राजूर (वार्ताहर )आदिवासी विभागासाठी २०१२-२०१३ या आर्थिक वर्षात ४५२६.६७ कोटीची तरतूद करण्यात आली असून यापैकी ७५ टक्के रक्कम डिसेंबर अखेर खर्ची टाकण्यचा निर्णय जिल्हधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत झाला आहे असे प्रतिपादन आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तुकाराम पिचड यांनी केले आहे .१७४१२चे.किलो मिटर क्षेत्रफ़ल असलेला अहमदनगर जिल्हा असून लोकसंख्या ४०.८९ लक्ष पैकी ३.०३लक्ष आदिवासी लोकसंख्या आहे .त्यात अकोले तालुक्याची आदिवासी लोकसंख्या १.२२लक्ष इतकी आहे .जिल्ह्यात प्रामुख्यानी महादेव कोळी ,ठकार ,भिल्ल .पारधी ह्या आदिवासी जाती आहेंत ,आदिवासी उपयोजना क्षेत्रात १२३ गावे माडा क्षेत्रात ८तर मिनी माडा २५ गावे आहेंत .आदिवासी उपयोजना अंतर्गत सन २०११-१२या वित्तीय वर्षात मार्च अखेर टीएसपी २५४६ लक्ष व ओटीएसपी १४९५.५३लक्ष असा एकूण सरासरी ९६ टक्के खर्च झाला आहे तसेच सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात टीएसपी अंतर्गत २९९४.४७लक्ष व ओटीएसपी अंतर्गत १५३२.२०लक्ष तरतूद उपलब्ध असून सर्व विभागांना माहे डिसेंबर २०१२ अखेर ७५टक्के खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेंत असेही प्रकल्प अधिकारी तुकाराम पिचड यांनी सांगितले ..राजूर प्रकल्पा अंतर्गत २५ शासकीय १५ अनुदानित आश्रम शाळा व २१आदिवासी मुलामुलीचे शासकीय वस्तीग्रह कार्यरत असून आज सध्यस्थितीत आश्रम शाळांमध्ये १३४८९ विधार्थी तर वस्तीग्र्हमध्ये १७३७मुले मुली शिक्षण घेत आहे . आदिवासी समाजासाठी विकेस २७५ (१)नुकलीयस बजेट योजनेंतर्गत विविध योजना राबवण्यात येतात ,तसेच तेलपंप व एचडी पीई पाईप पूरवठ योजना राबवण्यात येत असून त्यमुळे आदिवासी समाजाचा आर्थिक स्थर उंचावत आहे.तसेच पारधी सामाज्यासाठी विशेस आराखडा असून त्यात प्रमुख्य्नी घरकुल योजना राबवण्यात येत असून स्वाभिमान सबलीकरण योजनेंतर्गत जमिनीचीही त्यांना वाटप करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे शासनाने आदिवासी मुला मुलांसाठी इंग्रजी माध्यम आश्रमशाळा सुरु केल्या असून तसेच नामाकीत पब्लिक स्कूल मध्ये आदिवासी विधार्थ्यंसाठी सोय केली आहे त्यांचेवर शासन १००टक्के खर्च सदर संस्थाना देत आहे .आदिवासी विधार्थ्यांसाठी १०वि नंतर महा विधालय ,तंत्रशिक्षण ,कृषी अभियांत्रिकी ,वैद्यकीय शिक्षणासाठी शिष्य वृत्ती योजना चालू आहे .आदिवासी वाड्या पाड्यातील ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत रस्ते ,समाजमंदिरे बाधण्यात येत आहेंत .त्याच प्रमाणे आदिवासी कुटुंबाना ग्यास ,महिला बचत गटांना रुपये १०,००० पर्यत आर्थिक सहाय्य देण्यात येते त्याच प्रमाणे ग्रेड ३व ४ बालकांचे पालकांना बुडीत मजुरी देण्याची योजनाही राबविण्यात येते .सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात नुक्लीयस बजेट अंतर्गत अनुक्रमे संगणक प्रशिक्षण ,वाहनचालक ,ताडपत्री पुरवठा ,शिवण यंत्र पुरवणे ,शेती अवजारे पुरविणे ,टिन पन्हाळी पत्रे पुरवठा करणे ,वैध्कीय अभियान्त्र्की परिक्षा पूर्व प्रशिक्षण देणे इ .योजना प्रस्थवित आहेंत .तर क्वश्य्ल्य विकास अंतर्गत अकुशल लाभार्थ्यंचे कव्श्य्ल्य विकशित करण्याच्या दृष्टीकोनातून विविध प्रकारचे प्रशिक्षण ,मोबाईल रिपेरिंग ,वीज तंत्र ,गवंडी काम ,वेल्डिंग ,कार पेंटर ,रंगारी काम,लोहारकाम ,कलाकुसरीचे दागिने तयार करणे ,पॉली हाउस मधील शेती करण्याचे प्रशिक्षण ,शेत तळ्यातील मत्स्य व्यवसाय ,बंधीस्थ शेळी पालन ,रोपवाटिका तयार करणे ,मार्केटिंग ,इत्यदी असे ६० विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे प्रस्थ्वीत असून त्याचप्रमाणे विकेस अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचन ,विहिरीत बोर घेणे ,परसबाग लागवड ,टूब वेल बसविणे ,किचन गार्डन आणि स्ट्रोब री नर्सरी उभारणे ,गांडूळ व सेंद्रिय खत तयार करण्याचे प्रशिक्षण ,दर्जेदार फाल्भाजीपाल्यासाठी शेड नेटची उभारणी करणे अशा विविध प्रकारच्या योजना प्रस्थ्वीत असून या कामासाठी शासन ,आदिवासी विकास मंत्री ,आमदार मधुकरराव पिचड यांचे मार्गदर्शन मिळते असे हि प्रकल्प अधिकारी तुकाराम पिचड म्हणाले
No comments:
Post a Comment