Monday, December 8, 2025

अकोले एस टी आगार उर्जित अवस्थेत

अकोले,ता.९: अकोले एस .टि.आगार आता तोट्याला झुगारत ऊर्जा घेऊन नफ्यात अवतरले असून स्वच्छता ,पारदर्शक कारभार,वृक्ष लागवड करत आगारप्रमुख कर्मचारी वर्ग याची एकी आगाराबद्दल आत्मीयता ,तळमळ यातूनच बसस्थानकाचा चेहरा मोहरा बदलला आहे . हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान अंतर्गत अकोले बस स्थानकाचे आत्तापर्यंत तीन वेळा परीक्षण करण्यात आले आहे. पहिल्या परीक्षेमध्ये अकोले आगारास शंभर पैकी ९४ मिळाले तर दुसऱ्या परीक्षेमध्ये शंभर पैकी ९८ गुण मिळाले तिसऱ्या परीक्षणाचे अजून पर्यंत गुण येणे बाकी आहे. परंतु चौथ्या परीक्षांमध्ये अकोले आग्रास शंभर पैकी ९९ गुण मिळतील अशी आशा आगार प्रमुख यांनी एस .के .दराडे यांनी दिली. सध्या अकोली बस स्थानकात ५१ बसेस असून त्यापैकी १०नवीन तर १३ बस स्क्रॅप मध्ये जाणार आहेत. अकोले आगार एकूण कर्मचारी संख्या २५२ असून प्रतिदिन १५ चालकांची कमतरता भासते. अकोले बाजारात नवीन दहा बसेस आलेल्या असून अजूनही नवीन दहा बसेस येणार आहे. ४५०० विद्यार्थी मोफत पास घेऊन प्रवास करत असतात. ६५ वयोगटातील ६१८ज्येष्ठ नागरिक प्रवास करत असतात. ३२०० अमृत वयोगटात मोफत प्रवास करतात.नोव्हेंबर अखेर ५९४३ महिलांनी प्रवास केला आहे . डिसेंबर २०२४ नंतर २७ लाख ७००० इतका नफा झाला आहे. आगार परिसरात नियमितपणे स्वच्छता राबवण्यात येते. रोजंदारीचे कामगार घेऊन स्वच्छता राबवण्यात येते. परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम ही घेण्यात येतो. अकोले तालुक्यात ग्रामीण भागामध्ये १३ बसेस मुक्कामी असतात. परंतु बलठण या गावी गावात जाण्याच्या अडचण असते. त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्येच गाडी लावावी लागते. अकोले आगारात १४ महिला कर्मचारी असून पैकी एक चालक आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अकोले आगारास अजून सत्तर गाडी असणे अपेक्षित आहे. सध्या शाळांच्या वेळा बदलल्या असल्याकारणाने सर्वांना चार वाजता बस देण्यात अडथळे निर्माण होत आहे. या काही दिवसात अकोले बस स्थानकात डिझेल अभावी कोणतीही वाहन उभे राहिलेले नाही. राजूर येथे नवीन बस स्थानक नियोजित आहे. अकोला येथून रोज १३ गाड्या कासार येथे जातात . तर १३बस पुणे येथे सोडण्यात येतात. संभाजीनगर व नाशिक दोन बसेस सोडण्यात येतात. सध्या शैक्षणिक सहलींचे माध्यमातून ३५ लाख रुपये उत्पन्न अकोले एस टी डेपोस मिळाले आहे. चौकट - अकोले ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस कायम बंद पडतात त्यामुळे आदिवासी भागात प्रवास करणाऱ्या आदिवासी ग्रामस्थ ,विध्यार्थी ,रुग्ण,महिला,जेष्ट नागरिक यांचे मात्र हाल होतात तर शाळांना सहलीसाठी देण्यात येणाऱ्या बसेस उशीर झाल्यास १००किलोमीटर चे भाडे आकारले जाते ते शाळांना व विधार्थयाना न परवडणारे असल्याने या जाचक अटी व जीआर रद्द करावा अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे .तर महिलांना अर्धे तिकीट असल्याने उत्पन्न तेच मात्र प्रवासी यांची संख्या अधिक झाली आहे . कोट - अकोले एस टी आगार उर्जित अवस्थेत असून माझ्यासोबत कर्मचारी यांची साथ असल्याने आम्ही सर्वजण स्वच्छता ,रंगरंगोटी स्वतःच्या उत्पपन्नातून करत आहोत .माझा कर्मचारी नियमित कामावर येत असल्याने सर्व बसेस वेळेवर सुटतात तर प्रवासाची कोणतीही तक्रार नाही अकोले बसस्थनकाप्रमाणे राजूर बसस्थानक भव्य व चकाचक होणार असून त्यासाठी १८कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे . बस्स्थसनकाच्या बाहेर खाजगी जीप असतात व मोटारसायकली देखील गर्दी करतात याबाबत दखल घेऊन निर्णय घेणार आहोत अकोले येथे १०मिनीबस येणार असून आदिवासी भागासाठी राजूर येथे ५मिनीबस देणार आहोत तयामुळे ग्रामीण भागातील प्रवासी विध्यार्थी जेष्ठ नागरिक यांचे हाल होणार नाही एस के दराडे (आगार व्यवस्थापक अकोले डेपो)

No comments:

Post a Comment