Monday, December 8, 2025

अकोले शहरात व तालुक्यात व्यसनांचा फास अडकतोय

अकोले,ता.९:(शांताराम काळे)निवडणुका, राजकारण या सगळ्या झटापटी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष दुर्लक्ष होते आहे. ते दुर्लक्ष आहे तरुणाईच्या भवितव्याबद्दल. तरुणांना रोजगार मिळेल की नाही हा मुद्दा अगदी वेगळाच आहे पण तरुण हे तरुण म्हणून राहतील की नाही ? इतकी गंभीर परिस्थिती आज व्यसनांनी अकोले शहरात व तालुक्यात निर्माण केली आहे.... सर्व प्रकारांच्या व्यसनांचा फास अकोले शहर व तालुक्यातील तरुणाई भोवती आणि तालुक्याभोवती आवळला जातो आहे. पूर्वी व्यसन म्हणजे फक्त दारू होती पण आज ग्रामीण भागापर्यंत व्यसन म्हणजे दारू, गुटखा, गांजा आणि ड्रग सुद्धा आले आहेत. मध्यंतरी राजुर येथे ड्रग सापडले ही बातमी होती. अकोल्यातील नदीकाठी तर गांजा पिणारे तरुण नेहमीच बसलेले आढळतात..तितकेच काय कॉलेज परिसरात गांजाच्या पुढे सिगारेट विकल्या जातात.. संगमनेरून ठोक भावाने येतो..त्याचे दलाल निर्माण झाले आहेत..ते महाविद्यालयीन तरुणांभोवती फिरत असतात...तालुक्यात घडलेले काही खून हे व्यसनातून झालेले होते. त्यामुळे आव्हान फक्त दारूचे नाही तर आव्हान हे या सर्व प्रकारच्या प्रश्नांचे आहे.. गुटखाबंदी आहे हे सांगितले तर खरे सुद्धा वाटणार नाही इतका गुटखा सर्रास सर्वत्र मिळतो किराणा दुकानात कोणतीही वस्तू सहजपणे मागितल्यावर मिळावी तसा गुटका आज मिळतो. बंदी असल्याचा फायदा फक्त पोलीस आणि अन्न आणि भेसळ अधिकाऱ्यांना झाला आहे. बाकी तरुणाईचे वाटोळे होत आहे.. दारूबद्दल तरी किमान थोडा फार राग त्या गावात दिसतो पण गुटका आपल्या गावात विकला जातो याबद्दल गावातील प्रमुख व्यक्तींनाही काही वाटत नाही. ते सर्वांनी स्वीकारले आहे अशीच स्थिती आहे पण आज तालुक्यात तोंडाच्या कॅन्सरने मरणाऱ्या तरुणांची संख्या खूप वाढते आहे..पण गुटख्याचे दुष्परिणाम माहीत असूनही कोणताच विरोध दिसत नाही..त्याचप्रमाणे गांजाने ही मरणारी संख्या वाढत असूनही पोलिसांनी गांजा पकडण्याच्या बातम्याही दिसत नाहीत... दारूबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी दारूबाबत तर इतक्या वेळा बोलून झाले की आता ते बोलण्याचाही कंटाळा आला आहे.. तालुक्यातल्या कोणत्या गावात कोण दारू विकतो ही माहिती अनेकदा पोलीस उत्पादन शुल्क यांच्या बैठकीमध्ये यादी करून दिली तरी काहीही फरक पडत नाही.. आंदोलनाची भाषा केल्यानंतर कारवाया होतात पण परत त्याच त्याच गावामध्ये तीच तीच माणसे दारू विकतात. पोलिसांनी उत्पादन शुल्क यांनी ठरवले तरी थांबवणे कठीण आहे का ..? संगमनेर, घारगाव, ठाणगाव आणि शेंडी या चार ठिकाणाहून तालुक्यात रोज रात्री दारूच्या गाड्या येतात. त्या गाड्या जरी पकडल्या तरीसुद्धा गावाकडची दारू थांबणे शक्य आहे त्या गाड्या कोणत्या दुकानातून येतात ? त्या गाडीचे नंबर सुद्धा दिले आहेत पण त्या गाड्या पकडण्याच्या बाबतीत काहीही करत नाही.. संगमनेर येथे पोलीस उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय आहे. संगमनेर येथेच उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे पण महत्त्वाची कार्यालय तिथे असून सुद्धा, त्यांचा मोठा स्टाफ असून सुद्धा संगमनेर मधून रोज रात्री निघणारी दारू ते थांबवत नाहीत. यातच दोन्ही विभागांचे दारू विकणाऱ्यांची असलेले हितसंबंध लक्षात येतात. विभागीय पोलीस विभागीय अधिकारी कुणाल सोनवणे व उत्पादन शुल्क विभागाचे सहस्रबुद्धे यांना अनेकदा संगमनेर मधून येणारी दारू थांबवा हे सांगूनही काहीच फरक पडला नाही. गावोगावी सरपंच आणि पोलीस पाटील यांचीही उदासीनता दारू न थांबण्याला कारणीभूत आहे असेच दुर्दैवाने म्हणावे लागते. अण्णा हजारे यांनी ग्रामरक्षक दलाची कल्पना मांडली त्याप्रमाणे आपण तालुक्यातील ग्रामरक्षक रक्षक दल स्थापन करण्याच्या सूचना देऊन ते स्थापन करावे म्हणून खूप पाठपुरावा करावा लागला पण आज या गावाने ते स्थापन केले आहे ते गावकरी साधे ओळखपत्र न्यायलासुद्धा पोलीस स्टेशनला येत नाही.अनेकदा फोन करून झाले,ग्रामसेवक यांना सूचना देऊन झाले... जिथे ओळखपत्र नेण्यासाठी आग्रह करावा लागतो ते गावकरी काय दारू थांबवणार ? असा प्रश्न पडतो आणि जिथे गाव उदासीन होत जाते तिथे दारू कधीही थांबत नाही... दारू, गुटखा, गांजा या तीनही बाबतीत गावाने जर ठरवले त्या गावांमध्ये कधीही विक्री होऊ शकत नाही. पोलीस उत्पादन शुल्क हे दोषी आहेतच पण गावातील प्रमुख लोक आज वाईटपणा घ्यायला तयार नाहीत.. मीच का वाईटपणा घ्यायचा असे प्रश्न जेव्हा सरपंच आणि पोलीस पाटील विचारतात तेव्हा त्यांना वाईटपणा घ्यायचा नाही, त्यांनी सार्वजनिक पदावर बसू नये असेच त्यांना मला सांगावेसे वाटते. तेव्हा गावातील प्रमुख व्यक्तींनी वाईटपणा घेतला पाहिजे...ग्रामपंचायतने गावातील सर्व किराणा दुकाने व पान टपरी यांना नोटीस देऊन गुटखा विक्री केल्यास तुमचे दुकानाचे शॉप ॲक्ट रद्द केले जाईल असे स्पष्टपणे सांगितले पाहिजे व काही ठिकाणी कारवाई सुद्धा केली पाहिजे .दारू सातत्याने पकडून दिली पाहिजे व ज्या गावात दारू सापडेल तेथील बीट अंमलदार निलंबित करण्यासाठी आग्रह धरला पाहिजे... ज्या बीट आम्हाला यांच्या विभागात दरू सापडेल त्यांच्यावर कारवाई करा अशी सतत मागणी करणे आज यावरील मार्ग आहे.. पोलीस पाटील या पदाला अकोले पोलिसांनी पत्र देऊन तुमच्या गावात सुरू असलेल्या दारूवर तुम्हाला का जबाबदार धरू नये ? अशी विचारणा केली आहे.. कारण पोलीस पाटील त्या गावातील कायद्याचे रक्षक असल्याने त्यांची जबाबदारी मोठी आहे पण ते आक्रमक भूमिका घेत त्यामुळे गावातील दारूबाबत त्यांना जबाबदार करण्याची भूमिका अत्यंत योग्य आहे ... कोट - कायद्यासोबतच आता प्रबोधनाची भूमिका घेण्याची गरज आहे. तालुक्यातील प्रत्येक ज्युनिअर सीनियर कॉलेजमध्ये व्यसनाच्या बाबतीत प्रबोधन करणारे कार्यक्रम सतत व्हायला हवेत .शाळांच्या स्नेहसंमेलनाचा जिथे जिथे प्रबोधनाची संधी आहे. तिथे व्यसनविरोधी बोलले गेले पाहिजे. बचत गटाच्या बैठकांमध्ये सातत्याने व्यसनांचा विषय काढायला हवा व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय स्पर्धेमध्ये दारू वाटणार नाही किंबहुना दारू वाटू देणार नाही दारू विकणाऱ्यांना तिकीट देणार नाही अशीच भूमिका घेण्याची गरज आहे दारूला कोणतेही परिस्थितीत प्रतिष्ठा मिळतात कामा नये... हेरंब कुलकर्णी

No comments:

Post a Comment