Monday, November 9, 2020

आदिवासी बहुल क्षेत्रात विकासाची सक्षम पाउले ! : हेमलताताई पिचड यांची वेगळी ओळख .

💥 आदिवासी बहुल क्षेत्रात विकासाची सक्षम पाउले !  : हेमलताताई पिचड यांची वेगळी ओळख .
    ------------------------------------ 🌾🌾

    🗒 अकोले, ता.९: 

   गावखेड्यातील परिवर्तनाचे स्वप्न पाहणाऱ्या पूज्य महात्मा गांधींनी भारतातील ग्रामीण भागाच्या उत्थानावर अधिक भर दिला होता हे आपण जाणतोच . तथापि आदिवासी बहुल दुर्गम ग्रामीण भाग सातत्याने दुर्लक्षित राहिला . अनेक सुधारकांसह स्री शक्तीने खेड्यातील सुधारणांच्या वाटेवर मोलाची कामगिरी स्वातंत्र्योत्तर काळात केल्याचे दिसेल . अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका देखील अग्रणी राहिला आहे . 

     आदिवासी , उपेक्षित , महिला यांना आधार देतानाच शिक्षण ,आरोग्य,पर्यावरण,वृक्ष लागवड,वृक्ष संवर्धन , ग्रामविकास, बचत गट, गाव दत्तक योजना, आदर्श गाव , आदर्श सरपंच असे विविध उपक्रम प्रत्यक्षात आणून माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या सुविद्य पत्नी सौ . हेमलता ताई  पिचड सामाजिक कार्यात आघाडीवर आहेत . या त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना कृषी मित्र पुरस्कार व इतर सामाजिक संस्थांनी आजतागायत  २४ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे .  तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील संस्थेने मदर तेरेसा अवार्ड पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे .

    सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी महिलांकरिता  मार्गदर्शनाची गरज ओळखून महिलांचे समुपदेशन महत्वाचे मानून आदिवासी समाजात व विशेषतः महिलांध्ये रुढ असलेली केवळ ' चूल व मूल ' ही मर्यादित जाणीव न ठेवता याबाबतीत परिवर्तन घडविण्यासाठी सौ .हेमलता पिचड यांनी भरीव काम केले . समाज व्यसनाने ग्रासला असून त्याला व्यसन मुक्त करण्यासाठी दारूबंदीची चळवळ त्यांनी उभारली . पंधरा हजार लोकवस्तीचे राजूर गाव दारू मुक्त करतानाच इतर १४० गावांत दारू बंदीचा ठराव करून इतिहास घडविला आहे , तर पर्यावरण टिकून  राहण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन गावागावात पोहचवून ' झाडे लावा झाडे जगवा ' हा कृतीशील मंत्र तालुक्यात पोहचवून कोल्हार घोटी रस्त्यावर सुमारे चाळीस हजार वृक्ष लागवड करून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष साखळी तयार केली .

     तालुक्यात कुपोषण होऊ नये म्हणून  महिला ,बालक ,वृध्द यांच्यासाठी आरोग्य शिबिरे  भरवून आरोग्य केंद्राची स्थापना केली आहे .  गेली नऊ वर्षे राजूर गावच्या आदर्श सरपंच म्हणून कार्य करताना रस्ते,पाणी योजना,शेतीला पाणी,वीज यांचे योग्य नियोजन करून कार्य केल्याने दिल्ली येथे राज्यपाल यांचे हस्ते त्यांना आदर्श सरपंच हा पुरस्कार प्राप्त झाला .तर प.पू.गगनगिरी महाराज यांना गुरूस्थानी मानून त्यांच्या नावे सामाजिक संस्था स्थापन करून या संस्थेमार्फत गगनगिरी हॉस्पिटल सुरु केले .   राजूर परिसरातील  मंदिरांना आर्थिक मदत देऊन अध्यात्मिक कार्य केले राजूर येथे ह .भ .प . ढोक महाराज यांचे मार्फत रामायण कथेचे आयोजन केले या कार्यक्रमासाठी लाखो भाविक उपस्थित होते .रंधा फॉल येथील घोरपडा देवी मंदिराचा जीर्णोद्धार,श्री स्वामी समर्थ मंदिर,श्री अगस्ती मंदिर,सोमनाथ देवस्थान,रतनवाडी अमृतेश्वर मंदिर,वाल्मिकी आश्रम,यांचे नियोजन करून राजूर येथील देवस्थानचे जीर्णोद्धार,स्वामी गगनगिरी महाराज या मंदिरांसह  गेली ३०वर्षांपासून श्री दत्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ते करतात .

      एकलव्य एज्युकेशन संस्थे मार्फत आदिवासी मुलामुलींना संगणक शिक्षण देऊन त्यांना नोकरीच्या संधी निर्माण करून दिल्या आहेत . मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र मुलींची शाळा ,आश्रमशाळा निर्मिती केली . २०११ ला राजूर गावच्या बिनविरोध सरपंच झाल्या  त्या वेळी राजूर गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न होता .महिलांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असे . पाण्याची टंचाई असल्यामुळे राजूर गावात मुली देण्यास कुणी धजावत नव्हते , मात्र माजी मंत्री मधुकर पिचड यांनी पाणी योजनेसाठी भरीव निधी देऊन या योजनेचा जीर्णोद्धार झाला आहे .  नवीन मोटारी पाईप लाईन याचे नियोजन झाले आणि गावाला रोज पाणी मिळू लागले . एक कोटी वीज बिलाची रक्कम उभारून ती भरून दरवेळेस वीज बिलामुळे पाणी योजना बंद पाडण्याचे संकट दूर केले . राजूर गावचे रस्ते,गटारी,ग्राम सचिवालय,वीज इत्यादी प्रश्न त्यांच्या कार्यकाळात सुटले ,राजूर गावच्या विकासाबरोबर गोंदूशी गाव दत्तक घेऊन या गावात पिण्याच्या पाणी बरोबरच शेतीला पाणी ,मिळण्यासाठी पन्नास लाख रुपये खर्च करून बंधारा बांधून पाणी अडविले . त्यातून गावाला नळाद्वारे पाणी मिळालेच परंतु ज्या शेतात भात सोडून आदिवासी शेतकरी पीक घेत नव्हते त्या शेतात आज भाजीपाला , ऊस बांधावर फळबाग उभी राहिली आहे .आरोग्य वीज आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.,गाव हागणदारी मुक्त झाल्याने निर्मल ग्राम पुरस्कार गावाला मिळाला आहे .त्यामुळे सामाजिक कामाची दखल घेऊन मुंबई,दिल्ली,नाशिक,नगर,पुणे ,राजूर येथील सामाजिक संस्थांनी त्यांना आदर्श पुरस्काराने सन्मानित केले .

     आदिवासी भागातील दूध धंदा वाढवून आदिवासी महिलांच्या हाताला काम मिळावे म्हणून बचत गटांची स्थापना केली तारामती महिला दूध संस्था स्थापन करून महिलांना दुभती जनावरे उपलब्ध करून देऊन हे दूध अमृत सागर दूध संस्थे मार्फत मुंबईला पाठवून त्यातून महिलांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले .स्वामी गगनगिरी महाराज प्रतिष्ठान ,राजूर ग्राम पंचायत, भारतीय महिला मानवाधिकार महिला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पद तसेच गगनगिरी महाराज यांच्या त्या निस्सीम भाविक असून तालुक्यात त्यांनी शिक्षण ,आरोग्य,ग्रामविकास,अध्यत्मिक केंद्र,व्यासांमुकती चलवळ उभारून महिलांना आधार देण्याचे काम केले त्यांच्या या कामाला लोक मान्यता मिळाली दारूबंदीसाठी मंत्रालय, उच्च न्यायालय ,जिल्हाधिकारी ,जिल्हा पोलिस यांचेकडे पाठपुरावा करून राजूर येथे सात दुकाने बंद करून कायमस्वरूपी दारूबंदी केली ,चाळीस हजार वृक्ष लागवड व.सवार्धन केले महिलांच्या आरोग्यासाठी व कुपोषण दूर होण्यासाठी आरोग्य केंद्र स्थापन केले तर सरपंच पदाच्या माध्यमातून गाव विकासात सहभाग घेऊन आदर्श गाव संकल्प योजना यशस्वी केल्याने त्यांच्या कार्याची दखल देशपातळीवर घेऊन '  हुज हू ' इन अमेरिका या बुक्स मध्ये दखल घेण्यात आली . दिल्ली येथे माजी राज्यपाल शिवराज पाटील यांच्या हस्ते आदर्श सरपंच म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला .कृषी मित्र म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना पुरस्कार दिला , व्य सन मुक्तीचा पुरस्कार एक ना २४पुरस्कार त्यांना मिळाले व नुकताच मदर तेरेसा हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे .

    माजी मंत्री मधुकर पिचड व आमदार वैभव पिचड यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकासाची कामे करताना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या सूत्राचा अवलंब करून  ७५ वर्षे असलेल्या वयात त्या तरुणांना लाजवेल अशा प्रकारे   सकारात्मक कामाचा प्रवास करीत आहेत .
     विकासाच्या वैविध्यपूर्ण वाटा सौ . हेमलता ताई पिचड यांनी राजूरसह अकोले तालुक्यातील दुर्गम वाड्यापाड्यां पर्यंत पोचविल्या आहेत . विशेषतः व्यसनमुक्ती आणि संस्कार केंद्रांच्या रुपात ही जागृतीची सक्षम पावले तोलामोलाच्या रुपात पडलीत . 
    ------------------------------------------ 

   🍂🍂🍂

No comments:

Post a Comment