Tuesday, December 9, 2025
अकोले एसटी आगार नफ्यात स्वच्छता शिस्त अन् कर्मचारी एकजुटीतून ‘विजय’
[ अकोले एसटी आगार नफ्यात स्वच्छता
शिस्त अन् कर्मचारी एकजुटीतून ‘विजय’
अकोले, ता. ९ : एकेकाळी तोट्याच्या कचाट्यात असलेले अकोले एसटी आगार आज नफ्यात झेपावत आहे. आगारातील कर्मचारीवर्गाची आगाराबद्दलची प्रचंड आत्मीयता, स्वच्छतेवरचा भर आणि पारदर्शक कामकाजामुळे बसस्थानकाचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. त्यामुळे अकोले आगार राज्यातील आदर्श आगार म्हणून पुढे येत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
डिसेंबर २०२४ अखेर अकोले आगाराने तब्बल २७ लाख ७० हजारांचा नफा कमावत आश्चर्याचा धक्का दिला आहे. शैक्षणिक सहलींच्या माध्यमातून ३५ लाखांची कमाई झाली. स्वच्छतेसाठी रोजंदारी कामगार, नियमित वृक्षारोपण या उपक्रमांमुळे परिसर हरित व स्वच्छ दिसत आहे. डिझेलअभावी एकही बस बंद पडलेली नाही, ही मोठी सकारात्मक बाब आहे. एकूण २५२ कर्मचारी कार्यरत असून १५ चालकांची कमतरता रोज भासते. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अकोलेला किमान ७० बसेसची आवश्यकता आहे. अकोले तालुक्यातील आदिवासी बहुल भागात जाणाऱ्या बसेस वारंवार बिघडतात. बलठण गावात तर बस स्मशानभूमीपर्यंतच थांबते, अशी परिस्थिती अजूनही बदलायची आहे. महिलांना अर्धे तिकीट असल्यामुळे प्रवासी संख्या वाढली; मात्र उत्पन्न तेवढे वाढत नसल्याची अडचण निर्माण झाली आहे.
अकोले एसटी आगार ऊर्जिता अवस्थेत असून माझ्यासोबत कर्मचारी यांची साथ असल्याने आम्ही सर्वजण स्वच्छता, रंगरंगोटी स्वतःच्या उत्पन्नातून करत आहोत. माझा कर्मचारी नियमित कामावर येत असल्याने सर्व बसेस वेळेवर सुटतात. प्रवासाची कोणतीही तक्रार नाही. अकोले बसस्थानकाप्रमाणे राजूर बसस्थानक चकाचक होणार आहे. त्यासाठी १८ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. बसस्थानकाच्या बाहेर खासगी जीप असतात. दुचाकी देखील गर्दी करतात याबाबत दखल घेऊन निर्णय घेणार आहोत.
नोव्हेंबर अखेर ५९४३ महिला प्रवासीडिसेंबर २०२४ अखेर अकोले आगाराने तब्बल २७ लाख ७० हजारांचा नफा कमावत आश्चर्याचा धक्का दिला आहे. शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून ३५ लाखांची कमाई झाली. स्वच्छतेसाठी रोजंदारी कामगार, नियमित वृक्षारोपण या उपक्रमांमुळे परिसर हरित व स्वच्छ दिसत आहे. डिझेलअभावी एकही बस बंद पडलेली नाही, ही मोठी सकारात्मक बाब आहे.
अकोले येथे १० मिनीबस येणार आहे. आदिवासी भागासाठी राजूर येथे पाच मिनीबस देणार आहोत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होणार नाही, अशी माहिती आगारप्रमुख एस. के. दराडे यांनी दिली.
चौकट
बसेसची टंचाई कायम
आगारात सध्या ५१ बसेस
• १० नवीन तर
• १३ बस स्क्रॅपमध्ये
चौकट
विद्यार्थी, महिला प्रवाशांमुळे गर्दी
४५०० विद्यार्थी मोफत प्रवास
३२०० अमृत वयोगटातील नागरिक लाभात
• ६१८ ज्येष्ठ नागरिक दररोज प्रवास
---------
जाचक जीआर रद्द करा
शैक्षणिक सहलींसाठी दिलेल्या बसेस उशीर झाल्यास १०० किमीचे अतिरिक्त भाडे आकारले जाते. हे शाळांना व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परवडणारे नसल्याने हा जाचक जीआर रद्द करावा, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.आदिवासी भागात बसेस नेहमी बंद पडतात, त्याचा फटका विद्यार्थी, रुग्ण, महिला व ज्येष्ठ नागरिकांना बसतो. त्यामुळे या मार्गांवरील बसेस दुरुस्ती व नियमित वाहतूक करण्याची मागणीही जोर धरत आहे.
----
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानांतर्गत आगाराचे आतापर्यंत तीन फेऱ्यांत परीक्षण झाले. पहिल्या फेरीत १०० पैकी ९४. दुसऱ्या फेरीत तब्बल ९८ गुण मिळवत आगाराने राज्याचे लक्ष वेधले आहे. तिसऱ्या फेरीचे गुण येणे बाकी असून, चौथ्या फेरीत ९९ गुण मिळवण्याचे लक्ष आहे.
- एस. के. दराडे, आगारप्रमुख, अकोले
-----
[09/12, 5:31 pm] Daultrao Zaware Patil: अकोल्यात तरुणाई व्यसनाच्या विळख्यात
दारू, गुटखा, गांजा अन् ड्रग्सचे सर्वत्र जाळे; प्रशासनाची बघ्याची भूमिका
अकोले, ता. ८ ः तालुक्यात सध्या निवडणुका, राजकारणाच्या हालचाली जोरात सुरू असतानाच तरुणाईच्या भवितव्यावरील सर्वात गंभीर प्रश्नाकडे मात्र सर्वांचे लक्ष दुरावले आहे. रोजगार, शिक्षण या पलीकडे जाऊन आज तरुण जिवंत राहतील की नाही, हा प्रश्न व्यसनमुक्ती अभियानासमोर उभा ठाकला आहे. अकोले तालुक्यात सर्व प्रकारच्या व्यसनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालला आहे.
पूर्वी केवळ दारू हा व्यसनाचा मुख्य मार्ग होता. मात्र आज परिस्थिती भयावह झाली असून दारू, गुटखा, सिगारेट, गांजा आणि अगदी ड्रग्जही ग्रामीण भागापर्यंत पोचले आहेत. मध्यंतरी राजूर येथे ड्रग्ससह गुन्हेगार पकडल्याची घटना चर्चेत होती. अकोले शहरातील नदीकाठावर तर तरुण उघडपणे गांजा ओढत बसलेले दिसतात. महाविद्यालय परिसरातही सर्रास सिगारेट, तंबाखू उपलब्ध असून त्यामागे दलालीचे जाळेही निर्माण झाले आहे. व्यसनातून काही खूनही तालुक्यात घडले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
गुटखाबंदी असूनही किराणा दुकानांमध्ये खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. यामुळे राज्य सरकारच्या बंदीच्या निर्णयाची केवळ कागदी अंमलबजावणी होत असल्याचे दिसते. दारूविक्रीविरोधात काही प्रमाणात गावागावात विरोध दिसतो; परंतु गुटख्याबाबत मात्र समाजातील प्रमुख मंडळीही गप्प दिसत आहेत. परिणामी तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचा आरोग्य विभागाचा इशारा आहे.
संगमनेर, घारगाव, ठाणगाव, शेंडी या मार्गांवरून रोज रात्री दारूच्या गाड्या तालुक्यात दाखल होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. या वाहनांचे क्रमांक, विक्रेत्यांची नावे पोलिस प्रशासनाला वारंवार दिल्यानंतरही कारवाई नगण्य असल्याचा आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. संगमनेरमध्ये पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय असताना देखील ही वाहतूक रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याने दोन्ही विभागांचे हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गावातील सरपंच आणि पोलिस पाटील यांची जबाबदारीही आज प्रश्नचिन्हाखाली आली आहे. ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी प्रयत्न झाले तरी गावकऱ्यांची उदासीनता दिसते. व्यसनमुक्त गाव करण्यासाठी ग्रामपंचायतींनी किराणा दुकानदार व पानटपरी चालकांना नोटीस देत गुटखा विक्री केल्यास शॉप अॅक्ट रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच ज्या बीटअधिकाऱ्यांच्या हद्दीत दारू सापडेल, त्यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
व्यसनांचे वाढते सावट रोखण्यासाठी पोलिसांसह गावपातळीवरील नेतृत्वाने ठोस पावले उचलली नाहीत, तर अकोले तालुक्यातील तरुणाईचे भविष्य अंधारमय होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
--------
कायद्यासोबतच आता प्रबोधनाची भूमिका घेण्याची गरज आहे. तालुक्यातील प्रत्येक ज्युनिअर सीनियर कॉलेजमध्ये व्यसनाच्या बाबतीत प्रबोधन करणारे कार्यक्रम सतत व्हायला हवेत. शाळांच्या स्नेहसंमेलनाचा जिथे प्रबोधनाची संधी आहे. तिथे व्यसनविरोधी बोलले गेले पाहिजे. बचत गटाच्या बैठकांमध्ये सातत्याने व्यसनाचा विषयावर चर्चा व्हावी.
- हेरंब कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment