Monday, March 10, 2014

घर्षातून साकारले जीवन - मोलकरीण ते प्राध्यापिका

‘मिळून सार्‍याजणी’च्या दौंडच्या प्रतिनिधी प्रा. अरुणा मोरे यांचं हे निःशब्द करणारं मनोगत. घरची गरिबी, बालपणापासून केलेले कष्ट, झेललेले अवमान आणि अखेरीस प्राध्यापक व्हायचं पूर्णत्वाला गेलेलं स्वप्न. (हा लेख तुम्ही वाचेपर्यंत त्यांना डॉक्टरेटही मिळालेली असेल!) आपल्या या मैत्रिणीचं मनापासून कौतुक.
अंतोनिओ ग्रामची या इटालियन इतिहासकाराने आमच्या इतिहासात एक नवी संकल्पना आणली. पूर्वी शूर, पराक्रमी वीर राजे-रजवाडे यांच्या कथा यांचाच इतिहास असे. परंतु वंचितांचा इतिहास ही नवी संज्ञा त्याने मांडली. हा दृष्टिकोन समोर ठेवून आयुष्याच्या पन्नास वर्षाचे सिंहावलोकन केले असता गतकाळापासून प्राध्यापकी पेशात येईपर्यंतचा स्वजीवनाचा इतिहास पाहिला असता दुर्लक्षित, उपेक्षित, गरिबीने सोसाव्या लागणार्‍या अपमान व अवहेलनेची माझी कथा म्हणजे संघर्षातून साकारलेल्या मोलकरीण पासून प्राध्यापिकेपर्यंतच्या जीवनाची वाटचाल आहे. या वाटेत अनेक खाचखळगे लागले. रक्तबंबाळ होईपर्यंतच्या ठेचा लागल्या, पण उठून सारे बळ पंखात एकवटून उडण्याचे मात्र थांबवले नाही. काही वेळा पंख छाटण्याचाही प्रयत्न झाला. पण स्वप्न! प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहणे कधी थांबवले नाही. उलट ते साकारण्यासाठीच प्रयत्न केले.
माणसाला जे हवं असतं ते आयतं मिळालं तर त्याची किंमत नसते. परंतु संघर्ष, परिश्रम करून कष्टाने ते मिळवले तर त्याचे मोल अनमोल असते. शिक्षक किंवा प्राध्यापक होण्याची माझी आंतरिक उर्मी होती. त्यासाठी जीवनात अत्यंत कष्टमय, खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागले. खरं तर आजही माझ्या अवतीभवतीच्या समाजात माझ्यापेक्षा खडतर जीवनात जगत वाटचाल करणारी असंख्य माणसे आहेत याची मला कल्पना आहे. पण आज छोट्या गोष्टींवरून पटकन निराश होणार्‍या शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या तरुण पिढीसाठी प्रेरणा ठरावा म्हणून हा लेख प्रपंच. मी काही मोठी विचारवंत, साहित्यिक नाही. एक सामान्य कुटुंबातली सामान्य स्त्री आहे. परंतु सामान्यातील एका जिद्दीची ही कथा आहे.
मी माहेरची अरूणा घारे. माहेर पुण्यातले. सदाशिव पेठेतील देशपांडे वाड्यातले. माझ्या लहानपणी माझ्या कुटुंबात तीन भाऊ, दोन बहिणी, आई-वडील व मी अशी एकूण आठ माणसे होतो. घरी अठरा विश्वं दारिद्य्र! सणासुदीलासुद्धा कधी लवकर नवा कपडा मिळायचा नाही. कायम जुन्या बाजारातून आणलेले कपडेच वापरावे लागत. प्रत्येकाला नवीन कपडे घेण्यातइतकी आई-वडिलांची परिस्थिती नव्हतीच. वडील प्रेसमध्ये कामाला १९६० साली अवघा ६० रु. पगार होता. ओव्हरटाईम केला तर २० ते ३० रु. वाढत असत. वडिलांच्या जिवावर खाणारी तोंडे जास्त व कमाई कमी त्यामुळे कायमच आर्थिक अडचण असायची. तशातच मी पाचवी, सहावीत असतानाच माझ्या दोन्ही बहिणींची लग्ने झाली. वडिलांनी प्रेसमधून कर्ज काढून लग्ने केली. घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे माझी आई मुक्ताबाई जवळपासच्या अनेक बंगल्यात जाऊन धुण्याभांड्याची कामे करी. ती म्हणे, ‘आम्ही शिकलेले नसल्याने हे काम करतो. पण तुम्ही तरी शिका. मोठे व्हा.’ असा आई सतत उपदेश करायची. आई बरोबर मी, माझा धाकटा भाऊ व मधला भाऊही आईच्या धुण्याभांड्याच्या कामात मदत करत असायचो. बंगल्यातले जिने झाडणे, झाडांना पाणी घालणे, आईला भांडी विसळू लागणे, कपडे पिळणे ही कामे आईबरोबर आम्ही भावंडे करत असू.
मी मुलगी असल्याने मला स्वतंत्र कामे आईने लावून दिली होती. चौथीत असतानाच सकाळी ८ वाजता चहा पिऊन, असेल तर नाही तर तसेच एस. पी. कॉलेजजवळील पटवर्धन खजिना विहिरीजवळील भाटवडेकर यांची भांडी घासून सकाळी ९ ते १० पर्यंत भिकारदास मारुतीजवळील मेहेंदळे यांचे घरकाम करून तेथून भरभर चालत किंवा काही वेळा पळतच १०.३० पर्यंत घरी यायचे. कामावरून आई आली असली तर तिने आणलेले कामवाल्यांनी दिलेले खायचे. किंवा रात्रीचे शिळेपाके खाऊन, कधी नुसतीच आमटी पिऊन तर एकेक वेळा उपाशीही मी शाळेत जात असे. उपाशी राहायची वेळ आली तर अलकाताई किंवा नवी पेठेत राहणारी मोठी अक्कामावशी (ताराबाई ढमाले) हे माझं व आम्हा भावंडांचं एकच आश्रयस्थान असे. पण रोज रोज मात्र मावशीकडे जायला नको वाटे. कारण तिलाही काकांचा धाक होताच. काका म्हणायचे फाटलेल्या आभाळाला कितीही शिवलं आणि कितीही दिलं तरी कमीच असतं. तरीही मावशी चोरून मदत करायची. संक्रांत व नागपंचमीला मला नवीन स्कर्ट, ब्लाऊजचे, फ्रॉकचे कापड आणायला ती अजिबात विसरायची नाही. माझ्या लग्न झालेल्या बहिणींचे माहेरपणही तीच करत असे.
१ ली ते ७ वी नारायण पेठेतील अनाथ हिंदू महिलाश्रमम शाळेत मी जात होते. आमच्या देशपांडे वाड्यातील बरीच मुले तिथे जायची. आमच्यासारख्या गरिबांना परवडणारी अशी एवढी एकच खाजगी शाळा त्या काळात होती. तिथे नाममात्र फी होती. पण ती द्यायलाही आईवडिलांना जमत नसे. त्यामुळे फीच्या मोबदल्यात मधल्या सुट्टीत बाईंच्या चहाच्या कपबश्या, चहाची भांडी मी विसळून ठेवत असे. माझ्याबरोबरीच्या मुली खेळत असताना आपण मात्र काम करायचे याचे मनातून फार वाईट वाटून मी कष्टी व उदास होत असे. अशावेळी आईचे शब् आठवायचे- तुझ्या बहिणी शिकल्या नाहीत म्हणून आम्ही त्यांची लग्ने करून दिली. तू शीक! मोठी हो! मास्तरीण बन! या शब्दांनी पुन्हा मनाला उभारी यायची.
शाळेत जाताना अंगावर धुणी-भांडी करून ओला झालेला फ्रॉक अथवा स्कर्ट-ब्लाऊज असायचा. गणवेश नसल्याने मुख्याध्यापिका ओरडायच्या, पण त्या परिस्थिती जाणून होत्या व माझा शाळेत सतत पहिला नंबर असल्याने व शिक्षणाची माझी तळमळ पाहून त्या शांत व्हायच्या. याच शाळेतील शिंगणापूरकर, देशपांडे व दाते या तीन शिक्षकांना माझे खूप कौतुक असे. विशेषतः शिगणापूरकर या बाईंना माझ्याविषयी खूप प्रेम होते. वर्गासमोर माझ्या कष्ट करून शाळेत येण्याबद्दल त्या नेहमी कौतुकाने बोलत. एकदा शाळेतल्या वर्गामधील एका मुलीचा फाऊंटन पेन हरविला. आम्ही दोघी शेजारी बसत असल्याने व मी गरीब असल्याने मीच तो घेतला असावा असा तिने माझ्यावर आरोप ठेवला. आईने शाळेत येऊन माझी मुलगी असं करणार नाही याची ग्वाही दिली. पण त्या मुलीच्या पालकांचे समाधान होईना. शेवटी कामावरून पैसे आणून तो मी भरून दिला व नंतर दोन-तीन दिवसांनी तो पेन तिच्याच दप्तरात सापडला. पण या घटनेचे वळ मात्र कायमचे माझ्या मनावर उमटले. गरिबी ही सर्वांची मेव्हणी असते, हेच हा प्रसंग सांगून गेला.
आठवीनंतर मंडईतील आदर्श विद्यालयात मी शिक्षण घेतले. ८ वी ते ११वी या काळातही १२ वाजता शाळेत जाण्यापूर्वी तीन घरची धुणीभांडी करून जावे लागे. डबा तर कधी नसायचाच. मधल्या सुट्टीत मुली डबा खायला लागल्या की मी घरचा अभ्यास पूर्ण करत बसत असे. पोटात प्रचंड भूक असे. पण रोज डबा नेणे शक्य नसे. डबा कधी नेलाच तर शिळी चपाती व मसाला तेल कालवून किंवा नुसती साखर कधीतरी मिळायची. त्या डब्याची मैत्रिणींमध्ये वाटावाटी करायलाही लाज वाटे. त्यापेक्षा डबा न नेलेला बरे असं वाटायचं. संध्याकाळी ६ वाजता घरी आल्यावर प्रचंड भूक लागलेली असायची. पण कधी कधी दुपारचे काहीही शिल्लक नसे. अशा वेळी डोळ्यांतून घळघळ अश्रू वाहत; नको ही गरिबी असं वाटायचं. देवाने आपल्याला श्रीमंत घरात जन्माला का घातले नाही? असाही विचार यायचा. ११ वी फर्स्टक्लास मिळाला तर पेढे घ्यायलाही पैसे नव्हते. पुढं कॉलेजला जावं असं मनातून वाटायला लागलं. पण वडील म्हणाले, ‘पुरे आता शिक्षण. कॉलेजला बिलेजला काही जायचं नाही. कॉलेजला गेल्यावर पोरी बिघडतात.’ आपलं शिक्षिकेचं स्वप्न अपुरंच राहणार असं वाटायला लागलं. दोन दिवस नीट जेवले नाही. रडून रडून डोळे लाल झालेले. आईने मग वडिलांची कशीबशी समजूत घातली. कॉलेजला मी फक्त अभ्यासच करीन, चांगली वागेन. कॉलेजचा खर्च शिकवण्या घेऊन पूर्ण करीन असं सगळं सांगितल्यावर वडील कसेबसे कॉलेजला पाठवायला तयार झाले. लहानपणी पटवर्धनांची भांडी घासायला जाताना रोजी एस. पी. कॉलेजवरून जावे लागायचे. त्यावेळी असं वाटायचं मोठेपणी आपल्याला या कॉलेजात यायला मिळेल का? आणि एस. पी. कॉलेजला ऍडमिशन घेतल्यावर ही इच्छा पूर्ण झाली. कॉलेजहून ११ वाजता आल्यावर नवी पेठेतील बंगल्यातील दोन कामे करावी लागत. कॉलेजच्या मुली बघतील का? आपल्याला हसतील, आपली चेष्टा करतील याची भीती वाटायची. त्यामुळे कुणाला काहीही मी संागत नसे. कॉलेजमध्ये गेल्यावरही आई जुनी पातळे कामावरून आणत असे. त्यांच्यावर काळा किंवा पांढरा ब्लाऊज घालून किंवा जमले तर ब्लाऊज मी शिवून घेई व कॉलेजला जाई. वडिलांना सलवार कुर्ता आवडत नसे. त्यामुळे साडीच नेसावी लागे. इतिहास स्पेशल हा विषय घेऊन मी एस. पी. महाविद्यालयातून १९७९ ला बी. ए. झाले. कॉलेजातील माझ्या इतिहासाच्या प्राध्यापिका कविता नरवणे यांना माझ्या घरची सर्व परिस्थिती माहीत होती. त्यांनी मला नेहमी चांगला अभ्यास करण्यास योग्य ते प्रोत्साहन दिले. याच कॉलेजमध्ये नीलिमा कुलकर्णी, संजीवनी देशपांडे व वुसुधा घारे यांच्यासारख्या जिवाला जीव देणार्‍या जिवाभावाच्या मैत्रिणी मला भेटल्या. नीलिमा व संजू तर अनेकदा आर्थिक मदतही करत. कॉलेजच्या काळात एस. वाय.ला असताना मी १९७८ला राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या संपात मोबदला कर्मचारी म्हणून एक महिनाभर काम केले व प्रथमच ६०० रु. एवढी भरघोस रक्कम माझ्या हातात आली. त्या कमाईचा मला केवढा आनंद झाला म्हणून सांगू? खूप दिवसांची घड्याळ घेण्याची इच्छा मी त्यामुळे पूर्ण करू शकले. भीतभीतच २०० रु.चे घड्याळ घेऊन उरलेले पैसे मी घरात देऊन टाकले.
बी. ए. झाल्यावर पुन्हा घरात वडिलांनी लग्नाच्या गोष्टी सुरू केल्या. मी म्हटले लग्न ठरेपर्यंत शिकते. यावेळी मोठा भाऊ रमेश व मैत्रिणी संजीवनी व वसुधा यांच्यामुळेच मी पुणे विद्यापीठात इतिहास विभागात ऍडमिशन घेतली. इथेच माझ्या जीवनात खरी दिशा मिळाली व त्याचे श्रेय माझे मार्गदर्शक इतिहासातील प्रपाठक कै. डॉ. अ. म. देशपांडे यांनाच द्यायला पाहिजे. सरांचे लेक्चर म्हणजे खर्‍या अर्थाने जीवनशिक्षण होते. सरांमुळेच जयकर लायब्ररीत कमवा व शिका योजनेत मी काम करू लागले. घरी आल्यावर ट्यूशन, फॉर्मच्या घड्या घालणे, गठ्ठे बांधणे, ते डोक्यावरून प्रेसला पोचविणे ही कामेही करावी लागत. शिकायचं असेल तर हे करावेच लागेल. आल्या खाण्यापुरते तरी कमवा असा सतत आईचा सल्ला असे. वडील तर नापास झाले की शिकायचे नाही हे ब्रीदवाक्य सतत ठसवीत. त्यामुळे शिक्षिका व्हायचं असेल तर नापास होऊन चालणार नाही. पडेल ते कष्ट व कोणत्याही परिस्थितीत उपाशी पोटी का होईना, पण उच्च शिक्षण घ्यायचे ही मनीषा मी बाळगून होते.
एम. ए. करत असताना कधी कधी बसच्या पासलाही पैसे नसायचे कारण या वेळेपर्यंत मोठा भाऊ लग्न करून स्वतंत्र राहू लागला होता. तो आमची जबाबदारी स्वीकारत नव्हता. मधल्या भावाचेही लग्न झालेले. मधल्या भावाची नोकरी फिरतीची व तुटपुंज्या पगाराची. त्यातच वडील सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांना मिळालेला पैसा त्यांच्या दुखण्यावर (औषधोपचारावर) खर्च झाला होता. आईच्या हातात काहीच शिल्लक नव्हते. आर्थिक चणचण तर वयाच्या २४ व्या वर्षापर्यंत पाचवीलाच पुजलेली होती. मधल्या भावाच्या पगारावर त्याची बायको, आई-वडील, मी आणि धाकटा भाऊ कसेबसे भागवत होतो. धाकट्याचेही शिक्षण चालू होते. मधल्या भावावर आपले ओझे पडू नये म्हणून मी व आई जास्तीत जास्त काम करत होतो. त्याच्या कष्टाळू पत्नीचीही त्याला साथ होती.
याच वेळी एम. ए. ला असताना वडिलांनी नको म्हटले तरी लग्न ठरवले. पण पुढे नीट चौकशी केल्यावर मुलगा कमी शिकलेला व नोकरीला नसल्याचे कळल्याने हे लग्न मोडले. परंतु ठरलेले लग्न मोडले म्हटल्यावर नातेवाईक व आजूबाजूंचे लोक चर्चा करू लागले. काहीही दोष नसताना लोकांची ही मानसिकता पाहून खूप निराशा यायला लागली. जीव द्यावासा वाटायचा. पण आत्महत्या हा भेकडवणाचा मार्ग आहे. जीवनाशी संघर्ष केलाच पाहिजे हेही दिवस जातील अशी माझी समजूत माझी एस. पी. कॉलेजपासून बरोबर असलेली मैत्रीण नीलिमा कुलकर्णी काढायची. या काळात देशपांडेसर व नीलिमाने खूप मोठा मानसिक आधार दिला.
एम. ए. झाल्यावर सरांनी मला लेक्चररशिपसाठी प्रयत्न करण्यास सांगितले. तू वर्गात सहज शिकवू शकशील असा आत्मविश्वास सरांनीच निर्माण केला. आणि मग सुरुवात झाली नोकरीसाठी वणवण भटकण्याची. यापूर्वीही टायपिस्ट, क्लार्कच्या नोकरीसाठी मी शेकडो अर्ज केलेले होते पण वशिला नसल्याने आणि मलाही अशा कारकुनाच्या नोकरीत फारसा रस नसल्याने तसेच शिक्षक वा प्राध्यापक व्हायचे या आकांक्षेने भारल्याने मला कधीही पूर्ण वेळ नोकरी मिळाली नाही. शिक्षण हे माझे पहिले उद्दिष्ट होते. ते करून मला नोकरी हवी होती व तशी मला कधीच मिळाली नाही.
लेक्चररशिपसाठी प्रथम नाशिक, मग जळगाव नंतर बारामती या तीन शहरात मी नामांकित संस्थांच्या कॉलेजमध्ये मुलाखती दिल्या, पण केवळ गुणवत्ता असून चालत नाही. संस्थेला आर्थिक मदत, वशिला याही गोष्टी नोकरीत महत्त्वाच्या असतात हे हळूहळू लक्षात यायला लागले. कधी कधी रंग-रूप नसल्यानेही इंटरव्ह्यू चांगला होऊनही इतरांचेच सिलेक्शन व्हायचे. हे सर्व पाहून आपण धुणी-भांडी करत इथवर आलो. पण आपल्याला लेक्चररशिप कधीच मिळणार नाही का? आपण एवढे शिक्षण तरी का घेतले? त्याचा उपयोग काय? या विचारांनी मन अस्वस्थ व बेचैन व्हायचे. तर इकडे नातेवाईक, पोरीचे वय वाढत चाललंय. आपल्या मराठा समाजात एवढी मोठी मुलगी बिनलग्नाची ठेवतात का? आई-वडिलांना झोपा तरी कशा लागतात? तीन मुलं असून आता मुलीच्या कमाईवर खाणार का? वगैरे टोचून बोलत असत. आणि तो शुभदिन उजाडला. Walk to Interview या नावाची नायगाव एज्युकेशन सोसायटीची १९८२ला सकाळमध्ये जाहिरात आली होती. दौंडला नव्यानेच स्थापन होणार्‍या कॉलेजसाठी प्राचार्य, तासिका तत्त्वावर, पार्टटाईम, फुलटाईम असे प्राध्यापक नेमायचे होते. इतिहासाची जागा तासिका तत्त्वावर होती. तिसर्‍यांदा माझा इंटरव्ह्यू घेणार्‍या डॉ. के. एम. चिटणीसांनी यापूर्वी गुणवत्तेवर माझे दोनदा सिलेक्शन केले होते. आताही मला इंटरव्ह्यूला पाहून त्यांना आश्चर्य वाटले. इथे मात्र सरांच्या सिलेक्शनला संस्थेनेही शिक्कामोर्तब केले व लेक्चररशिपची नोकरी मला मिळाली. माझ्या आयुष्यातील हा अत्यंत भाग्याचा क्षण होता. महिन्याला पगार होता अवघा १४० रु. त्यातले ३६ रु. रेल्वेच्या पासालाच जात. आठवड्यातून चार दिवस दौंडला शिकवायला जावे लागे. या काळात मी एम. फिल पूर्ण केले. दरम्यान घरच्या परिस्थितीने व भावांवर, आईवर (दौंडला नोकरी लागल्यावर वडिलांच्या मृत्यूचेही दुःख पचवावे लागले) आर्थिक बोजा पडू नये म्हणून हुंडा न घेणार्‍या मुलाशीच मी लग्न केले. संस्थाध्यक्ष माधवराव पवार यांना मी आत्तापर्यंत केलेला संघर्ष माहीत झाला. कोणताही वशिला नसताना, पैसे न भरता नोकरी मिळाली व प्राध्यापिका होण्याचे माझे स्वप्न साकार झाले.
लग्न झाल्यावर मी पतीला घेऊन दौंडलाच स्थायिक झाले. त्यांना खाजगी नोकरी सोडायला लावून त्यांच्या आवडीच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांना करियर करावे म्हणून त्यांना आर्थिक व मानसिक पाठबळ दिले. आज दौंडमध्ये गेली सोळा वर्षे एका प्रतिथयश संपादक म्हणून ‘साप्ताहिक दौंड तालुका बातमीदार’ हे साप्ताहिक ते चालवत आहेत.
आज कर्तृत्वाच्या, प्रामाणिकपणाच्या, धडाडीने काम करण्याच्या वृत्तीने पुक्टो संघटनेची कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करत आहे. दौंड शिक्षण सेवक पतसंस्थेचे अध्यक्षपद दहा वर्षे माझ्याकडे होते. पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळावर दोनदा निवडून गेले. अभ्यासू वृत्तीमुळे प्रथम ते तृतीय कला वर्गासाठी नवीन अभ्यासक्रमानुसार सहा क्रमिक पुस्तकांचे सहलेखकांबरोबर मी लेखन केले आहे. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या कार्यकारी मंडळावर दोनदा निवड झाली.
हा ‘अहं’ किंवा ‘स्व’चा गौरव नाही.
तर प्राध्यापक शिक्षक होण्याच्या जिद्दीने, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत, पतीची प्रेरणा, आईवडिलांचा आशीर्वाद, प्राचार्य तु. ह. दाते यांचे प्रोत्साहन, माझे कॉलेजचे सहकारी प्राचार्य ढेकणे, प्रा. शरद पवार, प्रा. एस. के. पोळ, प्रा. संजय व सुषमा इंगळे या सर्वांच्या सहकार्यामुळे आज मी इथवर पोचले. मणिभाई देसाई, सामाजिक शैक्षणिक पुरस्कार, प्रियदर्शिनी इंदिरा पुरस्कार, लायन्स क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार व रोटरी क्लब इंटरनॅशनलचा उत्कृष्ट सेवा पुरस्कार अशा सर्व पुरस्कारांनी सन्मानित होऊनही सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून रोटरी क्लब, अस्मिता मंच या संघटनांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात मी सहभागी होते.
विद्या बाळ आणि गीताली वि. मं. यांच्यामुळे मी ‘मिळून सार्‍याजणी’ची दौंड तालुक्याची प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. त्यांच्या प्रेरणेनेच विद्यार्थिनींसाठी, दौंडमधील महिलांसाठी नवविचार तसेच स्त्रीवादाची जाणीव निर्माण करण्यासाठी महिलांच्या आत्मभान जागृतीचे कार्य मी करत आहे. कॉलेजमध्ये व अस्मिता मंचमध्ये स्त्रीवादी विचारवंत तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर विदुषींना आणण्याचे काम मिळून सार्‍याजणींच्या माध्यमातून मला शक्य झाले. माझ्या या वाटचालीत पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिका विद्युत भागवत, शर्मिला रेगे, अनघा तांबे यांचेही मला सतत मार्गदर्शन झाले. त्यांनी सतत मला प्रेरणा व प्रोत्साहन दिले.
पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातील डॉ. राजा दीक्षित, डॉ. रेखा रानडे, डॉ. सुमित्रा कुलकर्णी यांनीही या वाटचालीत प्राध्यापकी पेशात माझ्याकडून वेळोवेळी ज्या काही चुका झाल्या त्या मला दाखवून देऊन माझी कानउघाडणी करण्याचेही काम त्यांनी केले. त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोचू शकले.
तसेच पुक्टो संघटनेचे कै. डॉ. अरूण दीक्षित यांनी मला सतत प्रोत्साहन दिले. मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनीही सतत कौतुकाची थाप माझ्या पाठीवर दिली. डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. सदाशिव शिवदे, डॉ. रोमनाथ रोडे या इतिहासकारांनी वेळोवेळी योग्य त्या सूचना व मार्गदर्शन केल्यामुळेच माझे पीएचडी. प्रबंधाचे काम पूर्ण होऊ शकले. डॉ. धनसिंग जगताप व डॉ. मधुकर जाधव यांच्या मार्गदर्शनाशिवाय संशोधनाचे काम अपूर्णच राहिले असते. त्यांच्यामुळेच माझे संशोधन पूर्णत्वास गेले.
मोलकरीण ते प्राध्यापिका या संघर्षमय जीवनाला कष्टाची जोड आहे. कॉलेजच्या जीवनापर्यंत अनवाणी पायाने केलेल्या प्रवासाची साथ आहे. गरिबीमुळे केला जाणारा अपमान, उपहासाची झालर आहे. पण स्वाभिमान, अस्मिता, संकटाला धैर्याने सामोरे जाणे या बळावरच आणि गुरूमाई व मुक्तानंद बाबांच्या आशीर्वादाने व कृपेनेच मोलकरणीची प्राध्यापिका झाली हे निश्चितच!
‘का वेदनेतून जन्म होतो साधनेचा?’ या मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील प्रश्नांचे उत्तरच जणू मला या प्रवासाने मिळाले.
-----
प्रा. अरूणा मोरे
इतिहास विभाग प्रमुख,
दौंड कॉलेज, दौंड, जि. पुणे

Saturday, March 1, 2014












एकाच वेळेला शंभर हलग्या वाजवत त्याचे जंगी स्वागत होणार आहे. अख्खे गाव त्याच्या स्वागतासाठी आतुरलेले आहे

Shantaram Kale kaleshantaramlaxman@gmail.com

8:05 PM (2 minutes ago)

to shantaram, shantaram
आजपर्यंत तो दुसऱ्यांच्या स्वागतासाठी हलगी वाजवायचा. आता प्रथमच त्याच्या स्वागतासाठी हलगीचे सूर निनादणार आहेत. एकाच वेळेला शंभर हलग्या वाजवत त्याचे जंगी स्वागत होणार आहे. अख्खे गाव त्याच्या स्वागतासाठी आतुरलेले आहे. त्याला गावी जायचे वेध लागले आहेत. दि. २ मार्चला ही प्रतीक्षा संपणार आहे!
ही गोष्ट आहे, मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या व सध्या चर्चेत असलेल्या 'फँड्री' चित्रपटातील नायक जब्याची भूमिका साकारणाऱ्या सोमनाथ अवघडे या तरुण कलाकाराची आणि त्याच्या केम गावाची. २ मार्चला केम (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथे सोमनाथचा हृदयकौतुक सोहळा आयोजित केला आहे. 'फँड्री' या चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारलेले प्रा. संजय चौधरी एका कार्यक्रमानिमित्ताने अकोले महाविद्यालयात आले होते. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळे हे चौधरी सरांचे विद्यार्थी. जेऊर (ता. करमाळा) येथील महाविद्यालयात चौधरी सरांच्या हाताखालीच मंजुळे यांनी तीन वर्षे कलेचे धडे गिरविले.
केम हे सोलापूर जिल्ह्य़ाच्या करमाळा तालुक्यातील एक लहानसे खेडेगाव. गावातील सोमनाथ अवघडे हा हलगी वाजवणारा तरुण मंजुळे यांच्या नजरेस पडला आणि फँड्रीच्या नायकाचा त्यांचा शोध तेथेच संपला. आधी आढेवेढे घेणाऱ्या सोमनाथला चित्रपटात काम करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. मात्र एकदा हो म्हटल्यानंतर त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले व दिग्दर्शकाचा विश्वास सार्थ ठरवला. चित्रपटाला अभूतपूर्व यश मिळाले. त्यातील सोमनाथची भूमिकाही गाजली. चित्रपटाबरोबरच त्याचेही कोडकौतुक झाले. अनेक पारितोषिके मिळाली. उपेक्षित समाजातील परंपरेने हलगी वाजविणारा एक मुलगा साऱ्या जगभर जेथेजेथे मराठी माणूस आहे, तेथे पोहोचला. सोमनाथचा पडद्यावरचा वावर पाहून त्याचे गाव सुखावले. त्याचे होणारे कौतुक ऐकून आनंदले. गावाचा तो अभिमानिबदू ठरला. गावाचे नाव मोठे करणाऱ्या सोमनाथचा गावाने दोन मार्च रोजी सत्कार आयोजित केला आहे. त्याच दिवशी गावाची यात्राही आहे. सोमनाथ सध्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फिरतो आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो प्रथमच गावी येत आहे. आपल्या या लाडक्या लेकाचे कौतुक करण्यासाठी गाव अधीर झाले आहे. गावात सध्या त्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती प्रा. चौधरी यांनी दिली.
सोमनाथचे कुटुंब तसे सामान्य कष्टकरी कुटुंब. पिढीजात हलगीवादनाची त्यांची परंपरा. सोमनाथची आई शेतात मोलमजुरी करते. नववीत शिकणाऱ्या सोमनाथकडे गावाचे तसे कधी लक्ष गेले नव्हते. पण फँड्रीतील भूमिकेमुळे रातोरात सोमनाथ 'हिरो' झाला. त्याने गावाची मान उंचावल्याची गावकऱ्यांची भावना आहे. सोमनाथ उत्कृष्ट हलगीवादक आहे. अजय-अतुल या जोडगोळीने संगीतबद्ध केलेल्या थीम साँगमध्ये सोमनाथनेच हलगी वाजवली असल्याचे प्रा. चौधरी यांनी आवर्जून सांगितले.

Friday, February 21, 2014

ICTs stand for information and communication technologies and are defined, for the purposes of this primer, as a “diverse set of technological tools and resources used to communicate, and to create, disseminate, store, and manage information.” [4] These technologies include computers, the Internet, broadcasting technologies (radio and television), and telephony.
In recent years there has been a groundswell of interest in how computers and the Internet can best be harnessed to improve the efficiency and effectiveness of education at all levels and in both formal and non-formal settings. But ICTs are more than just these technologies; older technologies such as the telephone, radio and television, although now given less attention, have a longer and richer history as instructional tools. For instance, radio and television have for over forty years been used for open and distance learning, although print remains the cheapest,most accessible and therefore most dominant delivery mechanism in both developed and developing countries. The use of computers and the Internet is still in its infancy in developing countries, if these are used at all, due to limited infrastructure and the attendant high costs of access.
Moreover, different technologies are typically used in combination rather than as the sole delivery mechanism. For instance, the Kothmale Community Radio Internet uses both radio broadcasts and computer and Internet technologies to facilitate the sharing of information and provide educational opportunities in a rural community in Sri Lanka.Similarly, the Indira Gandhi National Open University in India combines the use of print, recorded audio and video, broadcast radio and television, and audioconferencing technologies. [9]

What is e-learning?

Although most commonly associated with higher education and corporate training, e-learning encompasses learning at all levels, both formal and non-formal, that uses an information network—the Internet, an intranet (LAN) or extranet (WAN)—whether wholly or in part, for course delivery, interaction, evaluation and/or facilitation. Others prefer the term online learning. Web-based learning is a subset of e-learning and refers to learning using an Internet mainly using a browser (such as Chrome or Firefox or Internet Explorer).

What is blended learning?

Another term that is gaining currency is blended learning.This refers to learning models that combine traditional classroom practice with e-learning solutions.For example, students in a traditional class can be assigned both print-based and online materials, have online mentoring sessions with their teacher through chat, and are subscribed to a class email list. Or a Web-based training course can be enhanced by periodic face-to-face instruction.“Blending”was prompted by the recognition that not all learning is best achieved in an electronically-mediated environment, particularly one that dispenses with a live instructor altogether. Instead, consideration must be given to the subject matter, the learning objectives and outcomes, the characteristics of the learners, and the learning context in order to arrive at the optimum mix of instructional and delivery methods.

What is open and distance learning?

Open and distance learning is defined by the Commonwealth of Learning as “a way of providing learning opportunities that is characterized by the separation of teacher and learner in time or place, or both time and place; learning that is certified in some way by an institution or agency; the use of a variety of media, including print and electronic; two-way communications that allow learners and tutors to interact; the possibility of occasional face-to-face meetings; and a specialized division of labour in the production and delivery of courses.”

What is meant by a learner-centered environment?

The National Research Council of the U.S. defines learner-centered environments as those that “pay careful attention to the knowledge, skills, attitudes, and beliefs that learners bring with them to the classroom.” [11] The impetus for learner-centredness derives from a theory of learning called constructivism, which views learning as a process in which individuals “construct” meaning based on prior knowledge and experience. Experience enables individuals to build mental models or schemas, which in turn provide meaning and organization to subsequent experience. Thus knowledge is not “out there”,independent of the learner and which the learner passively receives; rather, knowledge is created through an active process in which the learner transforms information, constructs hypothesis, and makes decisions using his/her mental models. A form of constructivism called social constructivism also emphasizes the role of the teacher, parents, peers and other community members in helping learners to master concepts that they would not be able to understand on their own. For social constructivists, learning must be active, contextual and social. It is best done in a group setting with the teacher as facilitator or guide.

Friday, June 7, 2013

नगर जिल्ह्यातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या भंडारदरा परिसरात तुरळक पाऊस झाला आहे. धरणातील पाणी साठ्याने ही तळ गाठला असून मोठ्या पावसाची येथील भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. त्यांनी शेतीच्या मशागतीची कामे सुरु केली आहेत.तसेच या परिसारत काजव्याचा महोत्सव सुरु असून तो पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत आहेत. रात्रीच्या अंधारात लाखोंच्या संखेने उडणारे काजवे पाहताना डोळ्याचे पारणे फिटते. या परिसरातील ही छायाचित्रे टिपली आहेत नगर सकाळचे छायाचित्रकार मंदार साबळे यांनी.

















फोटो गॅलरी

शिकार आणि शिकारी (फोटो फिचर)
- मंदार साबळे - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2013 - 03:24 PM IST

नगर- भंडारदरा परिसरात सध्या काजवे महोत्सव सुरू असून, हे पाहण्यासाठी राज्यातून लोक येत आहेत. बुधवारी (ता. 5) रात्री काजव्यांचे छायाचित्रे घेत असताना रात्री दीडच्या सुमारास रस्त्यावरून अडवा जाणारा धामण सर्प दिसला. तो पाहत असतानाच काही क्षणात तिच्या पाठोपाठ मण्यार हा अतिविषारी सर्प येताना दिसला. शिकार पुढे होती आणि शिकारी मागे असे हे दृश्‍य होते. मण्यार हा भारतात आढळणाऱ्या प्रमुख चार विषारी सापांपैकी असून, हा निशाचर आहे. तो इतर छोटे साप खाऊन आपली गुजराण करतो. त्यामुळे त्या रात्री त्याने धामिनीला आपली शिकार बनवले होते. तिला दंश करून सोडून दिल्या नंतर तिचा माग काढत येऊन तिला फस्त करे पर्यंतच्या या शिकार नाट्याची नगर 'सकाळ'चे वृत्त छायाचित्रकार मंदार साबळे यांनी टिपलेली ही विविध दृश्‍ये.




















फोटो गॅलरी
प्रतिक्रिया
अर्चना बुद्धिसागर - शुक्रवार, 7 जून 2013 - 04:14 PM IST
अप्रतिम! फक्त प्लास्टिक पाहून वाईट वाटले. एका दुर्मिळ प्रसंगाची छायाचित्रे दाखवल्याबद्दल धन्यवाद!
परेश कुलकर्णी - शुक्रवार, 7 जून 2013 - 04:12 PM IST
अतिशय हृदयद्रावक आणि दुर्मिळ चित्र टिपले आहे. अभिनंदन मंदार साबळे! had it been a video, it would be at par with Discovery and Nat geo documentaries. Definitely photographs are too good. Protect snakes!!!
परेश कुलकर्णी - शुक्रवार, 7 जून 2013 - 04:12 PM IST
अतिशय हृदयद्रावक आणि दुर्मिळ चित्र टिपले आहे. अभिनंदन मंदार साबळे! had it been a video, it would be at par with Discovery and Nat geo documentaries. Definitely photographs are too good. Protect snakes!!!
संदीप - शुक्रवार, 7 जून 2013 - 04:10 PM IST
जबरदस्त !!!!! छायाचित्रकाराचे (मंदार) कौतुक करावे तेवढे थोडेच
abhimanyu - शुक्रवार, 7 जून 2013 - 04:06 PM IST
अप्रतिम व दुर्मिळ प्रसंगाची फोटो पहावयास मिळाले.सकाळचे आभार.
DR.TEJAS DESHMUKH - शुक्रवार, 7 जून 2013 - 04:05 PM IST
jabardast shootout at bhandardara.you are really lucky
भैरव - शुक्रवार, 7 जून 2013 - 03:58 PM IST
झकास!! पण फोटोज ची क्रमवारी नीट लावली असती तर आणखी छान झाले असते. माणसाचे निसर्गावरील आक्रमण ५ व्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे :(
vinayak - शुक्रवार, 7 जून 2013 - 03:55 PM IST
फोटो छान आहेत पण जंगलात प्लास्टिक बघून वाईट वाटले.
विजय nimbalkar - शुक्रवार, 7 जून 2013 - 03:48 PM IST
गुड photography .
गणेश - शुक्रवार, 7 जून 2013 - 03:40 PM IST
१ नंबर फोटो
pravin - शुक्रवार, 7 जून 2013 - 03:38 PM IST
अप्रतिम फोतोग्रफ्य
एक वाचक - शुक्रवार, 7 जून 2013 - 03:36 PM IST
अप्रतिम...Many thanks to Mandar for such rare snaps...
नवी प्रतिक्रिया द्या
तुमचे नाव *
ई-मेल *
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक