Tuesday, March 17, 2020

सांधण व्हॅली नावाच्या या शिल्प कृतीची लांबी १ किलोमीटर व खोली आहे तब्ब्ल ४०० ते ५०० फूट ....

अकोले (शांताराम काळे )काय पाहायचं कुठे भटकायचं वेगळं काय असे प्रश्न अनेकदा पडतात मग आपण त्याच त्याच वर्षनुवर्षे एऐकत आलेल्या नावांपैकी कोणत्या तरी एका नावावर शिक्का मोर्तब करतो आणि मोकळे होतो . प्राचीन तत्वाच्या खुणा गावागावच्या अंगाखांद्यावर खेळताना दिसतात महाराष्ट्र म्हणजे राकट , कणखर  दगडांचा देश म्हणूनच तर केवळ या महाराष्ट्राच्या फक्त निसर्गानेच उसंत घेऊन कोरलेले अनोखे राकट निसर्गशिल्प पाहायला मिळत सांधण व्हॅली नावाच्या या शिल्प कृतीची लांबी १ किलोमीटर व खोली आहे तब्ब्ल ४००  ते ५०० फूट .... 
सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात भटकताना निसर्गाची इतकी विसम्यकारक रूपं नजरेस पडतात कि , निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ शिल्पकार आहे याची खात्री पटते त्याचे काम नाजूक कलाकुसरीचे नसते जे काही असते ते सारे भव्यदिव्य त्याची छन्नी -हातोडे असतात पंच महाभूते , लाखो - हजार वर्षे तो उंन वारा पावसाचे तडाखे येथील कातळावर , डोंगरदर्यावर पठारावर करत असतो हे तडाखे वर्षा नुवर्षे झेलल्यावर आकाराला येतात त्या नानाविध रचना , कधी कोकणकड्याच्या रौद्र रूप तर कधी साहसाला साद घालणारे सुळके , तर कधी रंजन खळगे एक ना दोन हजारो कलाकृती येथे साकारल्या गेल्या आहेत आणि आजही घडत आहेत निसर्गाची हि अशी अदभते पाहायची असेल तर मात्र थोडी वाकडी वाट करण्यावाचून पर्याय नसतो म्हणजे असे असते कि , त्याची हि शिल्पकला घडतेच मुली डोंगर कोपऱ्यात असेच अनोखे निसर्ग शिल्प आपल्या सह्याद्रीत दडले आहे ते तुम्हाला असे एखाद्या डोंगरकड्याकडे लांबून पाहावे तसे पाहताच येत नाही भंडारदरा धरणाच्या फुगवट्याच्या बाजूने तुम्ही पोहचता ते डोंगरांनी वेढलेल्या एका छोटया सहा गावात साम्रदमध्ये इनमीम शंभरेक घराचे हे गाव एकीकडे रतनगड , लांबवर सह्याद्रीतील अतिशय कठीण अशी कळसूबाईची डोंगररांग त्यातून थेट लक्ष वेधून घेणारे  अलंग कुलंग मदन सारखे अभेद्य किल्ले चौकडे जंगल , साम्रद गावी आल्यावर देखीळ आपल्याला काहीच दिसत नाही भलेमोठे पठार मात्र आपल्याला तंबू  देण्याचा मोह आवरत नाही . मात्र हे सगळे मोह बाजूला सारून थेट  पठाराच्या टोकाकडे निघायचे   सोबतीला गावकरी असेल तर उत्तमच येथेच एक गॉर्ज आपली वाट पाहत असतो थोडासा चढ चढ्यानंतर त्या गॉर्जच्या   मुखाशी आपण पोहचतो तो काहीसा झाडांनी व्यापलेला असल्याने आपण काही काळ गोंधळतो परंतु ५ मिनिटानंतर थोडेसे  खाली उतरले कि, समोर  येते ती सांधण दरी ... केवळ पंचवीस फूट रुंद अश्या त्या गॉर्जच्या प्रथम दर्शनीच आपण प्रेमात  पडतो त्याचे राकट स्वरूपच भुरळ घालते  आपण आपसूकच पुढे जात राहतो    मात्र  जपून पावले टाकावी लागतात कर काही मोठे मोठे दगड धोंडे शिळा पडलेल्या असतात एव्हाना बऱ्यापैकी आत गेलेले असतो नजर उंचावून पहिली कि , लक्षात येते आपण थेट  मधोमध डोंगराच्या पोटात  गेलेले असतो   मोतीच्या मोठी भेग दिसते ५०० फूट खोल ३० फूट रुंद कधी २० फूट तर सुमारे सवा किलोमीटर लांब हीच ती सांधण व्हॅली गॉर्ज एक निसर्गनिर्मित राकट अदभूत मध्येच अरुंद ठिकाणी डोकवणारी उन्हाची तिरीप तर मोठं मोठ्या खड्ड्यात साचलेले थंड पाणी अंगावर ऊन घेत पायात दगडधोंडे तुडवत प्रवास सुरूच ठेव्याचा एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 कि.मी लांबवर पसरलेली आहे.पावसळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते.कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळत.त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा.दरीतील ऊन-सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो.दरीत गेल्यावर दोन पाण्याचे पुल लागतात.पहिला पुल २-४ फुट अन दुसरा पुल ४-६ फुट पाण्यात असतो.हिवाळ्यात पण जाऊ शकतो पण पाण्याची पातळी तेव्हा थोडी जास्त असु शकते.तिथेपोचण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या काठानेसाम्रद या गावी जावे लागते. पुण्यावरुन पोचण्यासाठी आळेफाटा-संगमनेर-अकोले-राजूर-शेंडी (भंडारदरा)-उडदावणे-साम्रद असा रस्ता आहे. मुंबईकरांसाठीकल्याण-कसारा घाट-इगतपुरी-घोटी मार्गे शेंडीला पोचता येते. नाशिकहूनहीघोटीमार्गे पोचता येईल. मुखाजवळच उजव्या हाताला पाणवठा आहे. नैसर्गिकपणे डोंगरातून झिरपणारे थंडगार नितळ पाणी. माणसे आणि जनावरांसाठी दगड रचून वेगळी सोय केलेली दिसते.अतिशय अरुंद घळ, कधी आठ-दहा फूट तर कधी अगदीच जेमतेम एक माणूस जाईल एवढी तीन फूट रुंदी आणि दोन्ही बाजूंना अंगावर येणारा दगडी कमीतकमी दोनशे आणि जास्तीत जास्त चारशे फूट उंचीचा पाषाणकडा आहे. त्याच घळीतून खाली उतरत अगदी शेवटच्या मुखाशी जाता येते। अंदाजे घळीची लांबी एक किलोमीटर आहे। त्यानंतर समोर जो काही विराट कोकणकड्याचा भाग दिसतो त्यासमोर आपले आयुष्यच एकदम क:पदार्थ आहे असे वाटू लागते। एकदम हजार-दीडहजार फुटांचा ड्रॉप आणि समोर करुळ घाटाचा कडा आहे सांधण घळीत पावसाळ्यात काही ठिकाणी बरेच पाणी भरते त्यामुळे त्या जागा थोड्या जपूनच दोराच्या आधाराने पार कराव्यात.मुक्कामाची आणि जेवणाची सोय साम्रद गावात होऊ शकते सांदण दरीच्या शेवटच्या टोकाजवळ प्रचंड खोल कडा आहे. तो कडा अर्धगोलाकार आहे. तेथे पावसाळ्यात कधी कधी अचानक ढग किंवा गहिरे धुके दाटून येते आणि चार-पाच फूटांवरील दृश्‍यदेखील दिसेनासे होते. त्‍या परिस्थितीत पाय घसरून दरीत पडण्याची भीती वाटते. त्‍या दिवसांत तेथे पाण्याचा प्रवाह वेगाने वाहत असतो. ती दरी कोरड्या ऋतूत पाहणे इष्‍ट. तेथे राहण्याची कोठलीही सुविधा नाही. जाताना खाण्‍याचे सामान आणि पाणी सोबत घेऊन जावे लागते.
पावसाळ्यात कड्यावरून दिसणारे दृश्‍य नयनरम्‍य असते. तेथे कड्याच्‍या एका बाजूने वाहणारा गीरनी/गीरना धबधबा दृष्‍टीस पडतो. त्‍या कड्यावर उभे राहून मोठ्याने बोलल्‍यास आवाजाचा प्रतिध्वनी निर्माण होतो आणि काही वेळाने स्‍वतःचाच आवाज ऐकू येतो. अशा प्रकारे ‘एको साउंड’ची मजा अनुभवता येते. दरी बघून त्याच मार्गाने परत यावे लागते. संपूर्ण दरी फिरण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात.
सांदण दरीमध्‍ये एअरटेल कंपनीने ‘फोर जी’ची जाहिरात चित्रित केली होती. सांदण दरीत भर पावसाळ्यात जाणे सुचवण्‍याजोगे नाही.
नाशिक ते सांदण दरी हे अंतर ऐंशी ते पंच्‍याऐंशी किलोमीटर आहे. दरी भंडारद-यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. त्‍या रस्त्याने जाताना कळसुबाई, अलंग, मलंग, मदन, कुलंग, रतनगड, हरिश्चंद्रगड अशा उंचच उंच, एकापेक्षा एक सरस डोंगररांगा दिसतात. सांदण दरीचा परिसर कळसुबाई आणि हरीश्चंद्रगड अभयारण्याचा आहे.







No comments:

Post a Comment