Saturday, December 6, 2025

नागरी समस्या

अकोले शहरातील नागरी समस्या : अकोले,ता.६: वाढती आणि स्थिरावलेली बेसुमार अतिक्रमणे ही महत्त्वाची समस्या आहे . मुख्य बाजारपेठेसह जुन्या गल्ल्या तसेच रस्त्यांवरील नागरी आणि दुकानदारी स्वरुपातील अतिक्रमणांच्या विळख्यात अकोले गाव सापडले आहे . कोल्हार घोटी या प्रमुख वाहतूकीच्या रोडवरदेखील छोटेमोठे दुकानदार , फेरीवाले आणि हातगाडीवाले यांनी बिनदिक्कत अतिक्रमणे थाटली आहेत . दुचाकी, चारचाकी वाहनांना कोणतीही पार्किंगची शिस्त नाही. रस्त्याने पायी चालणे मुश्कील . तर स्वातंत्र्य संग्रामात भाग घेणाऱ्या, जुलमी तहसीलदार यांना जाळणाऱ्या मुख्य आरोपी सेनानी गणेश जोशी यांचे समूर्ति स्मारक पडीक असून याकडे लक्ष देण्यास स्थानिक प्रशासनास वेळ नाही ,जुन्या आठवणींना उजाळा देणारी स्मारके धूळखात पडून आहेत . महात्मा फुले चौक ते अकोले अगस्ती महाविद्यालय या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरुन दुसऱ्या बाजूच्या पलीकडे रस्ता ओलांडून जाणे अक्षरशः जीवावर बेतण्यासारखी भीषण वास्तव आहे . त्यातच साखर कारखान्याकडे जाणाऱ्या बैलगाड्यांना नियंत्रण नसल्याने वेगात जाणाऱ्या या गाड्यांमुळे हमखास अपघाताची शक्यता आहे. पुरातन शनी हनुमान मंदिर परिसरातील पारंपरिक ओढ्यातील मोकळ्या जागेत प्रतिष्ठित म्हणून मिरवणाऱ्या खोट्या समाजसुधारकांच्या इमारतींनी सार्वजनिक जागा हडप केलेल्या आहेत ! पुरातन गढीवरील छोट्या अगस्ती पुलाकडे जाणाऱ्या जुन्या सरकारी दवाखान्याची पडकी जागा, आगर गल्ली कमान वेस परिसरातील जुनी मुलींची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पडकी जागा, जी स्वातंत्र्य संग्रामात तसेच जुना अत्याचारी मामलेदार जाळल्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेले तत्कालीन सेनानी गणेश जगन्नाथ जोशी यांची स्मृती आहे ती मोडकळीस आलेली जागा मोठा यक्षप्रश्न आहे ! यासंदर्भात अधिक माहिती देताना साहित्यिक, संशोधक डॉ. सुनील शिंदे म्हणाले, " जुन्या मुलींच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जागेला सक्षम सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक संपन्न वारसा आहे, विख्यात प्रादेशिक कादंबरीकार कै. गो. नी. दांडेकर या परिसरात रहिवासले. स्वातंत्र्य सेनानी गणेश जगन्नाथ जोशी बाबा यांचे हे स्मृती स्थळ आता मोडकळीस आलेले अन् अक्षरशः झाडोरा उकीरडा बनला आहे , येथील जागेत नगरपंचायत प्रशासनाने गणेश जोशी तसेच गोपाल नीलकंठ दांडेकर यांचे नावे वाचनालय स्मृती स्थळ म्हणून निर्माण करणे शहाणपणाचे ठरेल . मुळात जुनी ग्रामपंचायत आणि विद्यमान नगरपंचायतने पूर्वीचे ७०-८० वर्षांपूर्वी असलेले समृद्ध वाचनालयच बंद केले ही मोठी शोकांतिका आणि सांस्कृतिक अपमान आहे ! " नगरपंचायत परिसरातील गढी असलेल्या जागेतील जुन्या शासकीय भूखंडावरील जागेत अथवा सुस्थितीतल्या सार्वजनिक जागी वरिष्ठ नागरिकांसाठी तसेच लहान मुलांकरिता ' नानानानी पार्क ' च्या धर्तीवर बगिचा विश्रांती स्थान नगरपंचायत करु शकते ! सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपंचायत कडून प्राधान्याने अतिक्रमण असणाऱ्या जागा तसेच मुख्य कोल्हार घोटी राजमार्गावरील अतिक्रमित जागा, वाहनांची पार्किंग याबाबत कार्यवाही करणे आवश्यक . "कोट - गणेश जोशी यांच्या स्मारकाचे नूतनीकरण करून त्या जागेवर सुसज्ज वाचनालय विध्यार्थी जेष्ठ नागरिक महिला यांच्यासाठी अभ्यासिका मनशांती केंद्राची स्थापना करावी ही नगरपंचायत कडून माफक अपेक्षा प्रा .सुनील शिंदे जेष्ठ अभ्यासक

No comments:

Post a Comment