावर-मोलमजुरी करणारी श्रमिक जनता यांचेसाठी किराणा माल व धान्य मिळण्याची सोय देखिल सोसायटीतच केली....वर्षाच्या आतच सहकारी तत्वावर एक कापड दुकान देखिल गावात चालू केले.......*

*आता अन्न/वस्त्र/निवारा या लोकांच्या मुलभूत गरजा गावातल्या गावात भागू लागल्या...आणि दादांनी सहकारी तत्वावर स्थापन केलेल्या सोसायटी ची ख्याती महाराष्ट्रात दूर दूर पसरली...*

*त्याकाळी गनोऱ्याच्या सोसायटी चा कारभार कसा चालतो हे पाहण्यासाठी व माहिती करून घेण्यासाठी एकदा मराठवाड्यातील एकशे तीस सधन-श्रीमंत शेतकरी तीन बस-गाड्या करून गणोऱ्याला आले होते..”अतिथी देवो भव:”या उक्तीप्रमाणे तेव्हा सर्वांच्या जेवणाची,चहा-पाण्याची अन मुक्कामची सोय दादांनी आपल्या गणोरे गावात केली होती...हि घटना १९५६ साली घडली..!!*

*पडत-धडपडत विकासाचं पहिलं बालपाऊल पाऊल पडल होतं...आता तोल सांभाळत सांभाळत दादांनी विकासाच्या मार्गावर चालायचं [गावाला न्यायचं]ठरवल होतं.....!!*

क्रमशः....
[पुढील भाग सलग चार दिवस ठीक एक वाजता पोस्ट केले जातील.-]

कंदील

[सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात दोन दिवस खेड्यात घरी जाण्याचा योग आला...सर्वजण जमले –रात्रीची जेवणं चालू होती आणि अचानक लाईट गेली—अंधारात बँटरी पण सापडेना म्हणून बाईनं पटकन चुलीवरील बत्ती पेटवली-आणि बतीच्या उजेडात जेवताना भिंतीवरील आमच्या त्या हलत्या सावल्या पाहून मी 30 वर्ष भूतकाळात गेलो..]

*गावच्या घरातील घासलेटचा दिवा*

*आहेर वसंतराव दिनकर[जादुगार सर] प्रस्तुत-:मो-:9423387988*

*चिमणी/कंदील... ...9423387988...*

*महावितरण ची वीज आमच्या गणोरे गावात पोहचली होती,पण आमच्या घरात ती येईल इतकं आमचं भाग्य नव्हतं...घरचं दारिद्र्य आमच्या पाचवीलाच पुजलेलं.. माझ्या लहानपणी आम्ही धाब्याच्या [म्हणजे मातीच्या भिंती अन त्यावर लाकडी फळ्या टाकून त्यावर टाकलेलं मातीचच छप्पर] अशा घरात रहायचो.....घरासमोर मात्र मोठ्ठं अंगण असायचं...*

*आई-वडील दोन्ही विडी कामगार....आमची शाळा पाचला सुटायची...शाळा सुटली कि,मी टोपल्यात काय आहे नाही ते पहिलं खावून घ्यायचो...अन पहिलं काम असायचं दिवा-बत्तीची तयारी करणं.....*

*दिवा म्हणजे तरी काय असायचा--:काचेची रिकामी दारूची बाटली अन तिच्या झाकणाला एक छिद्र पाडून त्यात बाटलीत तळापर्यंत जाईल इतकी मोठी सुताची किंवा कापडाची वात...!!*

*मातीच्या चुलीच्या कोपऱ्यावर थोडा उंचावर जर्मलच्या डब्यावर ठेवलेला हा दिवा,चुलीत फुंकर मारायची काळवंडलेली  पितळी फुकणी, भांडी धरायची लोखंडी सांडशी आणि डब्याशेजारी फुलछाप  काडीपेटी,लाकदाडाच्या दोन तीन सोबण्या,आणि इतर गोष्टींचा नेहमी असलेला पसारा आणि दिव्याच्या मिणमिणत्या उजेडात कोपऱ्यात दोन पायांच्या मध्ये बरोबार अंगठ्ठ्याने काठवत दाबून धरजेवण बनवणारी आमची बाई हे चित्र आजही मनात कोरलेलं आहे*

*हा दिवा आम्हाला स्वच्छ घासून पुसून त्यात घासलेट[आत्ताच रॉकेल]टाकून वातीची कोजळी साफ करून ठेवावा लागायचा....बाई कामावरून सहा वाजेपर्यंत यायची,आण तिच्या हाताने तो दिवा लावायची......*

*गावातील बरेच जन त्या दिव्याला चिमणी म्हणायचे....का ते मला आजपर्यंत माहित नाही..अन मी पण कधी कुणाला इचारलं नाही....ह्या दिव्याला वरती अडकवयाला आम्ही त्याला एक तारेची वक्राकार कडी बनवायचो...काही घरात हि चिमणी पत्र्याच्या डब्यापासून बनवलेली असायची...*

*रातच्याला स्वयपाकाला कधी कधी चूल जाळ धरायची नाही मग माझी आई बत्तीतत्ल बुचभर रॉकेल चुलीतल्या काड्या-कुड्यावर टाकायची मग चुलीत जाळ व्हायचा....हे नेहमीच ठरलेलं असायचा------*

*शाळेत असताना सूर्यग्रहण पाहण्यासाठी –फोटोफिल्म,....किंवा वेल्डीगवाल्यांची काच हवी असायची....गावात कुणांक तरी एखादी काळी काच असायची त्यातून सूर्यग्रहण पाहण्यासाठी लाईन लागायची----यावर उपाय*

मग..?????

*आम्ही एखादी काच उपलब्ध करून ती दिव्याच्या कोजळीवरसपाट धरून घट्ट काळी करायचो...अन मग ती तयार झालेल्या काचेतून सूर्यग्रहण पाहायचो...गावच्या मित्रांच्या बुद्धीला तेव्हा तोड नव्हती...समस्येवर उपाय काढणं यात आमचा हातखंडा असायचा.*

*हा घासलेट चा दिवाही कधी कधी दगा द्यायचा.दिव्यातलं रॉकेल संपलं की सारी रात्र अंधारात काढावी लागायची.....तेव्हा हे घासलेट म्हणजे आजचं रॉकेल—टी वाय शिंदे आणि सावळेराम सखाराम दातीर यांच्याच दुकानात महिन्याकाठी पाच लिटर मिळायचं—त्यासाठी राशन कार्ड दाखवावं लागायचं...*

*चुलीच्या ठेवलेला हा दिवा,...लपकणाऱ्या दिव्याच्या उजेडात जेवण बनवणारी आमची बाई—आणि तेन्दुच्या पानाच्या विड्या वळणारा माझा बाप  हे चित्र आजही स्पष्ट दिसतंय....या चिमणीच्या भडभडत्या लपकत्या  उजेडात आमच्या आय्यांच्या सावल्या भिंतीवर नेहमी लहान-मोठ्ठ्या व्हायच्या त्यामुळे आईची उंची नेमकी किती..???..हे आम्हाला शेवटपर्यंत कळालचं नाही....*

*या चिमणीच्या भडभडत्या लपकत्या उजेडात सर्वांची जेवणं व्हायची....सर्व सावल्यां भिंतीवर एकमेकात मिसळून जायच्या--नंतर हाच दिवा आम्हाला अभ्यासासाठी उजेडाची साथ करायचा...*

*शाळा सुटल्यावर गावपट्टीत खेळताना किंवा एखाद्याच्या बांधावरून जाताना काही जण गुरे राखण करून घरी येताना कुठतरी पायात काटा मोडायचा...मग हातच्या मधल्या बोटाने तोंडातून थुंकी घेवून ती जागा साफ करायची व मग हा  पायात खुडलेला काटा या चिमणीच्या उजेडात तासनतास काढत बसायचा उद्योग चालायचा...*

*एखाद्या छोट्या डब्यावर ती चिमणी ठेवून आम्ही अभ्यास करायचो,,,,,,डब्यावर दिवा ठेवला कि, डब्याच्या बाहेर कडेन बरोबर एक गोल काळी सावली तयार व्हायची---त्याच्या बाहेर आमची अभ्यासाची वह्या/पुस्तकं असायची...!!*

*रानातील ,वस्तीवरील लोकांकडे पण घराघरात हि चिमणी/बत्ती  असायचीच....पण गोठ्यातील जनावरांना वाऱ्या-वावधानात ,पावसात चारा-पाणी करण्यासाठी किंवा गाईची धार काढण्यासाठी उजेड म्हणून या चिमणीचा वापर करणे धोक्याचे असायचे...एकदा वस्तीवरील एका शिंदे च्या माणसाकडून कडून जनावरांना वैरण काढताना दिवा खाली पडला अन उभी व्हळई धगधत पेटली...*

*यावर उपाय म्हणून आमच्या गुरुवारच्या बाजारात कंदील यायला लागले....चिमणी प्रमाणेच कंदिलात पण वात घालावी लागायची...त्यात पण रॉकेल घालायचं हे आमच्यासाठी त्यावेळी मोठं काम असायचं... या कंदिलाला बाहेरून काच असल्यामुळे वार्‍या-पावसात या कंदिलाचा उजेड जाण्याची किंवा कंदील विझण्याची शक्यता नाहीच. त्यामुळे या कंदिलाचा उपयोग अशा वार्‍या-पावसात मोठ्याप्रमाणात केला जायचा*

*आमचा मात्र कितीतरी दिवस अभ्यास चिमणीच्या उजेडात चालू होता....बाप त्याचं काम उरकलं कि झोपायचा ---माझा अभ्यास चालूच राहायचा...मग बाप माझ्या आईला म्हणायचा-:*

*”दिव्याची वात थोडी कमी कर गं...मला झोप येत नाहीये...”*

 *मग बाई दिव्याची वात थोडी कमी करायची....*

मग मी बाईला म्हणायचो-:

*”दिव्याची वात थोडी मोठी कर गं,मला वाचता येत नाहीये...””*

*बाई पुन्हा दिव्याची वात थोडी मोठी करायची....*

बाप पुन्हा म्हणायचा----

*”दिव्याची वात थोडी कमी कर गं...मला झोप येत नाहीये...”*

*मग बाई दिव्याची वात थोडी कमी करायची....*

..मग मी पुन्हा म्हणायचो –

*”दिव्याची वात थोडी मोठी कर गं,मला वाचता येत नाहीये...”*

 *बाई पुन्हा दिव्याची वात थोडी मोठी करायची....*

*आमची बाई रात्रभर दिव्याची वात “खाली-वर.....वर-खाली” असं करत राहायची आमच्या दोघांच्या मध्ये ती त्या दिव्यासारखी जळत राहयची*
--- भाग-2 ---
*अंगणात बसून अभ्यास करायचा तर तिथे चिमणीचा उपयोग नसायचा....वाऱ्याच्या थोड्याशा झुळुकीने हि हि बत्ती/चिमणी विझायाची...पुन्हा पुन्हा पेटवायला लागायची--- यावर उपाय म्हणून माझ्या बापाने मग गुरुवारच्या बाजारातून एक कंदील विकत आणला..*

*कंदिलाची काच पुसणे हा तसा मोठा अवघड प्रकार.....रात्रभर कंदील जळत असल्याने---काचेवर त्या ज्योतीमुळे  काळी कोजळी जमायची....ती काचेच्या आत कापड घालून पुसून स्वच्छ करावी लागायची....अशा वेळी बऱ्याच वेळा हात कापला जायचा...कापलेला भाग तसाच तोंडात घालून रक्त पिवून काच पुसण्याचं आमचं कसब दिवसेंदिवस वाढत गेलं....आणि काच लख्ख होवू लागली......!!*

*हा कंदील बऱ्याच वेळा मित्रांकडे अभ्यासाला जायला उपयोगी पडायचा...रात्रीच्या वार्‍यात कंदील विझत नसायचा... कंदिलाच्या सभोवताली बसून आम्ही मित्र अभ्यास करायचो...अभ्यास करताना या कंदिलाची एक गोष्ट आमच्या लक्षात आली कि--:*

*कंदिलाच्या जेवढं जवळ जाऊ तेवढी माझी सावली सावली मोठी व्हायची.....आणि  जेवढे लांब जाऊ तेवढी माझी सावली लहान व्हायची.....कंदिलाच्या प्रकाशात हा खेळ बराच वेळ चालायचा....*

*हातात एक काठी आणि कंदील घेऊन गावातील/मळ्यातील लोक रात्री शेतावर,खळ्यात धान्याचं राखण करण्यासाठी जायचे.....घरापासून जवळच असलेल्या शेतात माळा राखण्यासाठीही गावातील बरेच जण कंदिलाचा उपयोग करत...*

*खतोड्याच्या मळ्यातील सुभा ....धाम्बोडी फाट्यावरील काही लोक इतरांच्या शेतात/मळ्यात शेळ्यां,मेंढ्यांचा तळ ठोकायचे,तेव्हा या शाळकऱ्याच्या घरून रात्री कंदिलाच्या उजेडात तळापर्यंत भाकरी यायच्या....कंदिलाच्या प्रकाशात वाटचाल करत तळावर जेवण्याचे दिवसही आता सरलेले आहेत*

*त्या काळी गणोऱ्यात रात्रीच्या वेळी खळवाडी वर पिच्चर असायचे---“एक गाव बारा भानगडी...सांगत्ये ऐका...चोरीचा मामला...सुशीला....आई कुणा म्हणू मी..??...थांब लक्ष्मी कुंकू लावते....” अशा पिच्चरच्या दवंडी गावात रानावनात पोहोचायच्या...मग रात्रीची जेवण लवकर उरकून हि मंडळी----:*

*-----:मळ्यातून,खतोडवाडी,.शिंदेवाडी,..पाटावरून ...पिंपळगावमधून बैलगाडीने लोक पिच्चर पाहण्यासाठी येत....बैलगाडीतून प्रवास करताना हमखास उपयोगी पडणारा हा कंदील,दोन बैलांच्या मध्ये जो जू असायचा त्याला अडकवलेला असायचा..... चांदण्या रात्रीच्या त्या प्रवासात खळंम खुळम्म असा बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाजात तो कंदील हि मागे पुढे हलायचा....*

*त्या हलत्या उजेडात रात्रीच्या वेळी रस्ता दाखवण्याचं काम तो कंदील इमाने इतबारे करायचा.... कंदील अंधाऱ्या रात्री मार्ग दाखवणारा सर्वांचा सोबती होता*

*आता आमच्या गनोऱ्यात...वाडीवस्तीवर...शेतात..मळ्यात...महावितरणची वीज पोहचलीय......*

पण...???????

*गावच्या भूमीत,अन घरच्या अंगणात या चिमणी आणि कंदिलाच्या उजेडात अभ्यास करत करत कुणी गायक, राजकारणी, समाजकारणी, पोलिस, चित्रकार, जादुगार,सैनिक,उद्योगपती, शास्त्रज्ञ आणि उच्च पदावर गेले..... ग्रामीण भागातील आमच्या आनंदी पर्वातील हा कंदील अडगळीला गेला....*

*त्याची काच केव्हाच फुटून पडली...काही वर्षांनी दिवाळीची स्वच्छता करताना काच नसलेला हा कंदील तुम्हाला माळ्यावर/अडगळीत सापडेल----तेव्हा आमच्या जमान्यात हा एक ‘”कंदील”’ होता असं आपल्या लेकराबाळांना सांगावं लागेल*

[पोष्ट वाचून तुम्हाला तुमच्या बालपनाचा काचेचा ,पत्र्याच्या डब्याचा दिवा समोर दिसाया लागल्यास,किंवा तसा काही फील मिळाल्यास हि पोष्ट आपल्या मित्रपरिवार आणि इतर काही  ग्रुपवर जरूर फोरवर्ड करावी..व इतरांनाही लॉकडाऊन च्या काळात आपल्या बालपणातील दिव्याची आठवण देवून बालपणाचा आनंद मिळवून द्यावा..]

तुमचाच
शब्दांकनकर्ता -:
*आहेर वसंतराव दिनकर*
*जादुगार सर*
*अकोले,अहमदनगर*
*मो-:9423387988*

Thursday, May 14, 2020

ऐसपैस शिक्षण : संदीप वाकचौरे

ऐसपैस शिक्षण : संदीप वाकचौरे

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती शाळांना उन्हाळ्याच्या सुट्टीला जोडून सुट्टी मिळाली आहे. विद्यार्थ्याबरोबर पालक देखील घरीच आहेत. त्यामुळे कधी नाही इतके कुटुंब एकत्रित अधिक काळ दिसू लागले आहे; पण या काळात स्नेहबंध वृध्दींगत होण्याऐवजी सर्वांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय होणार याची चिंता अधिक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडू नये म्हणून विविध मार्गाने पर्याय शोधून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील याचा विचार सुरू आहे. सुट्टीतील अभ्यासासाठी समाज माध्यमांवर स्वतंत्र गट सुरू झाले आहेत. त्या गटावर अभ्यासासाठी देखील स्पर्धा आहे. त्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना शाळा परवडली; पण हा अभ्यासाचा महापूर नको अशी म्हणण्याची वेळ आली आहे. सध्याच्या सुट्टीत घर या शाळा झाल्या आहेत. त्यामुळे घरात सुट्टीच्या काळात मिळणारा आनंद गमावला जातो आहे का ? असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे.
सध्या सुट्टी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडतो आहे. त्यातच शासनानी प्राथमिक शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना संकलित मूल्यमापनाशिवाय पुढील वर्गात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना आनंद आहे आणि पालक मात्र त्या निर्णयावर नाराज आहेत. मुलांसाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. नवे काय शिकतो आहोत असा प्रश्न विद्यार्थ्यांचा असतो आणि पालकांना मार्क किती मिळाले हे महत्त्वाचे असते. विद्यार्थी सर्व विषयात पारंगत असायला हवा. त्यातही त्याला पैकीच्या पैकी मार्क हवेत या पालकांच्या हव्यासापायी विद्यार्थ्यांचा सुट्टीत देखील आनंद हरवला आहे.
या सुट्टीत बुडालेला अभ्यास भरून काढण्यासाठी सध्या समाज माध्यमांवर अभ्यास, स्वयंअभ्यास आणि स्वाध्यायाचा महापूर दाटला आहे. रोज किमान चार-पाचशे लिंक, व्हिडीओ, स्वाध्यायाच्या पीडीएफ उपलब्ध होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी सतत मोबाइलच्या भोवती रमत आहेत. पालकही विद्यार्थ्यांना अभ्यास आहे म्हणून मोबाइलचा वापर करण्यास, हाताळण्यास मुक्तपणे हाताळणी करण्यास अनुमती देत आहेत. मोबाइलच्या अतिरिक्त वापराने त्याचा विपरित परिणाम म्हणून मुलांचे डोळे आळशी बनू पाहतील. असे अनेक नेत्र तज्ज्ञांचे मत आहे. विद्यार्थ्यांना कोरोनाचा लॉकडाऊन उठल्यानंतर नेत्रविकाराला सामोरे जावे लागेल असे चित्र आहे. जगभरात विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार करून साधारण किती वेळ मोबाइल स्क्रीन विद्यार्थ्यांना हाताळू द्यावा या संदर्भात काही मर्यादा असल्याचे सांगण्यात येते. अर्थात ही वेळ अगदी दहा मिनिटांपासून 30 मिनिटांपर्यंत विद्यार्थ्यांना हाताळू द्यावे. काही अभ्यासकांच्या मते दहा वर्षापर्यंत विद्यार्थ्यांच्या हाती मोबाइलच देऊ नयेत. अर्थात सातत्याने मोबाइलचा वापर झाल्याने विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर आणि मनावर देखील त्याचा परिणाम होईल यात शंका नाही. अगदी मोठी माणसे देखील मोबाइलच्या आहारी गेल्यावर त्यांच्यावर परिणाम झाल्याच्या अऩेक घटना पुढे आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात मोबाइलच्या अतिरिक्त वापरामुळे आजारी पडलेल्या रूग्णावरती उपचार करण्यासाठी स्वतंत्र दवाखाने उघडावे लागतील अशा इशारा देण्यात येत आहे. त्यामुळे या परिस्थितीत विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्याच्या नादात पालक मुलांचे आजारपण विकत तर घेत नाहीत ना? अशी शंका उपस्थित होते.
त्याचवेळी हा येणारा अभ्यास खरंच विद्यार्थ्यांना आऩंद देणारा आहे का? विद्यार्थ्यांचा वयोगट, सध्याची मानसिकता आणि विद्यार्थ्याची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी, त्याची भाषा याचा विचार करून केलेला असतो का..? त्यात आऩंदाचा भाग किती असतो? एखादा भाग समजावून देण्यासाठी विद्यार्थ्यांचा पूर्वानुभव लक्षात घ्यावा लागतो. येथे प्रत्येक विद्यार्थ्याचा अनुभव भिन्न असणार आहे. तर काही घटक विद्यार्थी शिकलेला नसेल, शिक्षकांनी त्यांना तो घटक कदाचित शिकविलेला नसेल. त्याचा विचार केलेला असतो का? अनेकदा स्वाध्याय, किंवा ध्वनिचित्रफीत विकसित करताना अध्यापनशास्त्रीय दृष्टीकोन त्यात असायला हवा असतो. तो या प्रत्येक ध्वनिचित्रफितीत असेलच असे दिसत नाही. त्यात एखादा घटक शिकताना, त्याचे विश्लेषण, अध्ययन अऩुभव जाणून घेताना विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतात. वर्गात प्रश्न निर्माण झाला तर शिक्षक मदतीला असतात. तेथे दुहेरी आंतरक्रिया होत असते. मात्र या आंतरक्रियेने एखादा घटक जितका चांगला परिणाम करतो तितका परिणाम एकेरीक्रियेने साध्य होणार आहे का ? याचा विचार करण्याची नितांत गरज आहे.
खरेतर अशा सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रित अभ्यासापेक्षा, शाळेतील अभ्यासक्रमास मदत करणारे व विद्यार्थ्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाला मदत करणारे, स्वतःचे विश्व समृध्द करण्यासाठी मदतीचा हात देणार्‍या गोष्टी घडायला हव्या आहेत. सर्वच गोष्टी औपचारिक शिक्षणाच्या प्रक्रियेतून साध्य होत नाही. त्यामुळे त्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी पूरक ठरणारे कार्यक्रम घराच्या, परिसराच्या वातावरणात जाणीवपूर्वक विकसित करायला हवेत. खरेतर आता असणारी सुट्टी मुलांना शिकण्यास खूप मदत करणारी आहे. एकतर इतर वेळी विद्यार्थ्यांना सुट्टी असली तरी पालकांना असतेच असे नाही. आज सुदैवाने दोघांनाही सुट्टी आहे. त्यामुळे संवादासाठीची संधी अधिक आहे. या निमित्ताने होणार्‍या गप्पा, संवाद, गोष्टी, घरातील अऩुभव, अवतीभोवतीचे निरीक्षण त्या संदर्भातील विचाराचे आदानप्रदान या गोष्टी खूप शिकून जाणार्‍या असतात. त्या आज घडायला हव्या असतात. घरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी चर्चा, पूर्वीचे अनुभवाची मांडणी, त्या संदर्भात घेतली जाणारी काळजी या बाबत विद्यार्थ्यांना भूतकाळ उलगडण्यास मदत होणार आहेच. त्याच प्रमाणे भविष्य देखील जाणण्यासाठीचा प्रवास शक्य होईल. या संवादातून अनेक नवनवीन गोष्टी जाणणे होईल. त्याच बरोबर नवनवीन शब्द, बोलीतील शब्द कळणार आहेत. मनात पडणारे प्रश्न सहजतने सुटणार आहे. त्यातून भाषिक आतंरक्रिया होईल. अनेक भाषिक कौशल्याबरोबर परिसर अभ्यास देखील पूर्ण होणार आहेत. त्याचबरोबर अवांतर वाचन होण्यासाठी मदत होईल. खऱेतर हा काळ अवांतर वाचनासाठी खूप महत्त्वाचा ठऱणार आहे. वाचनाची सवय लावावी लागते. त्यासाठी गोडी निर्माण करावी लागते. त्यासाठी घरातच पेरणी व्हावी लागते. या काळात घरातील मोठी माणंस पुस्तके हाती घेऊन वाचू लागतील तर विद्यार्थी देखील वाचू लागतील. या काळात मुलांना वाचनाची गोडी लागली, तर त्यांच्या भविष्याचा मार्ग अधिक मोकळा होणार आहे. एका अर्थांने पाठ्यपुस्तकातील घटकांचे आकलन होण्यास मदत करणारा हा प्रयत्न असेल. परवा एका विद्यार्थ्यांने सांगितले, की मी बोक्या सातबंडे आणि फास्टर फेणे ही मालिका पूर्ण केली आहे. सुट्टीचा या भाग कितीतरी महत्त्वाचा आहेच. हे वाचन करतांना त्या पुस्तकातील माहिती लिहिणे, त्यात काय काय आहे? त्यातील काय आवडले, का आवडले या संदर्भाने विचार प्रकट करणे व्हायला हवे. त्या लेखन सरावातून दैनंदिन लेखनाची अभिरूची तयार होईल. स्वतःची मते प्रकट करण्यास निश्चित मदत होणार आहे. एका अर्थांने शिक्षणाची जी उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टाची साध्यता करण्यासाठीच या काळाचा उपयोग व्हायला हवा. खरेतर विद्यार्थ्यांना सुट्टी असते याचा अर्थ शिकणे नसते असे नाही. ज्या गोष्टी पाठ्यपुस्तकातून साध्य करता येणे शक्य नसते. किंबहुना अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी शाळाबाह्य उपक्रम, कृती, प्रयोग, प्रात्यक्षिकांची गरज असते. ते सर्व सुट्टीतून साध्य होत असतात. अनेकदा शाळेत चित्र काढण्यास, कविता करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. त्या करीता लागणारी संधी या सुट्टीत मिळाली आहे. अनेक मुले-मुली उत्तम चित्र रेखाटन आणि रंगभरणाचा सराव करीत असल्याचे चित्र दिसत आहेत. ही कौशल्य जीवनभर आनंद देत असतात. किंबहुना जगण्यासाठी या कला शक्ती प्रदान करत असतात. त्या अर्थांने सुट्टी आहे आणि शिक्षण सुरू आहे.
खरेतर पालकांनी बालकांना केवळ पैसा दिला म्हणजे बालकाचा विकास होईल असे नाही. बालकांच्या विकासाकरीता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे वेळ देणे. एका अर्थाने हा वेळ मुलांच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठीची पायाभरणी आहे. या वेळेने विद्यार्थ्याच्या विकासाला आकार मिळणार आहे. वेळेने नात्याची वीण अधिक घट्ट होणार आहे. त्यातून होणारा संवाद हा सुजाण पालकत्वाला जन्म देणारा ठऱणार आहे. मूल समजावून घेण्यास या काळात अधिक मदत होईल. खरेतर आपण मुलांकडून किती अपेक्षा ठेवतो.. त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने खरच प्रवास होणार आहे का ? मुलांची अभिरूची जाणून त्याला योग्य दिशेने घेऊन जाता येईल. एका अर्थाना पालक म्हणून आपण सांगू तेच मुलांनी केले पाहिजे या अपेक्षा या संवादाने कमी होऊ शकतील. त्यामुळे मुलांच्या बहरण्यासाठीचे आकाश मोकळे होईल. अपेक्षांना मर्यादा घातल्या गेल्याने मानसिक स्वास्थ टिकविण्याचा प्रवास या निमित्ताने सुरू करता येईल. एका अर्थांने सुजाण पालकत्वाची रूजवण या निमित्ताने होण्यास मदत होणार आहे. घर ही उत्तम शाळा असते. घरात ज्या गोष्टी मिळतात त्या मुलांना आयुष्यभर पुरतात. त्यात प्रेम आणि शांती, संस्कार या गोष्टीसाठी घर हवे असते. आज घरी एकाचवेळी सर्वजण उपलब्ध आहेत आणि प्रत्येक बालकांला प्रेमात ओतप्रोत भरून चिंब होता येणार आहे. इतरवेळी सर्वांच्याच प्रेमाचा हक्कदार होता येईल असे होत नाही. आज ते घडेल.. मूल प्रेमाने चिंब झाले तर ते कधीच माघारी फिरत नाही. त्याला घरात शांतता देखील अनुभवता यायला हवी असते. त्या शांततेकरीता प्रत्येक माणूस स्वतःचे एक छोटेसे घरकुल निर्माण करते. ते काही खाणे आणि झोपण्यापुरता विचाराने बांधले जात नाही..या सर्वांसोबत तेथील शांतता बरेच काही शिकून जात असते. संस्कार हा बडबडीने होत नाही. तर जे दिसते त्यानुसार मूल विचार करते आणि त्यानुसार जगण्याचा मार्ग अनुसरत असते. घरातील संस्कार जीवनभर पुरतात असे म्हणतात त्याचे कारण तेच आहे. घरात दारात येणार्‍यांसाठी सन्मान असेल…तर तो प्रवास मूल पुढे चालू ठेवते. संस्कार हे घरातील विचारांने आणि दर्शनाने पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत असतात.. त्यामुळे सुट्टीचा विचार नव काही पेरणीचा आहे हे लक्षात घ्यायला हवे.
सुट्टीमुळे मुलाला अवतीभोवतीचे जग समजून घेणे सोपे होईल आणि पालकांना मूल समजून घेणे शक्य होईल. यातून उद्याच्या भविष्यासाठीचा हा प्रवास आऩंदाच्या दिशेने सुरू होईल हे नाकारता येणार नाही. शिक्षणाचा अर्थही या निमित्ताने जाणता येणार आहे. शिक्षणाच्या बंदिस्त कल्पनेतून बाहेर पडून विकासाची दिशा घेऊन पुढचा प्रवास सुरू करता येईल. आपले जगणे हेच शिक्षण आहे. त्या जगण्याच्या प्रत्येक पाऊलवाटेने प्रवास सुरू ठेवताना शिक्षणाची अनेक उद्दिष्टे आणि कौशल्याच्या दिशेने प्रवास घडत असतो. गरज असते फक्त समजून घेण्याची. त्यामुळे सुट्टी म्हणजे शिक्षण मुक्त असे कोणी म्हणत असेल तर ते चूक आहे हे लक्षात घ्यायला हवे. शिक्षणाची चिंता न करता विद्यार्थ्यांना अनुभव घेऊ देणे या पलीकडे कोणतेच शिक्षण जीवनाला उभारी देऊ शकणार नाही.

Tuesday, May 12, 2020

लग्नाचा वाढदिवस एक निमित्त

अकोले तालुक्यातील आदिवासी भागात गेली ३० वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून वश्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपेक्षित ,गरीब , आदिवासी विध्यार्थ्यानी शिक्षण घ्यावे  मनात  उर्मी असणारे शांताराम बापू काळे व त्यांच्या सुविध्य पत्नी प्राचार्या सौ . मंजुषा काळे यांचा आज लग्नाचा २८ वा वाढदिवस आहे . बापूंची कारकीर्द तशी वादळीच पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी , ऊस कामगार , बिडी कामगार , शेतमजूर ,शिक्षक , अधिकारी , महिला युवक , संस्था , सामाजिक कार्यकर्ते ,राजकीय पुढारी यांच्याबाबत लिखाण करून योग्य कामाला  प्रसिद्धी दिलीच परंतु चुकीच्या कामाबाबत वृत्तपत्रातून समज हि दिली त्यामुळे ते सर्वच क्षेत्रात आपले वाटू लागले .पत्रकारिता करताना अनेक संकटे येऊनही ते डगमगले नाही , कधी कधी राजकीय रागही अंगावर ओढून घेतला मात्र ज्यांच्यासाठी ते काम करतात त्यांनीही पाठ फिरवली तरी जिद्द व चिकाटी आत्मविश्व्साच्या जोरावर ते सामाजिक प्रश्न सोडवतच राहिले हजारो विधार्थी त्याच्या शाळेतून शिकून गेले आज ते अधिकारी पदावर तर काही व्यवसायात प्रवीण आहेत  श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलींसाठी १९९२ ला मुलींचे विधालय सुरु केले तर इंग्रजी शाळा , उच्च माध्यमिक विधालय , हरीशचंद्र गडाच्या पायथ्यशी मवेशी या गावात विधालय सुरु करून तेथील विधार्थी राज्य व देश पातळीवर चमकविले ५० कर्मचारी त्याच्या संस्थेत काम करीत असून अनेक अडचणी, खोटे आरोप  व संकटे आजही अंगावर घेत त्याचा प्रवास सुरु आहे . माजी मंत्री मधुकर पिचड हे त्याच्या कामाचे नेहमी कौतुक करतात .  कुणावरही व कोणताही प्रसंग असू ते मदतीला धावून जातात हा त्याचा स्थायी स्वभाव आहे . तर हे एक वादळ आहे . या वादळाला क्षमविण्याचे काम म्हणजे शांत करण्याचे काम आमच्या वाहिनी सौ . मंजुषाताई काळे करतात त्या प्राचार्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विधालयात सेवेत असून त्याने गरीब आदिवासी मुलींना दत्तक पालक योजनेतून शिक्षणाचे कवाडे उघडून दिली आहेत  बापूना  गेली २८ वर्षे खंबीरपणे साथ देणाऱ्या व समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून समर्पित जीवन जगणाऱ्या या उभयंतास  नगर जिल्हा तेली समाजच्या वतीने लग्न वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ...  त्याचे भावी आयुष्य आरोग्यदायी व सुख समाधानाचे जावो ...
🙏🙏🙏 सोमनाथ बनसोडे सर

पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवरा बायकोचे नाते काही जगावेगळेच असते, त्या नात्यात दोन अनोळखी जीवांचे मिलन असते, दोघे भिन्न अश्या वातावरणातून आलेले असतांना, एकमेकांना समजून घेण्याची, आयुष्यभर एकत्र राहण्याची परमेश्वराने बांधलेली ती गाठ असते. आपले हक्काचे घर सोडून मुलगी जेंव्हा पत्नी बनून सासरच्या घरी येते त्यावेळी ती आपले सर्व आयुष्य पतीच्या चांगल्या आयुष्यासाठी समर्पित करते. तिला माहेरचे सर्व सुख पतीच्या घरी मिळावे अशी तिची अपेक्षा असते,
तुझा माझा सहवास हा सात जन्मीचा आहे,
हे आता मला खरं वाटायला लागलं आहे..
मी न बोलताच तुला सगळं समजतं,
तू सगळ्याच ठिकाणी माझी बाजू सांभाळते,
याचे मला नेहमीच कौतुक वाटते..
तू आहेस म्हणून घराचा डोलारा दिमाखात उभा आहे,
तुझ्या कामाचा मला नेहमीच हेवा आहे..
तू इतकी कसं काय सांभाळते?
तुझ्याशी केलेल्या भांडणात निराळीच मज्जा असते,
चूक तुझी असली तरी माफी मलाच मागायची असते..
तुझ्यामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ आहे,
वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा आहे !!

पतीला वाढदिवसाच्या मराठीतून शुभेच्छा

पत्नी घराचा पाया तर पती घरचे छत असते. घरासाठी प्रत्येक जबाबदारी पती चोखपणे निभावत असतो. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा, आपल्या सुखदुःखाची जाणीव ठेवणारा, घरच्या कलहात आपली बाजू सांभाळून घेणारा असा जोडीदार मिळाला तर त्यासारखी भाग्याची दुसरी गोष्ट नाही.
तुमचे प्रेम असेच माझ्यावर राहू दे,
आपल्या प्रेमाचे नाते असेच कायम फुलु दे..
तुमच्यामुळे मला अनेक नाती लाभली,
आई बाबा बहिणीची माया मला तुमच्यात दिसली..
तुम्ही होते म्हणून हे घर माझे आपले झाले,
माझ्यातला चांगल्या गुणांचे तुम्ही कौतुक केले..
तुमची अर्धांगिनी होण्याचा अभिमान आहे..
असेच प्रेम जन्मभर राहो हेच तुम्हास मागणे आहे,
तुम्ही नेहमीच मला समजून घेतले..
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !


Download Image

वाढदिवसाच्या शुभेच्छा आजोबांना | Happy Birthday Ajoba

ज्या घरात आजी आजोबा आहेत त्या घराला विशेष असे घरपण येते. आजी आजोबा आणि नातवंडामध्ये तीन पिढ्यांचे अतूट नाते दडलेले असते.
आजोबा वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेतच,
पण त्याहूनही तुम्ही आमच्यासाठी खास आहात.
तुम्ही सांगितलेल्या राम कृष्णाच्या गोष्टी
आजही मुख पाठ आहेत.
जुन्या गाण्याचे सूर ताल तुमच्यामुळे ओठी आहेत.
तुम्ही असेच उत्साही आनंदी आमच्यात बागडावे,
हेच ईश्वराकडे मागणे आहे
तुम्हाला चांगले आरोग्य मिळो हीच इच्छा…
आजोबा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!


Download Image

मुलीच्या वाढदिवसाला शुभेच्छा

आई वडील आपल्या मुलांसाठी अतोनात कष्ट घेतात. मुलांमध्ये ते आपले भविष्य बघतात. स्वतःच्या इच्छा मारून मुलांच्या आवडी जपण्याचा प्रयत्न करतात, आपली मुले मोठी व्हावी खूप शिकावी, त्यांनी मोठे यश मिळवावे यातच त्यांचे समाधान दडलेले असते. अश्याच विचारांच्या बाबांची आपल्या मुलीसाठी वाढदिवसाची शुभेच्छा इथे व्यक्त होते.
येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा
जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा..
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,
प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे..
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,
परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !