वाटेत कुठे-कुठे पिवळ्या फ़ुलांचे गालीचे होते तर कुठे हिरवीगार भाताची शेत डोलत होती. क्लीकत क्लीकत चाललो होतो.
हिरवी शेते
पहील्या टेकाडावरुन - विहीर गाव
नेहमीप्रमाणे माननीय श्री. आनंद पाळंदे यांचे "डोंगरयात्रा" पुस्तक बरोबर होतेच. त्यात म्ह्टल्याप्रमाणे विहीर गावातुन कुंजरगडावर दिड तासात पोहोचता येते. पण प्रत्यक्षात आम्हाला पावणे तीन तास लागले. मी म्ह्टलं त्यांनी कुंजरगडावरुन विहीर गावात ऊतरायला दिड तास म्ह्ट्लं असेल आपल्याला चढुन जायचं असल्याने थोडा जास्त वेळ लागला. पण तरीही एवढा फ़रक पडत नाही कधी आनंद पाळंदे यांनी दिलेल्या वेळेमध्ये आणि आपल्या वेळेमध्ये. काहीही असो पण पुन्हा एकदा वेळेचा अंदाज चुकला होता एवढ मात्र खरं.
दुस-या टेकाडावर
दुस-या टेकाडावरुन विहीर गाव
वाटेतील हनुमान मंदिर
दाट झाडीतुन जाणारी वाट
साधारण ३.०० च्या सुमारास कुंजरगडाच्या माथ्यावर पोहोचलो. माथ्यावर विशेष काहीही नाही. पुस्तकात म्हट्लं आहे "माथ्याच्या डावीकडे गेल्यावर एकमेव टाके आहे" पण प्रत्यक्षात आम्हाला तीन टाकी दिसली ("डोंगरयात्रा"चा आणखी एक धक्का) असो.
कणीस ?
कणसाचे दाणे (झुम)
गवत
शेवट्चा चढ
कुंजरगड टॉप
"गडाच्या उत्तर टोकाजवळ एक खोदीव बोगदा आहे, यातुन रांगत आत गेल्यावर कड्यावर उघडणारे दुसरे तोंड आढळते" (इती "डोंगरयात्रा"). जाऊन पाहिले खरच एक खोदीव बोगदा आहे पण रांगत जाणे कठीण वाट्ले शिवाय आतमध्ये पाणी साठ्ले होते आणि पुढे वाकुन पाहिले तर बुजवल्यासारखे वाटले त्यामुळे रांगत जाऊन कड्यावर उघडणारे दुसरे तोंड बघायचा मोह आम्ही आवरला.
बोगदा
मी आणि गिरीष
तिथेच एका टाक्यापाशी खाऊन घेतलं टाक्यातल गार पाणी पिऊन त्रुप्त झालो आणि निघालो. ऊतरत असताना वाटेत पुन्हा त्या मामाचा फ़ोन आला बराच वेळ झाला कुठे आहात? म्हटलं येतोच अर्ध्या तासात. साधारण साडेपाच वाजता पुन्हा विहीर गावात आलो. येतानाच आज आपला कलाडगड काही होणार नाही तेव्हा ऊद्या तीन गड करण्यापेक्षा कलाडगड ड्रॊप करुन आज भैरवगडावर जाऊन राहु असं ठरलं.
मामाकडे चहा घेतला. भैरवगडाच्या पायथ्याशी असणा-या शिरपुंजे गावचा रस्ता विचारुन घेतला. मामाच्या म्हणण्याप्रमाणे शिरपुंजे गाव २०-२५ कि.मी. म्हणजे अगदी खराब रस्ता धरला तरी एक तास. म्ह्टलं ६.३० पर्यंत पोहोचू पण कसलं काय विहीर गावातुन राजुरला यायलाच पाऊण तास गेला. त्यात गाडीच्या पेट्रोलच्या ईंडीकेटरचा काटा एकदम रिझर्वच्या खाली गेला. शिरपुंजे गाव पुढे वीस कि.मी. होतच. म्ह्ट्ल पेट्रोलच लफ़ड व्हायला नको म्हणुन राजुरला पेट्रोल भरायला गेलो तर ४५० च पेट्रोल भरुन होतय तर टाकी ओव्हरफ़्लो. म्हणजे पेट्रोलच्या काट्यात काहीतरी गडबड झाली होती (नवा साक्षात्कार). राजुरला चहा-वडापाव खाऊन शिरपुंजे गावात पोहोचायला ८.०० वाजले. गावातल्या लोकांनी आता ईतक्या ऊशिरा तुम्हाला गडावर घेऊन जायला कोणी माणुस मिळणार नाही तेव्हा जवळच एक आश्रमशाळा आहे तिथे तुमची झोपायची सोय होईल तिथे जा मग सकाळीच ऊठुन गडावर जा म्हणुन सांगितले. आम्हीसुध्दा मग जास्त अघोरीपणा न करता आश्रमशाळेत गेलो कारण नाही म्हट्ल तरी सकाळपासुन जवळ जवळ ९-१० तास बाईक चालवुन आणि कुंजरगड सर करुन तंगड्या गळ्यात यायला लागल्या होत्या.
आश्रमशाळेत मात्र आमची खरोखरच चांगली सोय झाली. आश्रमशाळेतील प्रबंधक आणि हेडमास्तर यांनी हसतमुखाने आमचे स्वागत केलं आणि तुमची झोपायची सोय होईल म्हणुन सांगितलं. कधी नव्हे ते ट्रेकला गादी-ऊशी मिळाली हो झोपायला.
पहाटे ६.३० ला ऊठलो, आश्रमशाळेतील प्रबंधकांनी आमच्यासाठी चहा करुन ठेवला होता. चहा पिऊन, आवरुन ७.०० वा. निघालो.
शिरपुंजे आश्रमशाळा
भैरवगड
भैरवगडावरील मंदिर
आश्रमशाळेतील ५-६ मुलं देखील आमच्या बरोबर यायला तयार झाली, त्यामुळे वाट शोधायचा प्रश्ण नव्हता.
खेकडा
भैरवच्या वाटेवर
१ तासात भैरवगडाच्या माथ्यावर पोहोचलो. वाटेत काही ठिकाणी खडकात खोदलेल्या पाय-य़ा आहेत.
पाण्याची टाकी
माझ्या हातातील कॉमेरा पहाताच याने अशी छान पोझ दिली.
त्यावरुन येत असताना ठिकठिकाणी दुर्वांच्या जुड्या पडलेल्या दिसल्या. माथ्यावर एका कड्याच्या टोकावर भैरवनाथांची गुहा आहे. त्यात भैरवनाथांचा अश्वारुढ पुतळा आहे.
कड्याच्या टोकावरील भैरवनाथांचे मंदिर
कड्यावरुन दिसणारी आश्रमशाळा
भैरवनाथांचा अश्वारुढ पुतळा
दर्शन घेऊन बाहेर आलो तर एक अवघी दीड महिन्याची चिमुरडी आपल्या आईबरोबर तिथे आली होती. एवढ्या लहान मुलीला वरती कशाला घेऊन आलात म्हणुन विचारले तर नवस फ़ेडायला आलो आहोत असे त्या माऊलीने सांगितले. आपल्या मनातील नवस बोलायचा आणि जवळची दुर्वांची जुडी भैरवनाथांच्या डोक्यावर ठेवायची, जुडी खाली पडली तर नवस पुर्ण होणार. आणि नवस पुर्ण करण्यासाठी अश्वारुढ पुतळयाच्या दोन पायांच्या मधुन मुलाला किंवा मुलीला पलीकडे द्यायचे अशी काहीतरी प्रथा आहे म्हणे. म्हणजे आपण बारश्याच्या वेळेला पाळ्ण्याखालुन बाळांना देतो त्याच टाईपचं काहितरी. माऊलीची परमीशन घेऊन त्या चिमुरडीचा फ़ोटो काढला.
विरगळ किंवा सतीचे दगड
आजुबाजुचा आसमंत न्याहाळला आणि निघालो.
साधारण ९.१५ च्या सुमारास पुन्हा आश्रमशाळेत आलो. प्रबंधक आणि हेडमास्तर यांचा निरोप घेतला आणि बाईकला किक मारली. पुन्हा १० च्या सुमारास राजुरला आलो. तिथे एका टपरीवर वडा-पाव, चहा घेतला आणि पाबरगडावर जाण्यासाठी घोटी रस्त्यावर असलेल्या गुहिरे गावात आलो.
गुहिरे गावातुन पाबरगड
बाईक एका घरापाशी लावली, वाट विचारुन घेतली आणि ११.०० ला निघालो. १२.३० ला पाबरगडाच्या माथ्यावर पोहोचलो.
वरती विशेष काही नाही पाण्याच टांक आणि माजलेलं रान बस्स. ऊन मात्र चांगलच भाजुन काढत होतं.
माथ्यावरुन रतनगड आणि भंडारदरा परिसर
कळसुबाई, अलंग, कुलंग, मदन परिसर
१.३० च्या सुमारास ऊतरायला सुरुवात केली आणि ३.०० वा. पुन्हा गुहिरे गावात आलो. चहा प्यायला आणि ठाण्याला यायला निघालो. घोटी-ईगतपुरी-कसारा-शहापुर-ठाणे असा प्रवास करत ६.४० ला ठाण्याला ट्च. विशेष म्हणजे आदल्या दिवशी पेट्रोलचा काटा फुल दाखवत होता तो आम्ही ठाण्याला आलो तरी फुलच. आहे ना आश्चर्य. असो.
अशारितिने दोन दिवसात जवळ जवळ ४५० किमी. बाईक रनींग आणि कुंजरगड, भैरवगड, पाबरगड असे तिन किल्ले सर झाले.
बज्जु गुरुजी
|
No comments:
Post a Comment