अकोले,(शांताराम काळे )महाराष्ट्रात शैव, वैष्णव पंथांच्या खालोखाल शाक्त पंथाचा प्रसारही प्राचीन काळापासून झालेला आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी तर माहूरगडची रेणुका ही प्राचीन शक्तिस्थाने याची साक्ष देतात. याच प्राचीन मंदीरातील एक मंदीर म्हणजे टाहाकारीचे जगदंबा मंदीर. अहमदनगर जिल्ह्याचे काश्मीर म्हणून ओळखला जाणा-या अकोले तालुक्यात प्राचीन व कलाकुसरयुक्त अनेक मंदिरे आहेत. अगदी प्राचीन काळापासून येथे राज्य करणाऱ्या विविध राजसत्तांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात लेण्या, दुर्ग व मंदिरे यांची साखळी निर्माण केली. एकेकाळच्या व्यापारी मार्गावर बांधलेली ही मंदिरे आज आडबाजूला पडली आहेत. प्राचीन काळी व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी ज्याप्रमाणे किल्ले बांधले गेले त्याप्रमाणे या मार्गावर मंदिरांचीही निर्मिती केली. यातील अप्रतिम कलाकुसरीची अनेक मंदिरे आजही दिमाखात उभी आहेत. असेच एक सुंदर कातळशिल्प म्हणजे टाहाकारीचं जगदंबा मंदिर. अकोल्याहून समशेरपूरमार्गे साधारण वीस कि.मी. तर सिन्नरहून ठाणगाव मार्गे तीस कि.मी.वर आढळा नदीच्या काठावर टाहाकारी हे लहानसे गाव आहे. या टाहाकारी गावात हे जगदंबेचे प्राचीन मंदिर आहे. गावकऱ्यांकडून टाहाकारी या नावाच्या उत्पत्तीबाबत दोन कथा सांगितल्या जातात. हा परिसर रामायणातील दंडकारण्याशी संबंधीत असल्याने येथील कथाही रामायणाशी संबंधित आहे. पहिली कथा म्हणजे रावणाने सीताहरण केले तेव्हा सीतेने रामासाठी जिथे टाहो फोडला ते ठिकाण म्हणजे टाहोकरी नंतर टाहाकारी म्हणून प्रसिद्धीला आले व दुसरी कथा अशी प्रभू राम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात असता शिव-पार्वती आकाशातून विहार करीत होते. रामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून पार्वतीने प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याचे ठरविले. सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरी गेली पण प्रभू रामचंद्रांनी पार्वतीला ओळखले आणि वंदन केले. तेव्हा पार्वती आपल्या मूळ जगदंबा रूपात येथे प्रगटली. तेथे हे जगदंबा मंदिर बांधले गेले. टाहाकारी गावातील आढळा नदीवरील पूल ओलांडल्यावर मंदिराचे तीन पांढरे कळस दिसायला लागतात. मंदिराजवळ पोहोचल्यावर मंदिराभोवती असलेली सात फूट उंच तटबंदी दिसते. तटबंदीतील पूर्व दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. टाहाकारीचे मंदिर भूमीज पद्धतीचे असुन उत्तराभिमुख आहे. या मंदिराचे मुख मंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत. मंदिर चार फूट उंच दगडी जोत्यावर उभे आहे. जोत्यावर पुष्पपट्टी आणि पद्मपट्टी कोरलेली आहे. मंदिराचा मुखमंडप १० खांबांवर आधारलेला असुन या मुखमंडपात भिंतीलगत दगडी आसनांची रचना केलेली आहे. मुखमंडपाच्या सज्जावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली असुन त्यात मैथुन शिल्पेही आहेत. मुखमंडपातून सभामंडपात आल्यावर मंदिराचा अंतर्गत विस्तार जाणवतो. बारा खांबांवर आधारित हा मंडप असुन समोरच खांबाला टेकवून शंकर-पार्वतीची व गणपतीची मुर्ती आहे. खांबांवर विविध प्रकारची नक्षी, शिल्पे, कीर्तिमुख, भौमीतिक आकृत्या कोरलेल्या असुन खांबांच्या टोकाला छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. सभामंडपाच्या छताला एकात एक गुंफलेली वर्तुळे व मध्यभागातून खाली लोंबणारे दगडी झुंबर अप्रतिम आहे. या वर्तुळाकार कोरीव कामात फूल, सिंह आणि आठ अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपाला पूर्व, पश्चिम व दक्षिण या तीन दिशेला तीन गर्भगृहे आहेत. या रचनेला त्रिदल रचना म्हणतात. मुख्य गर्भगृह आणि सभामंडप यांच्या मध्ये अंतराळ आहे. अंतराळात काही देवकोष्टेही आहेत. मुख्य गर्भगृहाच्या दरवाजावर सुंदर नक्षीकाम केले असून शीर्षपट्टीवर देवीची संकेतमूर्ती आहे. गर्भगृहात देवीचा तांदळा आणि अठरा हातांच्या जगदंबेची लाकडी मूर्ती आहे. अत्यंत प्रसन्न आणि देखण्या अशा या मूर्तीच्या हातामध्ये विविध आयुधे दाखवलेली आहेत. श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून महिषासुरमर्दिनी अवतारात आहे. सभामंडपाच्या दोन बाजूंस असलेल्या गर्भगृहात पूर्वेस महालक्ष्मी तर पश्चिमेस भद्रकाली देवीची मूर्ती आहे. या गर्भगृहाच्या बाहेरील भिंतीवर उजव्या बाजुस कामाक्षी देवीचे शिल्प तर डाव्या बाजुस कुबेराचे शिल्प कोरले आहे. मंदिराचा अंतर्भाग पाहून मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर अनेक कोनांत दुमडलेला मंदिराचा बाह्य़भाग दिसतो. मंदिराची बाह्य़रचना तारकाकृती असुन भिंतीच्या बाह्य़ भागावर आणि खांबांवर मोठया प्रमाणावर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या बाह्यांगावर दुमडलेल्या भिंतीच्या मध्यावर २२ प्रकारच्या सुरसुंदरींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. सुरसुंदरी म्हणजे देवांगना. देवांच्या खालोखाल यांचा मान. टाहाकारी मंदिराचे हे मुख्य आकर्षण असुन त्यांच्या रचना शैलीतून तत्कालीन कलासौंदर्याचे अनेक आविष्कार उलगडतात. कधी आरशात स्वत:चे सौंदर्य पाहणाऱ्या, कर्णभूषणे घालणाऱ्या, केसात गजरा घालणाऱ्या, केशशृंगार करणाऱ्या अशा दर्पणा, तर कुठे नृत्य करणारी नृत्यसुंदरी, बासरी, मृदंग वादन करणारी, हाती पोपट घेतलेली शुकसारिका, मुलाला घेतलेली मातृमूर्ती, मांडीवर विंचू असणारी विषकन्या, डोक्यावर छत्र धारण केलेली, मर्कट लीलांनी हैराण झालेली अशा अनेक सुरसुंदरींच्या मूर्ती आहेत. एका सुंदरीच्या अंगामध्ये विदेशी पद्धतीचा कोट घातलेला स्पष्टपणे दिसतो. मंदिर प्रदक्षिणा सुरू केल्यावर पूर्वेकडील भिंतीवर कोरलेली गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. पूर्वेकडील गर्भगृहामागील देवकोष्टात चामुंडेची मूर्ती आहे. चामुंडा हे देवीचं क्रूर रूप आहे. हडकुळं शरीर, पोटावर विंचू, गळ्यात मुंडमाळा, हातातल्या दंडावरची कवटी, डाव्या हाताच्या करंगळीचे नख कुरतडताना ही मूर्ती दाखवलेली आहे. या देवकोष्टकाखाली गर्भगृहातील पाणी जाण्याच्या पन्हाळीवर मकरमुख कोरलेलं आहे. त्यावरील नक्षीकाम अप्रतिम आहे. मुख्य गर्भगृहामागील देवकोष्टात नृत्य करणाऱ्या शंकराची मूर्ती कोरलेली आहे. त्याच्या पायाशी डमरू वाजवणारा गण तर डाव्या कोपऱ्यात बासरी वाजवणारा गण कोरला आहे. या कोष्टाच्या महिरपीवर ब्रह्मा, विष्णू, महेश कोरलेले आहेत. पश्चिमेकडच्या गर्भगृहाच्या मागील देवकोष्टात डमरू, तलवार आणि त्रिशूळ घेतलेल्या शंकराची मूर्ती कोरण्यात आलेली आहे. मूर्तीचा एक हात तुटलेला आहे. मंदिरासमोरील नदीच्या घाटाच्या पायऱ्यांवर एक कोरीव खांब आहे. त्यावर एक संस्कृत शिलालेख असून त्यामध्ये शके १०५० म्हणजेच इ.स. ११२८ असा उल्लेख सापडतो. हा शिलालेख पुसट झाल्याने आता वाचता येत नाही. खांबाच्या बाजूला शेषनागाचे एक पडकं मंदिर असुन मंदिराबाहेर समाधीचे दोन फूट उंचीचे अष्टकोनी दगड आहेत. त्यावर पावले शिवलिंग आणि नंदी कोरला आहे. मंदिर परिसरातील झाडी, जवळून वाहणारी नदी यामुळे हा परिसर रम्य झालेला आहे. चैत्रामध्ये देवीची मोठी यात्रा भरते तर नवरात्रीत एकूण बारा दिवस इथे मोठा उत्सव केला जातो. मंदीर नीटपणे पहायचे असल्यास या काळात येथे जाणे टाळावे. येथील स्थानिक जनतेला या कलेचं भान व ज्ञान नसल्याने हजार वर्षे प्राचीन असलेल्या या कोरीव मंदिराचे ऐतिहासिक मोल पार धुळीस मिळत असले तरी टाहाकारी मंदिर आवर्जून पाहण्यासारखेच आहे. --------------(टिप—सदर मंदिराच्या मुर्तींची माहीती श्री.अनिल शिरसाट यांनी दिलेली असुन राम सीतेच्या शोधात भटकत असताना पार्वती त्याची परीक्षा घेते ही आख्यायिका टाहाकारी गावाजवळ असलेल्या या जगदंबा मंदिराशी जोडलेली आहे. हेमाडपंथी शैलीतलं हे मंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत अनेक छोटय़ा गावांत प्राचीन कलाकुसर केलेली मंदिरे आहेत. एके काळी त्याकाळच्या व्यापारी मार्गावर बांधलेली ही मंदिरे आज आडबाजूला पडली आहेत. प्राचीन काळी घाटवाटांचे/ व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी ज्याप्रमाणे किल्ले बांधले गेले तशीच त्याकाळच्या राज्यकर्त्यांनी या मार्गावर मंदिरांचीही निर्मिती केली. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या व्यापारी तांडय़ांची, पांथस्थांची विश्रांतीची, राहण्याची सोय या मंदिरांत होत असे. व्यापाऱ्यांनी केलेल्या दानामुळे या मंदिरांचा दैनंदिन खर्च आणि डागडुजीची कामे होत अशी परस्परपूरक रचना होती. इसवी सनच्या बाराव्या शतकात टाहाकारीच्या मंदिराची निर्मिती यादव वंशीय राजांनी केली असावी.
सह्यद्रीच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळ (कसारा) घाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला ‘कळसूबाई रांग’ म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. श्री एकनाथ महाराजकृत श्री भावार्थ रामायणाच्या अरण्यकांडात या पुरातन अवंध व पट्टा किल्ल्यांच्या परिसराचा उल्लेख आढळतो.
रावणाचा छेदिला आंगोठा
तेथे झाला औंढापट्टा
त्रिंबकीच्या बिकटघाटा
अवंढा-पट्टा प्रसिद्ध!!
या पट्टा किल्ल्याच्या डोंगरात उगम पावणाऱ्या आढळा नदीच्या काठावर किल्ल्यापासून २५ किमी अंतरावर ‘टाहाकारी’ हे लहानसे गाव आहे. अहमदनगर जिल्ह्य़ातील, अकोले तालुक्यात येणाऱ्या टाहाकारी गावात ‘जगदंबेचे’ प्राचीन मंदिर आहे. मंदिर म्हटलं की दंतकथा आलीच. नाशिक परिसर रामायणाशी संबंधित आहे. त्यामुळे या मंदिराची दंतकथाही रामाशी निगडित आहे. प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात होते. सीतेच्या विरहाने व्याकूळ होऊन श्रीराम विलाप करीत होते. त्याच वेळी शिव-पार्वती आकाशातून विहार करीत होते. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांना व्याकूळ झालेल्या अवस्थेत पाहिले. श्रीरामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून माता पार्वतीने प्रभू श्रीरामचंद्राची परीक्षा घेण्याचे ठरविले. सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरी गेली. प्रभू श्रीरामचंद्रांनी सीतेच्या रूपातील पार्वती मातेला ओळखले आणि तिला वंदन केले. तेव्हा माता पार्वती खजील होऊन येथेच अंतर्धान पावली आणि श्री जगदंबा रूपाने पुन्हा प्रगटली. तेथेच आता जगदंबेचे मंदिर बांधलेले आहे.
टाहाकारी गावातील आढळा नदीवरील पूल ओलांडल्यावर मंदिराचे सिमेंटचे तीन पांढरे कळस दिसायला लागतात. मंदिराजवळ पोहोचल्यावर मंदिराभोवती असलेली सात फूट उंच तटबंदी दिसते. तटबंदीतील पूर्व दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिर उत्तराभिमुख आहे. त्याचे तोंड उत्तरेला म्हणजेच आढळा नदीकडे आहे. टाहाकारी मंदिराची बांधणी हेमाडपंथी पद्धतीची आहे. या प्रकारात चुन्याचा वापर न करता मंदिराचे दगड एकमेकांत अडकवले जातात. मंदिराचे मूळचे तीन कळस कोसळलेले असून त्याजागी सिमेंटचे अतिशय बेढब कळस बांधलेले आहेत. तसेच मंदिराच्या समोर सिमेंटचा सभामंडप बांधून मंदिराची शोभा घालवायचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे. आपले नशीब म्हणजे दगडी बांधणीचे मंदिर अजूनही जसेच्या तसे ठेवलेले आहे.
टाहाकारीचे हेमाडपंथी मंदिर भूमीज पद्धतीचे आहे. या मंदिराचे मुख मंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत. मंदिर चार फूट उंच दगडी जोत्यावर (ज्याला ‘अधिष्ठान’ म्हणतात) उभे आहे. जोत्यावर पुष्प पट्टी आणि पद्म पट्टी कोरलेली आहे, मंदिराच्या मुख मंडपाच्या सज्जावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत, त्यात मैथुन शिल्पेही आहेत. मुख मंडपातून सभामंडपात शिरल्यावर समोरच खांबाला टेकवून ठेवलेल्या दोन मूर्ती दिसतात. त्यातील एक शंकर-पार्वतीची आहे, तर दुसरी गणपतीची आहे. मंदिराचे छत ७२ खांबांवर तोललेले आहे. खांबांवर विविध प्रकारची नक्षी, शिल्पे, कीर्तिमुख, भौमित्तिक आकृत्या काढलेल्या आहेत. खांबांच्या टोकाला छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. मुख्य मंडपाच्या छतावरचे वर्तुळाकार नक्षीकाम अप्रतिम आहे. या वर्तुळाकार कोरीव कामात फूल, सिंह आणि आठ अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपाच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण या तीन बाजूंस तीन गर्भगृहे आहेत. या रचनेला त्रिदल रचना म्हणतात. मुख्य गर्भगृह आणि सभामंडप यांच्या मध्ये अंतराळ आहे.
मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात देवीचा तांदळा आणि जगदंबेची अठरा भुजा असलेली काष्ठमूर्ती आहे. देवीच्या हातांमध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून ‘महिषासुरमर्दनिीच्या’ अवतारात आहे. सभामंडपाच्या दोन बाजूंस असलेल्या गर्भगृहात पूर्वेस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) देवीच्या सुबक मूर्ती आहेत.
मंदिराचा अंतर्भाग पाहून झाल्यावर मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर अनेक कोनांत दुमडलेला बाह्य़भाग समोर येतो. यामुळे निर्माण झालेल्या कोनाडय़ांमध्ये सुरसुंदरींच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. यात शुकसारिका, नृत्य करणारी, वादन करणारी, शस्त्र धारण केलेली इत्यादी अनेक प्रकारच्या सुरसुंदरींच्या मूर्ती आहेत. मंदिर प्रदक्षिणा सुरू केल्यावर पूर्वेकडील भिंतीवर कोरलेली गजाननाची मूर्ती पाहायला मिळते. पूर्वेकडील गर्भगृहामागील देवकोष्टात चामुंडेची मूर्ती आहे. चामुंडा हे देवीचं क्रूर रूप आहे. हडकुळं शरीर, पोटावर विंचू, गळ्यात मुंडमाळा, हातातल्या दंडावरची कवटी, डाव्या हाताच्या करंगळीचे नख कुरतडताना दाखवलेली ही मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. या देवकोष्टकाखाली गर्भगृहातील पाणी जाण्यासाठी पन्हाळी आहे. तिथे नेहमीप्रमाणे गोमुख न कोरता मकरमुख कोरलेलं आहे. त्यावरील नक्षीकाम अप्रतिम आहे.
मुख्य गर्भगृहामागील देवकोष्टात नृत्य करणाऱ्या शंकराची मूर्ती कोरलेली आहे. त्याच्या पायाशी तालवाद्य वाजवणारा गण आहे, तर डाव्या कोपऱ्यात बासरी वाजवणारा गण कोरलेला आहे. या कोष्टाच्या महिरपीवर ब्रह्मा, विष्णू, महेश कोरलेले आहेत. पश्चिमेकडच्या गर्भगृहाच्या मागील देवकोष्टात डमरू, तलवार आणि त्रिशूळ घेतलेल्या शंकराची मूर्ती कोरण्यात आलेली आहे. मूर्तीचा एक हात तुटलेला आहे.
मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरासमोर येऊन नदीवरील घाटाच्या पायऱ्यांवर एक कोरीव खांब आहे. त्यावरील शिलालेख पुसट झाल्याने वाचता येत नाही. खांबाच्या बाजूला शेषनागाचे मंदिर आहे. मंदिराबाहेर काही वैशिष्टय़पूर्ण समाधीचे दगड ठेवलेले आहेत. दोन फूट उंचीचे हे दगड अष्टकोनी असून त्याच्यावर शिवलिंग, नंदी आणि पावले कोरलेली आहेत.
मंदिर परिसरात भक्तांसाठी बांधलेला नवीन हॉल आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. मंदिर परिसरातील झाडी, जवळून वाहणारी नदी यामुळे हा परिसर रम्य झालेला आहे. या रम्य परिसराला आणि ऊन, वारा, पाऊस यांचा मारा सहन करत गेली अनेक शतके उभे असलेले हे मंदिराचे दगडी शिल्प पाहण्यासाठी एकदा वाट वाकडी करायला काहीच हरकत नाही.
मुंबईकर, नाशिककर स्वत:चं वाहन असल्यास एका दिवसात ‘टाहाकारीचं जगदंबा मंदिर’, ‘टाकेदचं जटायू मंदिर’ पाहू शकतात. जर वेळेचे व्यवस्थित नियोजन केले तर शिवरायांच्या चरणस्पर्शाने पावन झालेला पट्टा किल्ला ऊर्फ विश्रामगडही पाहता येईल आणि एका दिवसात त्रिस्थळी यात्रा घडेल.
सह्यद्रीच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळ (कसारा) घाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला ‘कळसूबाई रांग’ म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. श्री एकनाथ महाराजकृत श्री भावार्थ रामायणाच्या अरण्यकांडात या पुरातन अवंध व पट्टा किल्ल्यांच्या परिसराचा उल्लेख आढळतो.
रावणाचा छेदिला आंगोठा
तेथे झाला औंढापट्टा
त्रिंबकीच्या बिकटघाटा
अवंढा-पट्टा प्रसिद्ध!!
या पट्टा किल्ल्याच्या डोंगरात उगम पावणाऱ्या आढळा नदीच्या काठावर किल्ल्यापासून २५ किमी अंतरावर ‘टाहाकारी’ हे लहानसे गाव आहे. अहमदनगर जिल्ह्य़ातील, अकोले तालुक्यात येणाऱ्या टाहाकारी गावात ‘जगदंबेचे’ प्राचीन मंदिर आहे. मंदिर म्हटलं की दंतकथा आलीच. नाशिक परिसर रामायणाशी संबंधित आहे. त्यामुळे या मंदिराची दंतकथाही रामाशी निगडित आहे. प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात होते. सीतेच्या विरहाने व्याकूळ होऊन श्रीराम विलाप करीत होते. त्याच वेळी शिव-पार्वती आकाशातून विहार करीत होते. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांना व्याकूळ झालेल्या अवस्थेत पाहिले. श्रीरामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून माता पार्वतीने प्रभू श्रीरामचंद्राची परीक्षा घेण्याचे ठरविले. सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरी गेली. प्रभू श्रीरामचंद्रांनी सीतेच्या रूपातील पार्वती मातेला ओळखले आणि तिला वंदन केले. तेव्हा माता पार्वती खजील होऊन येथेच अंतर्धान पावली आणि श्री जगदंबा रूपाने पुन्हा प्रगटली. तेथेच आता जगदंबेचे मंदिर बांधलेले आहे.
टाहाकारी गावातील आढळा नदीवरील पूल ओलांडल्यावर मंदिराचे सिमेंटचे तीन पांढरे कळस दिसायला लागतात. मंदिराजवळ पोहोचल्यावर मंदिराभोवती असलेली सात फूट उंच तटबंदी दिसते. तटबंदीतील पूर्व दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिर उत्तराभिमुख आहे. त्याचे तोंड उत्तरेला म्हणजेच आढळा नदीकडे आहे. टाहाकारी मंदिराची बांधणी हेमाडपंथी पद्धतीची आहे. या प्रकारात चुन्याचा वापर न करता मंदिराचे दगड एकमेकांत अडकवले जातात. मंदिराचे मूळचे तीन कळस कोसळलेले असून त्याजागी सिमेंटचे अतिशय बेढब कळस बांधलेले आहेत. तसेच मंदिराच्या समोर सिमेंटचा सभामंडप बांधून मंदिराची शोभा घालवायचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे. आपले नशीब म्हणजे दगडी बांधणीचे मंदिर अजूनही जसेच्या तसे ठेवलेले आहे.
टाहाकारीचे हेमाडपंथी मंदिर भूमीज पद्धतीचे आहे. या मंदिराचे मुख मंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत. मंदिर चार फूट उंच दगडी जोत्यावर (ज्याला ‘अधिष्ठान’ म्हणतात) उभे आहे. जोत्यावर पुष्प पट्टी आणि पद्म पट्टी कोरलेली आहे, मंदिराच्या मुख मंडपाच्या सज्जावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत, त्यात मैथुन शिल्पेही आहेत. मुख मंडपातून सभामंडपात शिरल्यावर समोरच खांबाला टेकवून ठेवलेल्या दोन मूर्ती दिसतात. त्यातील एक शंकर-पार्वतीची आहे, तर दुसरी गणपतीची आहे. मंदिराचे छत ७२ खांबांवर तोललेले आहे. खांबांवर विविध प्रकारची नक्षी, शिल्पे, कीर्तिमुख, भौमित्तिक आकृत्या काढलेल्या आहेत. खांबांच्या टोकाला छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. मुख्य मंडपाच्या छतावरचे वर्तुळाकार नक्षीकाम अप्रतिम आहे. या वर्तुळाकार कोरीव कामात फूल, सिंह आणि आठ अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपाच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण या तीन बाजूंस तीन गर्भगृहे आहेत. या रचनेला त्रिदल रचना म्हणतात. मुख्य गर्भगृह आणि सभामंडप यांच्या मध्ये अंतराळ आहे.
मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात देवीचा तांदळा आणि जगदंबेची अठरा भुजा असलेली काष्ठमूर्ती आहे. देवीच्या हातांमध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून ‘महिषासुरमर्दनिीच्या’ अवतारात आहे. सभामंडपाच्या दोन बाजूंस असलेल्या गर्भगृहात पूर्वेस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) देवीच्या सुबक मूर्ती आहेत.
मंदिराचा अंतर्भाग पाहून झाल्यावर मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर अनेक कोनांत दुमडलेला बाह्य़भाग समोर येतो. यामुळे निर्माण झालेल्या कोनाडय़ांमध्ये सुरसुंदरींच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. यात शुकसारिका, नृत्य करणारी, वादन करणारी, शस्त्र धारण केलेली इत्यादी अनेक प्रकारच्या सुरसुंदरींच्या मूर्ती आहेत. मंदिर प्रदक्षिणा सुरू केल्यावर पूर्वेकडील भिंतीवर कोरलेली गजाननाची मूर्ती पाहायला मिळते. पूर्वेकडील गर्भगृहामागील देवकोष्टात चामुंडेची मूर्ती आहे. चामुंडा हे देवीचं क्रूर रूप आहे. हडकुळं शरीर, पोटावर विंचू, गळ्यात मुंडमाळा, हातातल्या दंडावरची कवटी, डाव्या हाताच्या करंगळीचे नख कुरतडताना दाखवलेली ही मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. या देवकोष्टकाखाली गर्भगृहातील पाणी जाण्यासाठी पन्हाळी आहे. तिथे नेहमीप्रमाणे गोमुख न कोरता मकरमुख कोरलेलं आहे. त्यावरील नक्षीकाम अप्रतिम आहे.
मुख्य गर्भगृहामागील देवकोष्टात नृत्य करणाऱ्या शंकराची मूर्ती कोरलेली आहे. त्याच्या पायाशी तालवाद्य वाजवणारा गण आहे, तर डाव्या कोपऱ्यात बासरी वाजवणारा गण कोरलेला आहे. या कोष्टाच्या महिरपीवर ब्रह्मा, विष्णू, महेश कोरलेले आहेत. पश्चिमेकडच्या गर्भगृहाच्या मागील देवकोष्टात डमरू, तलवार आणि त्रिशूळ घेतलेल्या शंकराची मूर्ती कोरण्यात आलेली आहे. मूर्तीचा एक हात तुटलेला आहे.
मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरासमोर येऊन नदीवरील घाटाच्या पायऱ्यांवर एक कोरीव खांब आहे. त्यावरील शिलालेख पुसट झाल्याने वाचता येत नाही. खांबाच्या बाजूला शेषनागाचे मंदिर आहे. मंदिराबाहेर काही वैशिष्टय़पूर्ण समाधीचे दगड ठेवलेले आहेत. दोन फूट उंचीचे हे दगड अष्टकोनी असून त्याच्यावर शिवलिंग, नंदी आणि पावले कोरलेली आहेत.
मंदिर परिसरात भक्तांसाठी बांधलेला नवीन हॉल आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. मंदिर परिसरातील झाडी, जवळून वाहणारी नदी यामुळे हा परिसर रम्य झालेला आहे. या रम्य परिसराला आणि ऊन, वारा, पाऊस यांचा मारा सहन करत गेली अनेक शतके उभे असलेले हे मंदिराचे दगडी शिल्प पाहण्यासाठी एकदा वाट वाकडी करायला काहीच हरकत नाही.
मुंबईकर, नाशिककर स्वत:चं वाहन असल्यास एका दिवसात ‘टाहाकारीचं जगदंबा मंदिर’, ‘टाकेदचं जटायू मंदिर’ पाहू शकतात. जर वेळेचे व्यवस्थित नियोजन केले तर शिवरायांच्या चरणस्पर्शाने पावन झालेला पट्टा किल्ला ऊर्फ विश्रामगडही पाहता येईल आणि एका दिवसात त्रिस्थळी यात्रा घडेल.
जाण्यासाठी :
१) मुंबई-नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर – घोटी गाव आहे. घोटी गावातून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदऱ्याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदऱ्याला जाणाऱ्या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटीपासून टाकेदपर्यंत पोहोचण्यास पाऊण तास लागतो. टाकेदहून टाहाकारीला जाणारा रस्ता आहे. इगतपुरी ते टाहाकारी अंतर ५८ किमी आहे.
२) पट्टा किल्ला मार्गे टाहाकारी :टाकेद गावाबाहेर प्राचीन राममंदिर आहे. रामायणातील जटायूने रावणाशी युद्ध करून इथेच प्राण सोडला, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायूचे मंदिरसुद्धा आहे. जवळच रामाने जटायूला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारून तयार केलेला झरा व पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून राम मंदिराला जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या हाताचा फाटा कोकणवाडी मार्गे पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. कोकणवाडी ते पट्टावाडी अंतर अध्र्या तासाचे आहे. पट्टावाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. पट्टावाडीपासून ठाणगाव मार्गे २५ किलोमीटर वर टाहाकारी गाव आहे.अकोल्यापासून चे अंतर :
१) मुंबई-नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर – घोटी गाव आहे. घोटी गावातून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदऱ्याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदऱ्याला जाणाऱ्या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटीपासून टाकेदपर्यंत पोहोचण्यास पाऊण तास लागतो. टाकेदहून टाहाकारीला जाणारा रस्ता आहे. इगतपुरी ते टाहाकारी अंतर ५८ किमी आहे.
२) पट्टा किल्ला मार्गे टाहाकारी :टाकेद गावाबाहेर प्राचीन राममंदिर आहे. रामायणातील जटायूने रावणाशी युद्ध करून इथेच प्राण सोडला, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायूचे मंदिरसुद्धा आहे. जवळच रामाने जटायूला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारून तयार केलेला झरा व पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून राम मंदिराला जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या हाताचा फाटा कोकणवाडी मार्गे पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. कोकणवाडी ते पट्टावाडी अंतर अध्र्या तासाचे आहे. पट्टावाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. पट्टावाडीपासून ठाणगाव मार्गे २५ किलोमीटर वर टाहाकारी गाव आहे.अकोल्यापासून चे अंतर :
अकोले , ता . १७:टाहाकारी गावातील जगदंबा मातेचे मंदिर म्हणजे एक प्राचीन वारसा आहे. उत्तराभिमुख असलेले हे मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असून त्याची लांबी २१० फुट व रुंदी १९० फुट तर उंची १५ फुट आहे. मंदिराची रचना अष्टकोनाकृती असून त्याचे अंतराळ, मंडप, गाभारा, या भागात विभाजन केलेले आहे.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आतील व बाहेरील बाजूस रंभा, मेनका, उर्वशी, तसेच इंद्र देवाच्या दरबारातील प-या नृत्य करताना कोरलेल्या आहेत. मंडपाला असणा-या बारा खांबापैकी आतील बाजूस स्तंभ शिर्षापासून छतापर्यंत दोन अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. काही ठिकाणी देव दानवांच्या मूर्ती तर काही ठिकाणी सैनिक, व्याध, देवतामूर्ती अशी शिल्पे कोरलेली आहेत.
अखंड लाकडात कोरलेली जगदंबा मातेची भव्य मूर्ती मंदिरात स्थापन केलेली आहे. हे जगदंबेचे मंदिर अकोल्यापासून २५ कि.मी. अंतरावर आहे. या जगदंबा मातेच्या दर्शनास छत्रपती शिवाजी महाराज आल्याची नोंद ऐतिहासिक कागदपत्रांत पहावयास मिळते.
महाराष्ट्रातही अतिशय सुंदर, घडीव आणि अप्रतिम शिल्पकामाने सजवलेली प्राचीन मंदिरे अस्तित्वात आहेत याची माहिती अनेकांना नसते.महाराष्ट्रात प्रामुख्याने दगडी बांधकामाची आणि अप्रतिम कोरीव नक्षीकामाने सजवलेली जी देवळे दिसतात ती बरेचदा हेमाडपंती या नावाने ओळखली जातात.टाहाकारीचे जगदंबा मंदिर ,वेरूळचे घृष्णेश्वराचे मंदिर, अंबरनाथचे शंकराचे मंदिर, नाशिकजवळील गोंदेश्वर मंदिर, गोदावरीच्या तीरावरील मंदिरे, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा कळस, ज्योतिबाच्या डोंगरावरची देवळे, शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव,.
हयहैय, यादव, चालुक्य हे तत्कालीन राजे शिवभक्त आणि देवीचेभक्त असल्याने महाराष्ट्रात हेमाडपंती बांधणीची शिवमंदिरे प्रामुख्याने दिसतात.
टाहाकारी हे गाव अकोले तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे. येथील जगदंबा मंदिर पुरातन हेमाडपंती स्थापत्यशैली मंदिर आहे. मंदिराच्या दगडींवर कलात्मक शैलीतील स्त्रियांची कोरीव मुर्त्या आहेत
टाहाकारीचे जगदंबा मंदिर हे यादवकालीन म्हणले जाते .चुन्याचा दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. बांधकाम करण्यासाठी चुना, माती न वापरल्याने या मंदिरांचे बांधकाम कोरडे आहे. दगडांवरील सुबक शिल्पकला आणि पटईची छते या मंदिरांना एक आगळे रूप प्रदान करतात. या मंदिरांची बांधकामे यादव काळात सुरू झाली असावी असा सर्वसाधारण समज आहे.
हे मंदिर जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा हे मंदिर बांधले गेले आहे असे मानले जाते .पण पुढे मोगल राजवटीत मंदिरचा कळस तोडले गेला आणि शिवाजी महाराजायांचाया काळात तो पुन्हा बांधला गेला.जेव्हा गरुड रावण युद्धानंतर रावण विश्रांतीसाठी याच मंदिरात थांबला आणि सीतामातेने याच मंदिरात टाहो फोडला म्हणून गावाचे नाव टाहोकारी आसे पडले .पुढे त्याचा अपभ्र्वांश होऊवन टाहाकारी असे नाव पडले .जेव्हा शिवाजी महाराजांची आग्र्यावरून सुटका झाली तेव्हा ते साधूच्या वेश्यात मंदिरात राहून गेले.
टाहाकारी हे गाव अकोले तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे. येथील जगदंबा मंदिर पुरातन हेमाडपंती स्थापत्यशैली मंदिर आहे. मंदिराच्या दगडींवर कलात्मक शैलीतील स्त्रियांची कोरीव मुर्त्या आहेत
टाहाकारीचे जगदंबा मंदिर हे यादवकालीन म्हणले जाते .चुन्याचा दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. बांधकाम करण्यासाठी चुना, माती न वापरल्याने या मंदिरांचे बांधकाम कोरडे आहे. दगडांवरील सुबक शिल्पकला आणि पटईची छते या मंदिरांना एक आगळे रूप प्रदान करतात. या मंदिरांची बांधकामे यादव काळात सुरू झाली असावी असा सर्वसाधारण समज आहे.
हे मंदिर जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा हे मंदिर बांधले गेले आहे असे मानले जाते .पण पुढे मोगल राजवटीत मंदिरचा कळस तोडले गेला आणि शिवाजी महाराजायांचाया काळात तो पुन्हा बांधला गेला.जेव्हा गरुड रावण युद्धानंतर रावण विश्रांतीसाठी याच मंदिरात थांबला आणि सीतामातेने याच मंदिरात टाहो फोडला म्हणून गावाचे नाव टाहोकारी आसे पडले .पुढे त्याचा अपभ्र्वांश होऊवन टाहाकारी असे नाव पडले .जेव्हा शिवाजी महाराजांची आग्र्यावरून सुटका झाली तेव्हा ते साधूच्या वेश्यात मंदिरात राहून गेले.
मंदिरांच्या मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ,
गाभारा चौकोनी व सभांडपाला अनेक अलंकृत खांब. खांबांवर व छत्तावर पौराणिक प्रसंगांची चित्रे कोरलेली असतात. काही ठिकाणी कमानी काढून सभामंडपाला आधार दिलेला असतो. दर्शनी भाग भोजमंडप असतो. भिंती कोनयुक्त असतात. सर्व बांधकाम काळ्या दगडात असते. देवालये पूर्वाभिमुख असतात. ह्या देवालयांचे चिरे त्रिकोण, चौकोन, पंचकोन, वर्तुळ, अर्धवर्तुळ इत्यादी आकारांत घडवून ते एकमेकांत इतक्या कुशलतेने बसवलेले असतात की त्यामुळे इमारतीच्या प्रत्येक अवयवाला दुस-याचा आधार मिळून छत बिनधोक राहू शकते. देवालयात शृंगारिक शिल्पे आढळतात.तेव्हा असे मानले जाते कि कलियुगात काय घडणार आहे हे तेव्हाच रेखाटून तेवले आहे .
गाभारा चौकोनी व सभांडपाला अनेक अलंकृत खांब. खांबांवर व छत्तावर पौराणिक प्रसंगांची चित्रे कोरलेली असतात. काही ठिकाणी कमानी काढून सभामंडपाला आधार दिलेला असतो. दर्शनी भाग भोजमंडप असतो. भिंती कोनयुक्त असतात. सर्व बांधकाम काळ्या दगडात असते. देवालये पूर्वाभिमुख असतात. ह्या देवालयांचे चिरे त्रिकोण, चौकोन, पंचकोन, वर्तुळ, अर्धवर्तुळ इत्यादी आकारांत घडवून ते एकमेकांत इतक्या कुशलतेने बसवलेले असतात की त्यामुळे इमारतीच्या प्रत्येक अवयवाला दुस-याचा आधार मिळून छत बिनधोक राहू शकते. देवालयात शृंगारिक शिल्पे आढळतात.तेव्हा असे मानले जाते कि कलियुगात काय घडणार आहे हे तेव्हाच रेखाटून तेवले आहे .
हे मंदिर सायाद्रीच्या रांगेत आहे .आणि सायाद्रीच्या रांगेत प्रचंड पाऊस पडतो. त्यामुळे मंदिराची झीज होत आहे .मंदिर पर्यटकांन स्थळ म्हणून सरकारने घोषित केले आहे झाडीपट्टी म्हणून ओळखण्यात येणारा अकोले तालुक्यात अनेक निसर्गसौंदर्य आणि पर्यावरणाने नटलेला आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या मंदिर पर्यटनस्थळे निर्माण केल्यास पर्यटकांना याचा आनंद घेता येऊ शकतो. परंतु, स्थानिक लोक.प्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे या पर्यटन क्षेत्रांचा विकास होऊ शकला नाही . पर्यटनस्थळांच्या विकासाची महत्त्वाकांक्षी योजना कागदावरच राहिल्याने नजीकच्या काळात मंदिराची पर्यटनदृष्टीने व्यापक विकास होण्याची शक्यता धूसर बनली आहे.मंदिराची झीज रोखण्याचा प्रयत्न गावकरी गाव वर्गणीतून करत आहे ,परंतु तो पुरेसा नाही .पर्यटनस्थळाचा विकास करून मंदिर पडण्यापासून वाचवावा हीच सरकारकडू आशा !!!!!
ReplyForward
|
No comments:
Post a Comment