Wednesday, March 25, 2020

करोनाला नाकरण्यासाठी आज आपण घरात बसून आरोग्यची गुढी उभारून आलेल्या संकटावर मत करू या 0



अकोले (शांताराम काळे ), ता . २५:सध्या कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे ते रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार युध्य पातळीवर प्रयत्न करीत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपणाला  २१ दिवस घरात बसण्याचे आव्हान केले आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन करोनाला नाकरण्यासाठी आज आपण घरात बसून आरोग्यची गुढी उभारून आलेल्या संकटावर मत करू या मी घरातच आहे तुम्हीही घरातच राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्या असे उद्गार माजी आमदार वैभव पिचड यांनी काढले ते पत्रकारांशी बोलत   होते . आज गुढीपाडवायच्या दिवशी त्यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत गुढी उभारून तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी , ग्रामसेवक , सरपंच , ओलीस यांच्याशी संपर्क साधून तालुक्याच्या बाबत आढावा घेतला यावेळी त्यांच्यासम वेत  सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे , उपसभापती दत्तात्रय देशमुख , सरपंच गणपत देशमुख उपस्थित होते प्रसंगी बोलताना ते म्हणाले कोरोना विरुद्ध लढाई हि प्रशासनापूर्ती मर्यदित राहिली नसून हि लढाई नागरिकांनी उत्स्फूर्त पणे स्वीकारली आहे . आरोग्य , महसूल व पोलीस खाते आपल्याला मोलाची साथ करीत आहेत काही जागृत नागरिक पत्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून स्थानिक परिस्थिती प्रशासनाच्या लक्ष्यात आणून देत आहे . मात्र त्याला काही लोक अपवाद  आहे लातो के  भूत बातोसे नाही मानते त्याप्रमाणे त्यांच्यावर पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जात आहे . तालुक्यातील तहसीलदार , पोलीस अधिकारी , आरोग्य अधिकारी गटविकास अधिकारी ग्रामसेवक , अंगणवाडी सेविका काम करीत आहे त्यांना मदत व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर किमान २१ दिवस घराबाहेर पडू नये , तुमच्या गावात पुणे मुंबई व इतर भागातून तुमचे नातेवाईक अथवा नोकरीनिमित्त बाहेर गेलेले येत असतील तर त्यांची नोंद आरोग्य विभागाकडे करून त्यांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश द्या ते तुमच्या सर्वांच्या हिताचे राहील असा सल्लाही पिचड यांनी दिला .काही  ठिकाणी  गर्दी हटायला तयार नाही.लोक प्रशासन, पोलिसांसोबत वाद घालतांना दिसत आहेत.जणू काही ते आपले शत्रू आहेत. अजूनही लोकांना कोरोनाचे गांभीर्य कळालेले दिसत नाही. आपल्या घरीच रहाणे सर्वांसाठी किती सुरक्षित आहे हे कधी लक्षात येणार आमच्या !!! अजूनही वेळ गेलेली नाही.प्रशासनाला सहकार्य करा.नाहीतर कोणत्याही क्षणी कोरोना आपल्या घराच्या दरवाज्यावर येऊन टकटक करेल... पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल. सावध व्हा. अनावश्यक  रस्तावर येऊच नका.आपला जीव आणि आपलं कुटुंब आपणच सुरक्षित ठेवा.आरोग्याची गुढी उभारून कोरोनाला पराभूत करा पाडव्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. सोबत फोटो 

Monday, March 23, 2020

संतोष चा जिद्द व चिकाटी मुले चहावाला ते पीएसआय प्रवास

टपरीचालक ते पोलीस उपनिरीक्षक.....

जिद्द  संयम आणि चिकाटी जर आपल्या जवळ असेल तर आपण यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजुर गावाजवळ एका वाडीत राहणारा मुलगा ज्याचं नाव आहे संतोष वाळु देशमुख. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आई आणि वडील दोघेही शेतमजूर ,कुटुंब चालविण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कारण वाळू देशमुखांना दोन एकर कोरडवाहू शेती,दोन-चार पोती भात पिकणार यावर संपूर्ण घर चालवायचं.हा संघर्ष संतोष जवळून पाहत होता.दोन मुलं आणि एक मुलगी या सगळ्यांचा सांभाळ करायचा असेल तर कष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता. संतोष लहानपणापासून तसा हुशार पण परिस्थितीपुढे हतबल झालेला.त्याचे प्राथमिक ते पदवीपर्यंत शिक्षण राजुर येथे झाले .अर्थशास्त्र या विषयातून त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले नंतर मित्रांच्या आर्थिक मदतीने तो पुण्याला पुढील शिक्षणासाठी गेला तेथे प्रा.डॉ.सुरेश देशमुख यांच्या मदतीने त्याला एस. पी .कॉलेजमध्ये एम.ए.साठी प्रवेश मिळाला संतोषला राहण्याची सोय तेथे नव्हती. खूप प्रयत्न करून तो  मित्राच्या रूमवर राहू लागला .परत तो गावी आला त्याने पान टपरीवर काम करायला सुरुवात केली. याच काळात अहमदनगरचे पोलीस अधीक्षक म्हणून कृष्ण प्रकाश यांनी कार्यभार हाती घेतला होता.संतोष कृष्णप्रकाश यांच्या पोलीस खात्यातील कार्यावर खूप खुश झाला व त्याने असे ठरवले की आपण खूप अभ्यास करून पोलीस खात्यातच नोकरी करावी  म्हणून तो पुन्हा पुण्याला गेला तेथे त्यानेअभ्यास करायला सुरुवात केली .आपण आयुष्यात काहीतरी चांगलं करावं या उद्देशाने त्यांने प्रचंड मेहनत केली .त्याला जाणीव होती की आपले आई-वडील आपल्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत.आई तर असवल्या डोंगरावरून गवताचा भारा घेऊन राजूरच्या बाजारात विकायला येते  तो एक भारा अवघ्या ५० ते ६० रुपयाला विकला जातो.६० रुपये मिळवण्यासाठी ती माऊली ७ किलोमीटर पायपीट करते तर वडील भल्या पहाटे उठून त्याच डोंगरावर शेळ्या वळा यला जातात .संतोषने आई वडिलांचा हा संघर्ष जवळून पाहिला होता प्रशांत भांगरे या संतोषच्या मित्राने पुण्यात येऊन एमपीएससीचा अभ्यास करायला सुरुवात कर असा सल्ला दिला यातूनच सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत संतोष सातत्याने अभ्यास करत राहिला सकारात्मक विचार करणाऱ्या मित्रांचा सहवास मिळाल्यामुळे व प्रचंड आत्मविश्वास व कठोर परिश्रम यामुळे संतोष २०१८ च्या एमपीएससी परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक झाला .अनुसूचित जमाती(एस.टी)मध्ये तो राज्यात ७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.काहीतरी वेगळं करून दाखवण्याची त्याची इच्छा आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली. तो पास झाल्याची बातमी गावी समजली त्याही दिवशी त्याची आई  गवताचा भारा घेऊन गावात विकायला आली होती.त्याच वेळेस तेथे असलेल्या लोकांनी म्हटले की "बाई आता तरी गवताचा भारा वाहन बंद कर" कारण तुझा मुलगा साहेब झालाय!  हे ऐकताच त्या माऊलीच्या डोळ्यात खळकन पाणी  आलं. मी केलेल्या कष्टाचं चीज झालं असे एक वाक्य तिच्या तोंडून बाहेर पडल. संतोषचे आज सर्वत्र कौतुक होत आहे एका छोट्याशा वाडीतला संतोष पोलीस उपनिरीक्षक झाल्याचा आनंद सर्वांना होताना दिसतो आहे. गरिबीवर मात करत ,परिश्रमाची कास धरत आपण उत्तम यश मिळवू शकतो असे संतोष आवर्जून सांगतो आहे.संतोषला भविष्यात गावात वाचनालय व स्पर्धापरीक्षा केंद्र सुरू करण्याचा त्याचा मानस आहे.तसेच संतोषला  Dy.sp  व्हायचय.संतोष  तुझ्या जिद्दीला सलाम व तुझ्या पुढील वाटचालीस आभाळभरून शुभेच्छा.....
संतोष तुझे यश सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
-------------------------------

Wednesday, March 18, 2020

हरीसचंद्र गड एक अविस्मरणीय

भटक्यांची पंढरी: हरिश्चंद्रगड...

      एकेकाळी अतिशय दुर्गम व लोकवस्तीपासून दूर असलेल्या हरिश्चंद्र गडाने महायोगी संत चांगदेवापासून निसर्गवेड्या मिलिंद गुणाजीपर्यंत अनेक दुर्गवेड्यांना, हौशी पर्यटकांना मोहित केले आहे. वनस्पतीशास्राचे अभ्यासक, भूगर्भशास्रवेत्ते, भाषा अभ्यासक, धाडसी  गिर्यारोहक, विरक्त योगी आणि सामान्य श्रद्धाळू असे कितीतरी जण या गडाच्या प्रेमात पडले.पाचव्या शतकातील त्रेकुटक  व कलचुरी राज घराण्याच्या कारकीर्दीपासून हा गड इतिहासप्रसिद्ध आहे. स्कंद, अग्नी व मत्स्य पुराणात याचा उल्लेख आहे. मराठेशाहीच्या अखेरच्या युद्धात मे १८१८ मध्ये इंग्रजी सैन्यातील एक अधिकारी कर्नल मार्किनटोशच्या फौजेने हा गड काबीज केला. इतर किल्यांप्रमाणे या किल्ल्याच्याही अवघड वाटा, पाण्याची टाकी, तटबंदी त्याने उध्वस्त केली. मात्र हरिश्चंद्रेश्वराचे देखणे मंदिर व लेण्यांना त्याने धक्का लावला नाही. गेल्या काही वर्षात ऊन, वारा, पाऊस या बाह्य कारकानी मात्र या प्राचीन वास्तूच्या वैभवास सुरुंग लावले आहेत. या मंदिराची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण  अशी आहे. कळसापर्यंत ५५ ते ६० फुट उंचीच्या मंदिराच्या भिंतीवर पाय-यांवर अतिशय आकर्षक व शैलदार कोरीव काम केलेले आहे. सभामंडपाच्या गाभा-यात जाण्यासाठी पूर्व व पश्चिम अशा दोन बाजूंनी प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस कोरीव गणेशमूर्ती असून, या मूर्तीच्या वरील बाजूस देवनागरी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. बांधीव मंदिराच्या प्रांगणाला बंदिस्त करण्यासाठी प्राकाराची भिंत बांधलेली आहे. मंदिराच्या पश्चिमेस दोन ऐसपैस गुहा आहेत. यातील एका प्रशस्त गुहेच्या तळघरात योगी चांगदेव तपश्चर्येला बसत असल्याचे सांगितले जाते. शेजारील गुहेत विठ्ठल - रुख्मिणीची मूर्ती वारकरी सांप्रदायाच्या संदर्भाने मनात कुतूहल निर्माण करते. गुहेलगत पाण्याची दोन टाकी आहेत. भिंतीशेजारून एक प्रवाह उत्तरेकडे उताराच्या दिशेने वाहत जातो. या प्रवाहालाच संत चांगदेवानी 'मंगळगंगा' म्हटले आहे. या प्रवाहावर पुलासारखे बांधकाम असून तेथूनच पूर्वेकडून मंदिरात प्रवेशता येते. या वास्तुवैभवाला बह्याकारकांची  जणू दृष्ट लागली असून, कालौघात प्राकाराची भिंत व मंदिराच्या पश्चिम बाजूची मोठी पडझड झाली आहे. यातील काही दगड मंगळगंगेच्या वेगवान प्रवाहाबरोबर घरंगळत लांबवर गेले आहेत.
       मंदिराच्या उत्तरेला घारापुरीच्या लेण्याची आठवण करून देणारी एक भव्य गुंफा आहे. हेच ते केदारेश्वराचे लेणे. गुहेत चौथ-यावर भव्य शिवलिंग आहे. त्याच्या चारही बाजूला बाराही महिने थंडगार पाणी असते. चौथ-याच्या चारही कोप-यावर छतापासून कोरलेले खांब असले तरी त्यापैकी तीन पूर्णपणे तुटले आहे. त्यांचा अर्धवट भाग लोंबकळत आहे. लेण्याच्या दर्शनी बाजूच्या कोरलेल्या खांबांपैकी तीन खांबावर अस्पष्ट शिलालेख दिसतात.
         मंदिराच्या पूर्वेला हेमाडपंथी वापी म्हणजेच सप्ततीर्थ (सर्वतीर्थ ) आहे. या प्रशस्त तीर्थकुंडात डिसेंबरअखेरपर्यंत पाणी असते. कुंडांच्या दक्षिणेला १४ देवळयांमध्ये १४ विष्णुमूर्ती विराजमान होत्या. देवालयाची व या बांधीव तीर्थकुंडाची मोठी पडझड झाली. येथील काही विष्णुमूर्ती गायब झाल्या तर उर्वरित विष्णुमूर्ती मंदिरामागील गुहेत अस्ताव्यस्त पडल्या आहेत. तीर्थकुंडासमोर एक छोटेखानी मंदिर असून, काशीतीर्थ नावाने ते ओळखले जाते. मंदिरासमोर एक अपूर्ण शिल्प आहे. त्याचा अर्थबोध होत नाही. या मंदिराचीदेखील मोठी पडझड झाली आहे.
        तारामती शिखराच्या उत्तरेला पायथ्याशी नऊ लेण्यांचा समूह आहे. या लेण्यांच्या दर्शनी बाजूच्या चौकटीवर गणेशमूर्ती कोरलेल्या आहेत. अभ्यासकांच्या मते ही लेणी १० व्या किंवा ११ व्या शतकातील असावीत. या समूहातील दुसरे लेणे आकाराने सर्वात मोठे आहे. तिसरी गुंफा अपूर्ण अवस्थेत आहे. या गुफेचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे सहा फुट उंचीची भव्य गणेशमूर्ती आहे. मूर्तीचे बरकाईने निरीक्षण केल्यास ती दिगंबर अवस्थेत असल्याचे दिसते. दिगंबरावस्थेतील गणेशमूर्ती अतिशय दुर्मिळ असल्याचे सांगितले जाते. समोरच्या  गणेश मंदिरातील मूर्तीदेखील दिगंबरावस्थेत आहे.
         गडावर इतिहासाची साक्ष देणारे एकूण आठ शिलालेख आहेत. विशेष बाब म्हणजे विदेशी संशोधकांनी सर्वप्रथम या लेखांकडे लक्ष वेधले. जेम्स फर्गुसन, जेम्स बर्जेस, सिंक्लेअर यांनी प्रथम यावर टिपणे तयार केली. गो. नी. दांडेकर, रा.चिं. ढेरे, वि.भी.कोलते, म.रा.जोशी, आनंद पाळंदे, राजेश्वर गोस्वामी आदींनी शिलालेखांचे वाचन केले. योगी चांगदेव आपल्या शिष्यगणांसह येथे वास्तव्यास होते. त्यांनी तत्त्वसार या ग्रंथाची रचना येथेच केली. या ग्रंथाच्या शेवटी एका ओवीत शके १२३४ ला हरिश्चंद्र गडावर ग्रंथ पूर्ण केल्याचा उल्लेख आहे. काळाच्या ओघात शिलालेखांचा हा पुरावा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. प्राचीन काळात हा गड धर्मपीठ म्हणून मान्यता  पावलेला होता असे सांगितले जाते. त्याच्या वैभवाच्या खाणाखुणा जागोजाग विखुरलेल्या आहेत. बाह्यकारकांच्या सततच्या तुफानी हल्ल्यामुळे वस्तूवैभवाला अलीकडच्या काळात ओहोटी लागली असून, आता तर ते नष्ट होण्याच्याच मार्गावर आहे. या वस्तूंच्या जतनासाठी व संरक्षणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
      पुरातन वस्तू शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराची व येथील लेण्यांची व इतर वास्तुरचनांची सध्या मोठी पडझड झाली आहे. गुफांमधील कोरीव लेणी सप्ततीर्थ, काशीतीर्थ व केदारेश्वराचे लेणे यांचे जतन व संरक्षणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न नजीकच्या काळात झाले नाही तर हे प्राचीनतम वैभव नष्ट होऊन केवळ भग्न अवशेष तेवढे शिल्लक राहतील. अशी सद्यस्थिती आहे. इतिहासाची साक्ष देणारे येथील शिलालेखही सध्या आपले अस्तित्वच हरवून बसल्यात जमा आहेत. योगी चांगदेवांच्या तपोभूमीला असा बाह्यकारकांनी सुरुंग लावला आहे. तर पुरातत्त्व  विभाग हा सारा प्रकार संवेदनशीलता हरवून पाहत  आहे.
        
 गडावरील कातळ शिल्पे...
हरिश्चंद्र गडावरील सर्व भूरूपे म्हणजे निसर्गनिर्मित भव्य शिल्पेच आहेत. सामान्यभ्रंशामुळे तयार झालेला येथील रौद्र भीषण तरीही मोहक असणारा कोकणकडा, गडाच्या माथ्यावरील बालेकिल्ला, तारामती शिखराच्या पश्चिमेकडील उतारावर एकावर एक रचल्यासारख्या शिळा दिसतात. सकृतदर्शनी  ही कुणाची तरी रिकामपणाची कामगिरी वाटते. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. उन,वारा,पाऊस यासारख्या बाह्यकारकामुळे झालेल्या झीजेचा तो परिणाम असून, भौगोलिक भाषेत झाला " टॉर " असे म्हणतात.
       दख्खनचे पठार ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकापासून निर्माण झाले. लाव्हा रसापासून सह्याद्रीची पर्वताची निर्मिती झाली.  साडेतेरा कोटी वर्षांपूर्वी भूगर्भातून उफाळून  आलेला हा लाव्हा पृष्ठभागावर क्षितीज समांतर पसरून दख्खनच्या पठाराचा जन्म झाला, असे मानले जाते. उन, वारा, पाऊस यामुळे त्याची झिज होत राहिली आणि त्याला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. निसर्गनिर्मित अशी अनेक शिल्पे गडावर पाहायला मिळतात.
     सामान्यभ्रंशामुळे तयार झालेला येथील कोकणकडा वर्षानुवर्षे धाडसी गिर्यारोहकांना साद घालत आहे. भ्रंश रेषेच्या एका बाजूची ( पश्चिमेची) भूमी खाली सरकल्याने कड्यासारखा अत्यंत तीव्र उतार तयार झाला. सुमारे २००० फूट खोलीचा हा सरळसोट उतार हे तर कोकणकड्याचे रौद्र भीषण तरीही मोहक वाटणारे रूप. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत अनेक कोकणकडे आहेत. पण येथील अंतर्वक्र नालाकृती कोकणकड्याची सर कोणत्याच कड्याला येणार नाही. कितीतरी वेळ बघत बसले तरी मान तृप्त होत नाही. या कड्याचे सौंदर्य, मोहकता न्याहाळताना अनामिक भितीने अंगावर काटा येतो. तरीही भयमिश्रित कुतूहलाने येथे येणारा प्रत्येकजण त्याचे ते रौद्र रूप पुन्हा पुन्हा पाहतच बसतो. डोळ्यांत साठवण्याची धडपड करतो. येथील पावसाळ्यातील  धुक्याचा अनुभव तर केवळ स्वप्नवतच म्हणावा लागेल.  काळजात धडकी भरविणा-या या कड्यालाही काही धाडसी गिर्यारोहकांनी अनेकदा नमविले आहे. अरविंद बर्वे नामक मुंबईकर निसर्गवेड्या तरुणाने तर स्वतःला या कड्यावरून खाली झोकून देऊन आपली इहलोकी जीवनयात्रा संपविली. गडावरच्या पाण्याची व्यवस्था नष्ट करतानाच बालेकिल्ल्यालाही या गोष्टीची झळ बसली तशीच ती कोकणकड्यालाही बसली. मार्कीन्टोश नामक ब्रिटीश सेनाधिका-याने कड्यावरच्या खोबनीची पुरती नासधूस केली.
इंद्रवज्राचा देखावा

पावसाळ्यात क्षितिजालगत आकाशात दिसणारे अर्धवर्तुळाकार इंद्रधनू आपण कितीतरी वेळेस पाहिले असेल! पण हेच इंद्रधनू गोल वर्तुळाकार दिसले तर...! काय मज्जा येईल नाही? होय! हा अत्यंत दुर्मिळ योग पुन्हा एकदा  हरिश्चंद्रगडावर जुळून आला होता... संगमनेर येथील डॉ. नितीन बस्ते, तुषार शेवाळे आणि  इतर दुर्गयात्री हा निसर्गाचा अनुपम सोहळा 'याची देही याची डोळा' पाहून  पुरते हरखून गेले। होय, हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर पुन्हा एकदा दिसले होते अत्यंत देखणे आणि दुर्मिळ 'इंद्रवज्र' !

या  इंद्र्वज्राची आपल्याकडे म्हणजे सह्याद्री परिसरात  पहिल्यांदा अधिकृत नोंद केली ती कर्नल साईक्स या ब्रिटीश अधिकाऱ्याने। तीदेखील हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर! १८३५ साली! यावेळी घोड्यावरून रपेट मारीत सकाळच्या वेळेला कोकणकड्यावर गेलेल्या साईक्सला मोठे विलोभनीय दृश्य दिसले. मध्यभागी साईक्स आणि त्याचा घोडा, सोबतची माणसे यांच्या प्रतिमाच त्याला  समोरच्या गोलाकार ढगांमध्ये उमटलेल्या दिसल्या! सृष्टीची ही नवलाई पाहून सारेचजण चकित झाले, बुचकळ्यातही पडले.

नगर जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये ८९८व्या पानावर याची नोंद आपल्याला आढळून येते. गॅझेटकारांनी नोंदवलेय की, AcompanAccompanying the brilliant rainbow circle was the usual outer bow in fainter colours. The foking or Glory of  Buddha as seen from mount O in West Chaina tallies more exactly with the phenomenon than Colonel Sykes , description would seem to show.  या वर्तुळाची त्रिज्या ५० ते ६० फुट होती. इंद्र्वज्राचे वैशिष्ट्यच असे की, जो हे दृश्य पाहातो; तो स्वत:लाच त्यात पाहातो. पाहणा-याचे डोके बरोबर मध्यभागी दिसते. मधात अत्यंत कलरफुल आणि तेजस्वी दिसणारे हे वर्तुळाकार इंद्रधनूष्याचे तेजोवलय कडेला जाताना मात्र फिकट होत जाते.

इंद्रवज्र म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारिक आविष्कार! त्यासाठी भौगोलिक स्थितीही तशी असायला हवी. म्हणजे कशी? तर दिवस पावसाळ्याचे असावेत। वेळ सकाळची असावी. हलका पाऊस पडत असावा आणि गडाच्या पश्चिमेकडच्या त्या अक्राळविक्राळ कोकणकड्याकडून (पश्चिम दिशेकडून) दाट धुके असलेले ढग यायला हवेत. उगवत्या सूर्यनारायणाची कोवळी किरणे दरीतून वर झेपावणा-या ढगांवर पडली की, पाहणारांच्या सावल्या आणि त्याभोवती हे वर्तुळाकार इंद्रधनुष्य समोरच्या ढगांवर दिसू लागते. कड्याच्या दिशेने आपण तोंड करून उभे राहिलो की, निसर्गाचा हा अद्भुतरम्य आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. याच वेळी गडाच्या पाठारावर मात्र धुके नसेल पाहिजे. ते केवळ कड्यापर्यंत असावे. त्यामुळे अशी स्थिती जुळून येणे दुर्मिळ असते. आली तरी ते पाहायला मिळणे... हा सारा नशिबाचा, योगायोगाचा भाग. मुळात हे 'इंद्रवज्र' आपल्या देशात अत्यंत दुर्मिळ आहे. अनेक दुर्गयात्री त्यासाठी मोठी प्रतीक्षा करीत असतात. डॉ. बस्ते आणि तुषार शेवाळे यांना हे अद्भुतरम्य दृश्य पाहण्याचे भाग्य लाभले.

साईक्सनंतर इतक्या वर्षांनी २०११ मधल्या मे महिन्यात कोणी तरी हे इंद्रवज्र पाहिलेय आणि ते कॅमे-यात बंद केलेय... हे पाहताना ते निसर्गवेडे आनंदाने अक्षरशः नाचू लागले... ‘रानवाटा’चे स्वप्नील पवार आणि इतर दुर्गयात्री सोबत होते. एका भौगोलिक घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य त्यांना लाभले. असा हा इंद्रवज्राचा नजारा पाहण्यासाठी दर वर्षी निसर्गवेडे येथी कड्यावर डेरा टाकतात. पण ब-याचदा हे सारे काही जुळून येत नाही. मुळातच हरीश्चंद्रगड निसर्ग सौंदर्याने नटलेला. जैव-वैविध्याच्याबाबत तर देशभरातील उल्लेखनीय ठिकाणांपैकी एक असलेला. सह्याद्रीत अनेक कोकणकडे आहेत; परंतु इथल्या कड्याला तोड नाही, म्हणजे यासम हाच असा..! येथील निसर्ग सौंदर्याचा मानबिंदूच जणू...! येथे पुन्हा एकदा हरिश्चंद्रगडाने हा अलौकिक देखावा दाखवला आहे..!


बालेकिल्ला

          हरिश्चंद्रगडाच्या दक्षिण  माथ्यावर तोलारखिंडीतून वर चढून गेल्यावर डाव्या हाताला व्होल्कॅनिक प्लगसारखी [ म्हणजे भूगर्भातील लाव्हा बाहेर पडतो ते मुख] रचना दिसते. लाव्हा रस बाहेर पडण्याच्या क्रियेमुळे हा भूभाग बाजूच्या भूभागापेक्षा उंच होतो. तोच हरिश्चंद्राचा बालेकिल्ला होय. येथून कळसुबाई, रतनगड, आजोबा, घनचक्कर, भैरव, कुलंग,अलंग,मदन असा उत्तरेकडील तर माळशेज घाट, भैरव, नानाचा अंगठा. जीवधनपर्यंतचा दक्षिण पश्चिमेकडील मुलुख दृष्टीक्षेपात येतो. बालेकिल्ल्यावर जाण्यास खास असा रस्ता नाही. मस्त रान तुडवत रस्ता शोधत जाणे हाच एक मार्ग.
तारामतीच्या शिखरावरील  टॉर
       हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराच्या दक्षिणेकडील शिखर म्हणजे तारामती शिखर. या शिखराची समुद्र सापतीपासुंची उंची ४७७२ फुट इतकी आहे. या शिखराच्या दक्षिणेला तीव्र उताराचा कडा आहे. या शिखराच्या धारेवरून पश्चिम बाजूला एकमेकांवर मुद्दामहूनच रचून ठेवल्यासारख्या ब-याच शीळा पाहायला मिळतात. [म्हणजे गाडग्या - मडक्याच्या उतरंडी प्रमाणे ] प्रथमदर्शनी एखाद्या रिकामटेकड्या गुराख्याची ती कामगिरी असावी असे वाटते. मात्र वस्तुस्थिती तशी नसून ऊन, वारा आणि धो- धो कोसळणा-या पावसाच्या क्रियेमुळे यातील मृदू खडकाची प्रचंड झीज होऊन त्यांचे विदारण झाले आणि कठीण खडक एकमेकांवर रचून ठेवल्याप्रमाणे दिसू लागले. भौगोलिक भाषेत याला tor  असे म्हणतात. या माथ्याचे हे अत्यंत दुर्मिळ असे वैशिष्ट्य. येथेच विविधरंगी स्फटिके व खनिजेही आढळून येतात.
मात्र धोपट मार्ग सोडल्याखेरीज येथील भू-शिल्पे तुम्हाला दिसणार नाहीत. याच्या पश्चिमेला एकांटी मोठ्या दिमाखात उभे असलेले तुलनेने कमी उंचीचे शिखर म्हणजे रोहीदासाचे शिखर. तसा पुराणकाळातील हरिश्चंद्र राजा, तारामती व रोहिदास यांचा या शिखारांशी अर्थाअर्थी काही एक संबंध नसल्याचे अभ्यासक सांगतात.
रेड बोलची कपार
     पाचनई गावातून गडाची चढण चढताना अंगावर येणा-या उंच कड्याच्या अजस्र कपारीत खडकांचा दोन थरांच्या मध्ये लाल हिरवी राख सापडते. यालाच भौगोलिक भाषेत 'रेड बोल' म्हणतात. ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकामुळे भूपृष्ठाला तडे गेले. मोठमोठ्या भेगा पडल्या. भ्रंश झाले. त्यानंतर या दख्खनच्या पठारावर पर्वत, पठारे, टेकड्या तयार झाल्या. या नैसर्गिक घटना एवढ्यावरच थांबत नाहीत. सोसाट्याचा वारा, धो- धो कोसळणारा पाऊस त्यावर तुटून पडला. उन्हाचा आणि थंडीचाही त्यावर परीणाम होऊ लागला. त्यामुळे सतत क्षरण कार्य होताच राहिले. मुळचे  भू-आकार पुन्हा बदलू लागले. काही पर्वतांची उंची कमी होऊ लागली आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहांनी द-या खोल होत गेल्या. एकूण झीजेच्या ९०% झीज येथील पाऊसाने केली असून, त्यातूनच निसर्ग नावाच्या शिल्पकाराने असंख्य शिल्पे निर्माण केली.

गड परिसरातील जैवविविधता  

भौगोलिक व नैसर्गिक अनुकूलतेमुळे हरिश्चंद्र गडाच्या परिसरात जैविक विविधताही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. जैविक विविधतेच्या बाबतीत तर हरिश्चंद्राचे जंगल देशातील अतिशय समृद्ध ठिकाणांपैकी एक समजले जाते. असंख्य प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक व सरपटणारे प्राणी या सगळ्यांचेच येथे वैपुल्य आहे. याशिवाय गडावर स्वयंचलित वाहने जाण्याची सोय नसल्याने मानवी हस्तक्षेपापासूनही हा परिसर पुष्कळ सुरक्षित आहे.
           हरिश्चंद्र गडावरील वैशिष्ट्यपूर्ण चढ - उतार विस्तीर्ण पठार, जैवविविधतेसाठी पोषक तापमान भरपूर पर्जन्यमान व जमीन यामुळे हा प्रदेश अनेक दुर्मिळ वनस्पतींचे माहेर घर बनला आहे. गडाच्या माथ्यावर उत्तराभिमुख उतारावर अशा सदाहरित जंगलाचा हिरवाजर्द पट्टा दिसतो. आणि पठारावर असंख्य अल्पजीवी वनस्पती आढळतात. त्या पावसाळ्यात सजीव होतात. येथे सुमारे  ५००० मिलीमीटरच्या आसपास पाऊस कोसळतो. पावसाळा सुरु झाला की एरवी भकास वाटणारी येथील पठारे हिरव्या चैतन्याने बहरतात. राजतेरडे, रानतीळ, रानकांडे, रान लसूण, सोनकी, पालेचीराईत ,डायसोफिलीया, सायप्रस, शेराला अशा असंख्य अल्पजीवी वनस्पती सर्वत्र डोकाऊ लागतात. अवघ्या पंधरवड्यात त्यांना फुलेही येऊ लागतात. जांभळ्या, हिरव्या, पिवळ्या, तांबड्या, गुलाबी, अशा विविधरंगी रंगछटांनी सगळे पठार नटून जाते. जुलै ते ऑक्टोबर या काळात तर या पठारावर फुलोत्सव सुरु असतो.
           हरिशचंद्र गडाच्या परिसरात जांभूळ,  रामेठा, बामणी, दिंडा, सुरुंगी, फापती, करवंद आंबा, पळस, फणस, शाल्मली, हिरडा, पळसवेल, पांढरी, आदि वृक्ष आढळतात. वृक्षांची उंची कमी असते. सरळ उंच फांद्यांऐवजी वाकड्या तिकड्या आणि एकमेकांमध्ये गेलेल्या असतात. घनदाट वृक्षांवर चढलेल्या राक्षसी वेली आणि खाली दाट उंच गवत, हे येथील जंगलाचे ठळक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. इमारतीसाठी किंवा फर्निचरसाठी या लाकडांचा उपयोग नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या उपयुक्त नसल्याने जंगल तोडीचे प्रमाण फारच कमी आहे. मात्र जैविकदृष्ट्या या वनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
         सह्याद्रीच्या माथ्यावर १००० ते १२०० मीटर उंचीवर कारवी ही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आढळते. हरिश्चंद्र गडाच्या चहू बाजूंनी तिचे विपुल अस्तित्व आहे. दर सात वर्षांनी जांभळ्या रंगाच्या फुलांनी बहरणारी ही वनस्पती फुललेल्या काळात पाहणे, ही अपूर्व आनंद देणारी घटना असते. डोंगर उतारावरील मातीचे संधारण करण्याचे अतिशय महत्वपूर्ण काम या कारवीने केले आहे. याशिवाय तीव्र चढणीच्या अवघड पायवाटेने चढत असताना गिरीभ्रमण करणा-यांनाही कारवीचा मोठा आधार असतोच. अन्यथा डोंगर उतारावरील खोल दरीकडे पाहून अनेकांचे डोळे गरगरल्याशिवाय राहिले नसते. कोणत्याही रस्त्याने गडावर जाताना कारवीची भेट होतेच. सात वर्षांनी एकदा फुलते. फुले येऊन गेल्यावर कारवी मरते. पुढील वर्षी नव्या करावीच जन्म होतो. मात्र सात वर्षातून एकदा येणारा कारवीचा फुलोत्सव  निसर्गप्रेमींनी आवश्य पाहावा.
           या जंगलांनी अनेक जाती - प्रजातींना आश्रय दिला आहे. महाजैविक विविधता लाभलेल्या सह्याद्रीच्या पट्टयात ज्या थोड्या ठिकाणी सदाहरित जंगले टिकून राहिली आहेत. त्यापैकी हरिश्चंद्रगड हे खूपच आदर्श ठिकाण असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. तारामती शिखराच्या उत्तर उतारावरील विस्तीर्ण पठारावर मोठी झाडी, झुडपे कमी असली तरी असंख्य अल्पजीवी वनस्पतींचे वसतीस्थान तेथे असते अनेक अभ्यासकांनी याविषयीचा अभ्यास आणि सर्वेक्षण केले आहे. एरवी उन्हाळ्यात वाळलेल्या गावतामुळे आणि दिवसादेखील तालात गाणा-या रातकिड्यांच्या आवाजाने भकास वाटणारे हे निर्जन पठार पावसाळ्यात मात्र चैतन्याने न्हावून निघते. पिवळी सोनकी फुलल्यावर तर सारे पठार पीतवर्णी शालू पांघरते. कळलावी, चित्रक, देवनाळ, शतावरी, पांढरी यांसारख्या दुर्मिळ औषधी वनस्पतींचा येथे आढळ आहे.
        हरिश्चंद्रगडाचा परिसर कळसुबाई अभयारण्यात कोल्हे, रानडुकरे, तरस, भेकर, खेकड, ससे, बिबटे, रानमांजर, साळींदर, व भीमाशंकर अभयारण्य ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते शेकरू या परिसरात मुबलक प्रमाणात आढळते. मात्र अलीकडच्या काळात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
       गरुड ससाणे, खंड्या, बुलबुल, पर्वत कस्तूर, सुतार, मोर, तित्तर, पारव, घार, सुभग या पक्ष्याचाही येथील परिसरात वावर असतो. सरपटणा-या प्राण्यांमध्ये नाग, फुरसे, घोणस, मण्यार या जातीचे अतिशय विषारी साप या भागात आढळतात. याशिवाय इतर विषारी- बिनविषारी सापांचेही वास्तव्य असतेच.
        अवाजवी मानवी हस्तक्षेपापासून सुरक्षित अंतरावर असल्याने हा परिसर आपली जैविक विविधता व विपुलता ब-यापैकी टिकवून आहे. मात्र काही हौशी पर्यटकांच्या, गिर्यारोहकांच्या बेजबाबदार व चंगळवादी प्रवृत्तीमुळे होणारी हानी टाळण्याच्या दृष्टीने निसर्गाचा हा अमुल्य ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने  प्रयत्न करण्याची आवश्यकता  आहे.

गडावर पर्यटकांची वर्दळ दिवसेंदिवस वाढतच आहे. ३१ डिसेंबर ला तर येथे जत्रेचे स्वरूप येत आहे. येथील नितांत सुंदर निसर्ग निवांतपणा पर्यटकांना खुणावतो भावतो हे खरच परंतु येथील इतिहास भूगोल तसेच अध्यात्मिक सांस्कृतिक वारसा याबाबत यातील बहुतांश जण अनभिज्ञच दिसून येतात आजवर हरिश्चंद्रगड व परिसरावर प्रकाशझोत टाकणारे विविधरंगी संशोधन झालेले असले ते अपूर्णच वाटते. येथील प्राणी सृष्टी व भूगर्भाशास्त्राबाबतच्या संशोधनास पुरेसा वाव आहे.
     येथील शिलालेखांकडे सर्वप्रथम विदेशी संशोधकांनी लक्ष वेधले. याचा उल्लेख १८८४ च्या नगर जिल्ह्याच्या ग्याझेटीअरमध्ये आढळतो. त्यात जेम्स फर्ग्युसन जेम्स बर्जेस सिंक्लेअर यांचा समावेश होता. प्रत्यक्ष शिलालेख वाचण्याचे काम वि. भि. कोलते रा. चि. ढेरे या देशी संशोधकांनी केले. याशिवाय म.रा. जोशी, आनंद पाळंदे, गो,नी,दांडेकर, राजेश्वर गोस्वामी, मिलिंद बोकील आदींनी या दूरस्थ गडाला भेट देऊन इतिहास भाषा व आध्यात्मिकदृष्ट्या अभ्यासात भर घालण्याचे काम केले. या खेरीज यात्रा पर्वात ज्ञानदेवादी भांदेदेखील येथे येऊन गेल्याचा उल्लेख एका लेखात आढळतो. तसे असेल तर गोनीदांच्या भाषेत तो लेख सुवर्णाक्षरांनीच माद्विण्यात यावा अशी त्यांची अपेक्षा आहे.
      तत्कालीन ब्रिटीश अधिकाऱ्यांचेही हा गड आकर्षण बिंदू ठरल्याचे उपलब्ध कागदपत्रे व नोंदीवरून दिसून येते साईक्सं नावाच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याने तर येथे बांधकामही केले होते. आजही त्याचे अवशेष येथे पाहायला मिळते. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या चरीत्रातही ते ठाण्याचे उपजिल्हाधिकारी असताना (सन १९२९) येथे आल्याचा उल्लेख आढळतो. गडावरच त्यांना थडी वाजून आल्याने ढोली करून त्यांना खाली नेण्यात आल्याचा मजकूर चरित्रात आहे.
      सुमारे ८०० ते १००० वर्षापूर्वीच्या शिलालेखांवरून योगी चांगदेवांचे वास्तव्य येथे होतेच याखेरीज कितीतरी योगी सिद्धसाधक येथे येऊन गेल्याचे उल्लेख आढळतात. शैव, वैष्णव तसेच शाक्त संप्रदायाचे अवशेषही येथे सापडतात.
     येथील वनस्पती सृष्टीचे संशोधन ब्रिटीश काळापासून सुरसु झाले आहे. १९०८ सालात तत्कालीन मुंबई इलाख्याचे (बॉम्बे प्रेसिडेन्सी ) वान्स्प्तीशास्रज्ञ डॉ. कुक यांनी येथील झाड - झाडोऱ्याचा अभ्यास केला. १९६९ मध्ये पुणे येथील वनस्पती संरक्षणालयातील डॉ.बिलोरी व डॉ. हेमाद्री या दुकलीन येथील ३३० जातींच्या वनस्पतींची नोंद्केली आहे. याच विभागातील डॉ. सिंग व डॉ. प्रधान यांनी १९९० मध्ये गडाला भेट देऊन अभ्यास केला. तर अलीकडच्या काळात संगमनेर येथील संशोधक प्रा. डॉ. मोहन वामन यांनी येथील वनस्पती सृष्टीचा तपशीलवार अभ्यास केला असून येथील वनस्पतीसृष्टीचे आजवरचे हे सर्वात महत्वाचे संशोधन मानले जाते. वैशिष्ट्यांनुसार विश्लेषण करणाऱ्या डॉ. वामन यांनी ६२९ वनस्पतींची नोंद केली आहे. यात देशभरातूनच नामशेष होण्याच्या मार्गावरील ८० औषधी वनस्पतींचे अस्तित्व त्यांनी शोधून काढले आहे. तर १६ प्रकारच्या ऑर्कीड जातीच्या वनस्पती त्यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत.
      भीमाशंकर अभयारण्य ज्या शेकरू जातीच्या खारीसाठी देशभर प्रसिद्ध आहे. ती शेकरू येथील तोलार खिंड परिसरात बऱ्यापैकी संखेने दिसून येते. इतरही विविध प्राण्यांचे वसतीस्थान येथे आहे. असे असले तरी येथील प्राणीसृष्टीवर मात्र हवा तेवढा अभ्यास झालेला दिसत नाही. याचप्रमाणे येथील भूगर्भ शास्राच्या अभ्यासालादेखील बराच वाव असल्याचे दिसून येते. येथील निरनिराळ्या रंगांचे खडक संशोधकांना का खुणावत नाहीत असाही प्रश्न वाटेवरून जाताना पडल्याखेरीज राहत नाही. 
       गडाच्या पायथ्याशी असलेल्या कोथळे, पाचनई, लव्हाळी, कुमशेत, खिरेश्वर येथील आदिवासींचे गडाशी भावनिक नाते जुळलेले आहे. मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने हे लोक दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी गडावर जाऊन हरिश्चंद्रेश्वराला अभिषेक घालतात. अर्थातच गडाच्या इतर वैशिष्ट्यानबाबत. हे अनभिज्ञच असावेत.
       मानवी हस्तक्षेपापासून पुष्कळ दूर असल्याने शेकडो वर्षापूर्वी जसा होता तसाच हरिश्चंद्रगड आजही आहे. बह्याकारकांच्या आक्रमणाला तोंड देत आजही तो ताठ मानेने उभा आहे. त्याला यापुढेही तसेच राहू द्यावे .........हीच अनेकांची अपेक्षा आहे.

भाऊसाहेब चासकर,
अकोले

Tuesday, March 17, 2020

साडेचार हजार फूट उंचीच्या पर्वतराजीच्या खोबणीत वसलेला जलाशय म्हणजेच विल्सन डॅम(भंडारदरा )

अकोले, ता . १७:पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या रंग म्हणजे च बालाघाट या पर्वतरांगांमधून सरासरी साडेचार हजार फूट उंचीच्या पर्वतराजीच्या खोबणीत वसलेला जलाशय म्हणजेच विल्सन डॅम(भंडारदरा )सरता ग्रीष्म आणि वर्ष ऋतूच्या आगमनाअगोदरच्या संधिऋतूत या परिसरातील सादडाची झाडे प्रकाशमान होतात काजव्यांचे पुंजके या झाडावर वास्तव्याला असतात अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा हे धारण नगरपासून १७५  किलोमीटर अंतरावर आहे नाशिक पुणे -ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांना वीकएंडला  एकदिवशीय पर्यटनासाठी हे उत्तम ठिकाण 
भंडारदराच्या परिक्रमेला धरणाच्या उजव्या बाजूच्या रस्त्याने सुरुवात करता येते . रतनगड डोंगरमाथ्यावरील एका गुहेत प्रवरा नदीचा उगम आहे याच नदीवर खाली भंडारदरा जलाशय बांधले आहे . धरणापासून साधारण १२ किलोमीटर आत गेल्यावर पांजरे नावाचे छोटेखानी गाव इथून कळसुबाई शिखराच्या डोंगराचे दर्शन घडते पांजरेवरून उद्धवने व पुढे घाटघरला जाता  येते पांजरे घाटघर हि गावे महाराष्ट्रातील चेरापुंजी मानली जातात घाटघरच्या घटनदेवी मंदिर परिसरातून दिसणारा सूर्यास्तही अत्यन्त रमणीय असतो . तर घाटघर येथे जलविधुत प्रकल्प हि उभारण्यात आला आहे .स्थान :घाटघर धरण.
सरासरी वार्षिक पाऊस : ५००० मी.मी. पेक्षा अधिक .
महत्तम उत्पादनक्षमता : २५० मेगावॅट.
१२५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प असलेले घाटघर धरणही अकोले तालुक्यात आहे. भंडारदरा धरणाच्या पश्चिमेला २२ कि.मी.अंतरावर असलेले हे ठिकाण पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या ठिकाणी नगर जिल्ह्यांची हद्द संपते. घाटघरचा कोकणकडा पाहण्यासारखा आहे. ४५० मीटर खोलीची दरी व त्याच दरीतून एकटीच वाहणारी शाई नदी. भन्नाट रानवारा, जोराचा पाऊस, दाट धुके आणि त्या दाट धुक्याचा पदर बाजूला सरला कि कोकणच्या सृष्टी सौंदर्याचे मनोहारी रूप पहावयास मिळते. हिरवळीत आच्छादलेले डोंगर, उंचच उंच सरळ उभा कोकणकडा, दूरवर दिसणारा शहापूर तालुक्याचा भूभाग, कड्याला लागूनच असलेला जलविद्युत प्रकल्प, आगपेटीच्या आकाराच्या दिसणा-या गाड्या सारेच मनोहारी, विलोभनिय. घाटघर या ठिकाणी पावसाळ्यात ५००० मी.मी. पेक्षा अधिक पाऊस पडतो.
कोकणकड्याच्या खोलीचा वापर करून येथे घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प जपानच्या जे.बी.आय.सी. या वित्त संस्थेच्या आर्थिक मदतीने साकारण्यात आला आहे. २५० मेगावॅटचा वीजनिर्मिती प्रकल्प हा ‘पंप स्टोरेज’ प्रकारचा आशिया खंडातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. घाटघर येथे बांधण्यात येत आलेल्या ऊर्ध्व धरणातील पाणी डोंगरात खोदलेल्या बोगद्यातून जलविद्युत प्रकल्पात सोडले जाते. या पाण्याच्या आधारे अवाढव्य टर्बाइन फिरून वीज निर्मिती होते व पाणी बोगद्याच्या खालील बाजूला निम्न धरणात सोडले जाते. रात्री ११ नंतर सुमारे ७ तास विजेचा वापर करून चोंडे येथील निम्न जलाशयातील पाणी घाटघर येथील ऊर्ध्व जलाशयात खेचून घेतले जाते. आणि सकाळी व संध्याकाळी विजेच्या कमाल मागणीच्या काळात वीज निर्मिती करण्यात येते. 
धरणनिर्मितीच्या निमित्ताने  ब्रिटिश अधिकाऱ्यांनी येथे वास्तव्य केल्याचा आजही खुणा आहेत त्यामुळं इथल्या बऱ्याच ठिकाणांना इंग्रजी नवे दिल्याचे दिसून येते बालाघाट डोंगररांगात कोकणकड्यच्या बाजूला रतनगड हा देखणा दुर्ग आहे . तर रतनगडाच्या डोंगर माथ्यावरील एका गुहेत प्रवरा नदीचे उगम आहे तिला अमृतवाहिनी म्हणतात याच नदीवर खाली ब्रिटिश कालीन  भंडारदरा धरण बांधण्यात आले आहे त्याने शम्भरी गाठली आहे. भंडारदरा धारण भरले कि अतिरिक्त पाण्याचा विसर्ग धरणाच्या भिंतीलगतच्या अर्धगोलाकार खडकावरून सोडला जातो . फेसाळणार्या  या धवलधारा छत्रीसारखा आकार धारण करून वाहायला लागतात म्हणूनच त्याचे नाव अम्ब्रेला फॉल आहे हिंदी , मराठी , इंग्रजी चित्रपटात या फोलच उपयोग करण्यात आला आहे . राजकपूरच्या राम  'तेरी गंगा मैलीचे सर्व चित्रीकरण इथेच करण्यात आले होते दर वर्षी साधारण १५ ऑगष्ट नंतर अम्ब्रेला फॉल काही महिने पाहता येतो . रतनगड डोंगराच्या पायथ्याशी पुरातन काली अमृतेश्वर शिवालय आहे धारण पूर्ण भरल्यानंतर मंदिराचा गाभारा पूर्ण पाण्यात असतो  हे हेमाडपंथी मंदिर पांडवांनी बांधल्याची वंदता आहे . २४ कि.मी.
रंधा धबधबा
भंडारदरा धरणाच्या पुढे पूर्वेला १० किलोमीटर अंतरावर रंधा फोल या मोठ्या धबधब्याचे दर्शन घडायचे मात्र आता कोडणी ३४ मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प झाल्यामुळे तो धबधबा लुप्त झाला आहे  अकोल्यापासून चे अंतर :
भंडारद-यापासून उत्तरेस १० कि.मी.अंतरावर प्रवरा नदी ५० मीटर खोल दरीत झेपावते. त्या ठिकाणास रंधा धबधबा असे म्हणतात. येथे घोरपडा देवीचे मंदिर आहे. रंधा धबधबा म्हणजे सळसळत्या तारुण्याचा आविष्कारच. रतनगडाच्या कुशीत जन्म घेतलेली प्रवरा नदी डोंगर रांगातून स्वच्छंद वळणे घेत २०कि.मी.च्या प्रवासानंतर अचानक 5० मीटर खोल दरीत झेपावते. त्यावेळी त्या ठिकाणी पाण्याचा हा रौद्र मंगल कल्लोळ, पाण्याचा तो शुभ्र धवल झोत, तुषारांचे वैभव अन त्या तुषारांवर उमटलेले इंद्रधनू, तेथील निरव शांततेला भेदणारा प्रपाताचा आवाज या सर्वांच्या संगमातून वेगळेच संगीतमय वातावरण निर्माण होते.
पावसाळ्यात तर रंधा धबधबा आणखीनच रौद्र रूप धारण करतो. पण त्याचवेळी त्याठिकाणी धोकादायक परिस्थिती पण निर्माण झालेली असते. पावसाळ्यात रंधा धबधब्याला लागुनच दुस-या बाजूला कातळापूरचा धबधबा पण प्रेक्षणीय असतो. बॉलीवूड मधील अनेक चित्रपट दिग्दर्शकही रंधा धबधब्याच्या प्रेमात पडले. त्यामुळे ‘मैने प्यार किया’, ‘प्रेम’, ‘कुर्बान’, ‘राजू चाचा’ इतर अनेक गाजलेल्या चित्रपटांतील थरारक दृश्ये येथे चित्रित झालेली आहेत. भंडारदरा परिसरात निवांत भटकंती कार्याची म्हटले कि , पाच सहा दिवसाचा अवधी लागतो पर्वतरांगेतील अलन्ग , कुलंग , मदन गडासह हरीशचंद्रगड,विश्रामगड , व गडकोटांबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण गावही या पर्वताच्या कुशीत वसलेली आहेत उदाहरणच द्यायचे झाले तर फोफसंडी हे गाव चारही बाजूने उंच पर्वतांनी वेढलेल्या या गावात सूर्योदय इतर ठिकांपेक्षा तीन चार तास उशिरा होतो आणि सूर्यास्तही तीन चार तास लवकर होतो थोडक्यात इथला दिवस अवघ्या सहा आठ तासाचा असतो अकोले तालुक्यातून कोतुळ , पळसुंदे (भैरोबा )मार्ग अंबितखिंड एकूण २५ किलोमीटर प्रवासानंतर फोफसंडी गावात पोहचता येते फोफसंडीतून थेट माळशेज घाटात पोहचण्यासाठी आता रास्ता झाला आहे . जालना शहर लुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर विश्रांती घेतली तो विश्रामगड अकोले , समशेरपूर , खिरविरे फाटामार्गे विश्रामगडावर जात येते तिरढे पाचपट पठारावरील पावन ऊर्जा प्रकल्प पाहण्यासारखा आहे डोंगरपठारावर शेकडो पंखे भिरभिरतनाचे दृश्य विलोभनीय असते या व्यतिरिक्त राजूर शिरपुंजे मार्गे कुमशेत सारख्या  भागाला भेट देणे  शक्य आहे . तातोबा डोंगर हा अकोले तालुक्यातील सर्वांचे श्रध्दास्थान आहे. वाल्मीक ऋषींच्या वास्तव्याने हा भाग पावन झाला आहे. धार्मिक व पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या अशा या स्थळाचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगाने विकास येथे झाला आहे. अगदी शांत निसर्गरम्य ठिकाण म्हणुन प्रसिद्ध आहे.  नदीचा किनारा शांत जागा असल्याने  येथे सर्वात जास्त पक्षांचे आवाज ऐकायला भेटतात. पक्षीप्रेमींना खास वेगवेगळ्याप्रकारचे पक्षी पाहण्यासाठीच मी आमंत्रित करतो आहे तर मग कधी येताय तातोबाला आश्रमाला भेट द्यायला तर लोध (कोथळा) (lodh ) हे एका झाडचे नाव असून कोथळे या जंगलात सर्वात मोठे झाड आहे.कळसुबाई कुलन्गगड रतनगड आजोबाचा डोंगर या सर्व शिखरातील शेवटचे शिखर म्हणजे हरीशचंद्रगड अत्यन्त अवघड चढणीचे हे शिखर ठाणे पुणे नगर जिल्ह्यातून या गडाकडे जात येते हरीशचंद्रगडच्या लगत असलेल्यातारामती ,रोहिदास हि शिखरे पाह्यला मिळतात वन्यजीव दर्शनही अनुभवता येते निबिड जंगल उंच डोंगर खोल दऱ्या मुळा नदीचे पात्र अशा व वैशिष्ट्यपूर्ण  स्थितीत पर्यटनाची मजाच न्यारी उंबर , जांभूळ ,कारवी पांगारा ,मोहाची झंझाडे अशा वृक्ष वल्ली तर कोल्हा साळुंदी बिबट्या रानडुक्कर विविध प्रकारचे साप  सरडे असे वनचर आणि सातभाई भारद्वाज बुलबुल कोकीळ खान्द्या वेद रघु आदी पक्षीही पर्यटकांच्या नजरेस पडतात हिवाळ्यात या परिसराचे रुपडे अवर्णनीय असते अनेक प्रकारच्या रानफुलांच्या साड्यांची इथली डोंगरपायथे सजतात सह्यपर्वतच्या भंडारदरा परिसरातील मुक्कामासाठी आता निवासी व्यवस्थाही चांगल्या आहेत उन्हाळ्यात गिरिभ्रमण उन्हाळा पावसाळ्यात संधिऋतूत काजवा महोत्सव पावसाळी प्रयत्न आणि हिवाळ्यात पुष्पोत्सव असे ववर्षभर प्रयत्न करण्यासारखा हा परिसर कधी काली दुर्गम असलेल्या या परिसरातील जवळपास सर्वच गवे आता डांबरी रस्त्याने जोडली असल्याने पर्यटकांना इथल्या अनवट वाटा  साराच्या वाट सर्वच्या व्हाल लागल्या आहेत . इतर पर्यटन साठी बाजार पेठांमुळे आलेला बकालपण इथे नाही स्वच्छ पर्यटनामुळे  त्च्छड नेचर इथे अनुभवता येते अर्थात इथले पर्यवर्ण स्वछता या बाबी जप












सफर कलाडगड, कुंजरगड, भैरवगड आणि पाबरगडाची

सफर कलाडगड, कुंजरगड, भैरवगड आणि पाबरगडाची

Primary tabs

बज्जु's picture
बज्जु in कलादालन
19 Oct 2010 - 5:09 pm
श्रावण आणि भाद्रपदातील पुजांच्या धावपळीमुळे ऒगस्ट आणि सप्टेंबरमध्ये म्हणजे जवळ्जवळ दोन-अडीच महिने ट्रेक झाला न्हवता. पित्रुपक्षात पंधरा दिवस आराम असल्याने आणि गिरीषला २ ऒक्टोबरला गांधीजयंतीची सुट्टी रविवारला जोडुन आल्याने लगेच कलाड्गड, कुंजरगड, भैरवगड, पाबरगड असा ट्रेक ठरवुन टाकला. ट्रेकला मेंबर दोनच मी आणि गिरीष साठे. दोघेच जण असल्याने अर्थातच बाईकने जायचे ठरले. २ तारखेला पहाटे लवकर निघायचे असल्याने १ ऒक्टोबरला संध्याकाळीच गाडीत पेट्रोल भरुन ठेवले आणि थोडेसे ड्रायफ़ुड घेऊन ठेवले होते. सॆका रात्रीच भरल्या. आधी कुंजरगड करुन नंतर पाचनईच्या जवळच असलेला कलाड्गड करु जमलं तर त्याच दिवशी भैरवगडाच्या गुहेत जाऊन झोपु आणि दुस-या दिवशी थोडं आरामात पाबरगडकरुन संध्याकाळपर्यंत घरी असा भारी प्लान ठरला (आमच्या नाक्याच्या भाषेत फ़रफ़ट किंवा वेड.... प्लान).
२ तारखेला पहाटे ५.३० ला निघालो, गिरीष गाडी चालवत होता, ७.०० ला मुरबाडजवळ एका टपरीवर चहा प्यायला थांबलो. पुढे टोकावड्याला पुन्हा चहाज, वडा-ऊसळ्स, भजीज वगैरे खायला थांबलो. आता मी गाडी चालवायला घेतली. माळ्शेजघाट पार करुन ओतुरला आलो तेव्हा साधारण १०.०० वाजत आले होते. आमच्या अंदाजानुसार ५.३० ला निघुन साधारण १०.००-१०.३० पर्यंत कुंजरगडाच्या पायथ्याशी पोहोचायला हवे होते पण १०.०० वाजले तरी आम्ही ओतुरलाच होतो. इथपासनच आमचं शेड्युल चुकायला लागलं. पुढे ओतुर संगमनेर रस्त्यावर असलेल्या बोटा फ़ाट्याला आलो आता गिरीष गाडी चालवत होता. बोटा फ़ाट्याला कुंजरगडाच्या पायथ्याशी असलेल्या विहीर गावचा रस्ता विचारुन घेतला. पत्ता सांगणा-याने कुठुन आलात विचारलं. ईथंपर्यंत ठिक होत पुढे त्यानी आमची नाव आड्नाव पण विचारली हे जरा चमत्कारीकच वाट्ले. पण पत्ता सांगणा-या माणसाची काहीतरी गडबड झाली असावी कारण त्या रस्त्याने साधारण १५-२० मिनिटे गेल्यावर हा रस्ता विहीर गावात जात नसुन विरगावात जातो असा साक्षात्कार आम्हाला झाला. पुन्हा बाईकचे तोंड वळवले पुन्हा बोटा फ़ाट्याला आलो आणि आता मात्र खरोखरच्या विहीर गावाच्या रस्त्याला लागलो. पण या गडबडीत पाऊण तास फ़ुकट गेला. आता अकरा वाजत आले होते. बोटा फ़ाट्यापासुन विहीर गाव जवळजवळ एक तास.
विहीर गावातुन कुंजरगड
साधारण १२.०० च्या सुमारास विहीर गावात आलो. एका घरापाशी बाईक लावली. त्या घरातल्या लोकांनी एकदम आमच स्वागतच केलं. कुठुन आलात काय नाव आड्नाव वगैरे चौकशी केली (च्यायला ईथल्या लोकांना आपली आडनाव काय करायची पुन्हा चमत्कारीक वाटले). त्यात आम्ही दोघेही जानवेधारी आहोत आणि मी तर गुरुजीगीरी करतो कळल्यावर त्यांनी आम्हाला जेवायचा आग्रह केला. अहो आमच्या घरात आज पितरांचे श्राध्द आहे आणि त्या निमित्ताने "दोन बामण जेवले तर आमाला पुण्य मिळेल" वगैरे वगैरे कॆसेट. ईथे हसावे का रडावे अशी आमची अवस्था झाली कारण आम्ही ऒलरेडी शेड्युलच्या दोन तास लेट होतो. शेवटी एका पिशवीत जेवण पार्सल घेऊन ते कुंजरगडावर जाऊन खाणे असा एक सर्वमान्य तोडगा निघाला. त्या मामाने माझा मोबाईल नंबरसुध्दा घेतला (पुन्हा चमत्कारीक). मला वाटलं एखाद्या सत्यनारायण पुजेसाठी बोलावतात कि काय आता. असो शेवटी साधारण १२.३० च्या रणरणत्या ऊन्हात आम्ही कुंजरगडाच्या वाटेला लागलो.
गावातन बाहेर पडताच १०.-१५ मिनीटात एक छोट देऊळ लागलं, या देवळाच्या मागुनच रस्ता जातो.
मुक्ताई माता मंदिर - विहीर गाव - कुंजरगड
वाटेत कुठे-कुठे पिवळ्या फ़ुलांचे गालीचे होते तर कुठे हिरवीगार भाताची शेत डोलत होती. क्लीकत क्लीकत चाललो होतो.
हिरवी शेते
पहील्या टेकाडावरुन - विहीर गाव
नेहमीप्रमाणे माननीय श्री. आनंद पाळंदे यांचे "डोंगरयात्रा" पुस्तक बरोबर होतेच. त्यात म्ह्टल्याप्रमाणे विहीर गावातुन कुंजरगडावर दिड तासात पोहोचता येते. पण प्रत्यक्षात आम्हाला पावणे तीन तास लागले. मी म्ह्टलं त्यांनी कुंजरगडावरुन विहीर गावात ऊतरायला दिड तास म्ह्ट्लं असेल आपल्याला चढुन जायचं असल्याने थोडा जास्त वेळ लागला. पण तरीही एवढा फ़रक पडत नाही कधी आनंद पाळंदे यांनी दिलेल्या वेळेमध्ये आणि आपल्या वेळेमध्ये. काहीही असो पण पुन्हा एकदा वेळेचा अंदाज चुकला होता एवढ मात्र खरं.
दुस-या टेकाडावर
दुस-या टेकाडावरुन विहीर गाव
वाटेतील हनुमान मंदिर
दाट झाडीतुन जाणारी वाट
साधारण ३.०० च्या सुमारास कुंजरगडाच्या माथ्यावर पोहोचलो. माथ्यावर विशेष काहीही नाही. पुस्तकात म्हट्लं आहे "माथ्याच्या डावीकडे गेल्यावर एकमेव टाके आहे" पण प्रत्यक्षात आम्हाला तीन टाकी दिसली ("डोंगरयात्रा"चा आणखी एक धक्का) असो.
कणीस ?
कणसाचे दाणे (झुम)
गवत
शेवट्चा चढ
कुंजरगड टॉप
"गडाच्या उत्तर टोकाजवळ एक खोदीव बोगदा आहे, यातुन रांगत आत गेल्यावर कड्यावर उघडणारे दुसरे तोंड आढळते" (इती "डोंगरयात्रा"). जाऊन पाहिले खरच एक खोदीव बोगदा आहे पण रांगत जाणे कठीण वाट्ले शिवाय आतमध्ये पाणी साठ्ले होते आणि पुढे वाकुन पाहिले तर बुजवल्यासारखे वाटले त्यामुळे रांगत जाऊन कड्यावर उघडणारे दुसरे तोंड बघायचा मोह आम्ही आवरला.
बोगदा
मी आणि गिरीष
तिथेच एका टाक्यापाशी खाऊन घेतलं टाक्यातल गार पाणी पिऊन त्रुप्त झालो आणि निघालो. ऊतरत असताना वाटेत पुन्हा त्या मामाचा फ़ोन आला बराच वेळ झाला कुठे आहात? म्हटलं येतोच अर्ध्या तासात. साधारण साडेपाच वाजता पुन्हा विहीर गावात आलो. येतानाच आज आपला कलाडगड काही होणार नाही तेव्हा ऊद्या तीन गड करण्यापेक्षा कलाडगड ड्रॊप करुन आज भैरवगडावर जाऊन राहु असं ठरलं.
मामाकडे चहा घेतला. भैरवगडाच्या पायथ्याशी असणा-या शिरपुंजे गावचा रस्ता विचारुन घेतला. मामाच्या म्हणण्याप्रमाणे शिरपुंजे गाव २०-२५ कि.मी. म्हणजे अगदी खराब रस्ता धरला तरी एक तास. म्ह्टलं ६.३० पर्यंत पोहोचू पण कसलं काय विहीर गावातुन राजुरला यायलाच पाऊण तास गेला. त्यात गाडीच्या पेट्रोलच्या ईंडीकेटरचा काटा एकदम रिझर्वच्या खाली गेला. शिरपुंजे गाव पुढे वीस कि.मी. होतच. म्ह्ट्ल पेट्रोलच लफ़ड व्हायला नको म्हणुन राजुरला पेट्रोल भरायला गेलो तर ४५० च पेट्रोल भरुन होतय तर टाकी ओव्हरफ़्लो. म्हणजे पेट्रोलच्या काट्यात काहीतरी गडबड झाली होती (नवा साक्षात्कार). राजुरला चहा-वडापाव खाऊन शिरपुंजे गावात पोहोचायला ८.०० वाजले. गावातल्या लोकांनी आता ईतक्या ऊशिरा तुम्हाला गडावर घेऊन जायला कोणी माणुस मिळणार नाही तेव्हा जवळच एक आश्रमशाळा आहे तिथे तुमची झोपायची सोय होईल तिथे जा मग सकाळीच ऊठुन गडावर जा म्हणुन सांगितले. आम्हीसुध्दा मग जास्त अघोरीपणा न करता आश्रमशाळेत गेलो कारण नाही म्हट्ल तरी सकाळपासुन जवळ जवळ ९-१० तास बाईक चालवुन आणि कुंजरगड सर करुन तंगड्या गळ्यात यायला लागल्या होत्या.
आश्रमशाळेत मात्र आमची खरोखरच चांगली सोय झाली. आश्रमशाळेतील प्रबंधक आणि हेडमास्तर यांनी हसतमुखाने आमचे स्वागत केलं आणि तुमची झोपायची सोय होईल म्हणुन सांगितलं. कधी नव्हे ते ट्रेकला गादी-ऊशी मिळाली हो झोपायला.
पहाटे ६.३० ला ऊठलो, आश्रमशाळेतील प्रबंधकांनी आमच्यासाठी चहा करुन ठेवला होता. चहा पिऊन, आवरुन ७.०० वा. निघालो.
शिरपुंजे आश्रमशाळा
भैरवगड
भैरवगडावरील मंदिर
आश्रमशाळेतील ५-६ मुलं देखील आमच्या बरोबर यायला तयार झाली, त्यामुळे वाट शोधायचा प्रश्ण नव्हता.
खेकडा
भैरवच्या वाटेवर
१ तासात भैरवगडाच्या माथ्यावर पोहोचलो. वाटेत काही ठिकाणी खडकात खोदलेल्या पाय-य़ा आहेत.
पाण्याची टाकी
माझ्या हातातील कॉमेरा पहाताच याने अशी छान पोझ दिली.
त्यावरुन येत असताना ठिकठिकाणी दुर्वांच्या जुड्या पडलेल्या दिसल्या. माथ्यावर एका कड्याच्या टोकावर भैरवनाथांची गुहा आहे. त्यात भैरवनाथांचा अश्वारुढ पुतळा आहे.
कड्याच्या टोकावरील भैरवनाथांचे मंदिर
कड्यावरुन दिसणारी आश्रमशाळा
भैरवनाथांचा अश्वारुढ पुतळा
दर्शन घेऊन बाहेर आलो तर एक अवघी दीड महिन्याची चिमुरडी आपल्या आईबरोबर तिथे आली होती. एवढ्या लहान मुलीला वरती कशाला घेऊन आलात म्हणुन विचारले तर नवस फ़ेडायला आलो आहोत असे त्या माऊलीने सांगितले. आपल्या मनातील नवस बोलायचा आणि जवळची दुर्वांची जुडी भैरवनाथांच्या डोक्यावर ठेवायची, जुडी खाली पडली तर नवस पुर्ण होणार. आणि नवस पुर्ण करण्यासाठी अश्वारुढ पुतळयाच्या दोन पायांच्या मधुन मुलाला किंवा मुलीला पलीकडे द्यायचे अशी काहीतरी प्रथा आहे म्हणे. म्हणजे आपण बारश्याच्या वेळेला पाळ्ण्याखालुन बाळांना देतो त्याच टाईपचं काहितरी. माऊलीची परमीशन घेऊन त्या चिमुरडीचा फ़ोटो काढला.
विरगळ किंवा सतीचे दगड
आजुबाजुचा आसमंत न्याहाळला आणि निघालो.
साधारण ९.१५ च्या सुमारास पुन्हा आश्रमशाळेत आलो. प्रबंधक आणि हेडमास्तर यांचा निरोप घेतला आणि बाईकला किक मारली. पुन्हा १० च्या सुमारास राजुरला आलो. तिथे एका टपरीवर वडा-पाव, चहा घेतला आणि पाबरगडावर जाण्यासाठी घोटी रस्त्यावर असलेल्या गुहिरे गावात आलो.
गुहिरे गावातुन पाबरगड
बाईक एका घरापाशी लावली, वाट विचारुन घेतली आणि ११.०० ला निघालो. १२.३० ला पाबरगडाच्या माथ्यावर पोहोचलो.
वरती विशेष काही नाही पाण्याच टांक आणि माजलेलं रान बस्स. ऊन मात्र चांगलच भाजुन काढत होतं.
माथ्यावरुन रतनगड आणि भंडारदरा परिसर
कळसुबाई, अलंग, कुलंग, मदन परिसर
१.३० च्या सुमारास ऊतरायला सुरुवात केली आणि ३.०० वा. पुन्हा गुहिरे गावात आलो. चहा प्यायला आणि ठाण्याला यायला निघालो. घोटी-ईगतपुरी-कसारा-शहापुर-ठाणे असा प्रवास करत ६.४० ला ठाण्याला ट्च. विशेष म्हणजे आदल्या दिवशी पेट्रोलचा काटा फुल दाखवत होता तो आम्ही ठाण्याला आलो तरी फुलच. आहे ना आश्चर्य. असो.
अशारितिने दोन दिवसात जवळ जवळ ४५० किमी. बाईक रनींग आणि कुंजरगड, भैरवगड, पाबरगड असे तिन किल्ले सर झाले.
बज्जु गुरुजी
प्रवासइतिहासछायाचित्रण