Saturday, December 6, 2025

निळवंडे वसाहत सुविधांचा अभाव

अकोले,ता.४: निळवंडे जलाशयाची निर्मिती करताना अगोदर पुनर्वसन मग धरण या संकल्पेतून निळवंडे पॅटर्न संपूर्ण राज्यात गाजला या कामी माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव पिचड यांचे योगदान फार महत्वाचे मात्र खनाला खन,फनाला फन या प्रमाणे निळवंडे धरणग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन करण्यात आले ,ज्यांची घरे पाण्यात गेली त्यांना अकोले शहरात कृषी पणन विभागाची भूखंडावर प्रकल्प वसाहत स्थापन करून प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन केले .मात्र सुविधांचा अभाव नगरपंचायतीच्या उदासीन कारभारामुळे येथे साध्या नागरीसुविधा देखील मिळत नसल्याने स्थानिक रहिवासी यांनी खंत व्यक्त केली आहे ३५वर्षे होऊनही सोयी सुविधा नसल्याने घरपट्टी व पाणी पट्टी का भरावी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. हा वार्ड नंबर तीन असून निळवंडे प्रकल्प स्तरीय वसाहत असून या वसाहतीला कोणत्याही नागरी सुविधा मिळत नसल्याचे स्थानिक रहिवाशी यांचे मत आहे .तर वसाहती शेजारी असणाऱ्या कॉलनीतील यापेक्षा वेगळी अवस्था नाही. आरोग्य,शिक्षण,नावखाली कर आकारला जातो मात्र हा कर जातो कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे . वार्ड तीन मध्ये १६००लोक राहतात यापूर्वी स्थानिकांनी नगरपंचायत वर मोर्चा काढला होता मात्र नगरसेवक पतीने पावसाळ्यानंतर सर्व कामे होतील असे आश्वासन देऊनही दोन महिने उलटूनही कोणत्याही नगरसेवक अथवा अधिकारी पदाधिकारी यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही .वसाहतीच्या रस्त्यावर तुंबलेल्या गटारीतील दुर्गंन्धयुक्त पाणी आल्याने त्यातून डास व सरपटणारे प्राणी बाहेर पडत असल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले आहे .निळवंडे जलाशयात विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना अकोले शहरात मोक्याच्या ठिकाणी भूखंड देऊन त्यांचे आदर्श पुनर्वसन करण्याचा शासनाचा बहुउद्देशीय प्रकल्प आज मात्र अडचणीत सापडला आहे .प्लॅन काढताना अंतर्गत रस्ते,गटारी,गार्डन यासाठी जागा सोडण्यात आली मात्र त्यावर कोणतीही सुविधा योग्य पद्धतीने दिली नसल्याने येथील रहिवासी यांची मोठी अडचण होत आहे .वसाहतीत बहू उद्देशीय हॉल देण्यात आला त्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून तत्कालीन आदिवासी विकास मंत्रीमधुकरराव पिचड यानी मोठा निधी दिला असून भव्य इमारत उभारण्यात आली मात्र आज ही इमारत झाडा झुडपात अडकली आहे .चारही बाजूने झाडे काँग्रेस गवत गटारीचे तुंबलेले पाणी त्यामुळे परिसरात डासांचे साम्राज्य असून या इमारतीत वारकरी संस्थेचे १३विध्यार्थी राहतात मात्र त्यांचे आरोग्य देखील धोक्यात आल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दिसून आले .पावसाळ्यात पावसाचे मोठ्या प्रमाणात गाळ मिश्रीत पाणी रहिवासी यांच्या घरात घुसते तर कधी गुढगाभर पाण्यातून तर कधी जाणेच मुश्किल होत असल्याने रहिवासी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असल्याचे स्थानिकांनी दैनिक सकाळ प्रतिनिधींशी बोलताना सांगितले अकोले शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून भूखंडचे भाव देखील गगनाला भिडले आहे ,तर काहींनी ९९वर्षाच्या करारावर जागा घेऊन भव्य इमारती बांधून आपले व्यवसाय सुरू केले आहेत ,। कोट - निळवंडे जलाशयात विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना आदर्श पुनर्वसन नावाखाली अकोले कृषी पणन महामंडळाची जागा देऊन तिथे वसाहत स्थापन करण्यात आली मात्र या वसाहतीतील नागरिकांना नागरी सुविधा मिळत नसल्याने मोठे हाल होत आहे .आपण याबाबत नगरपंचायत ला वेळोवेळी कळवूनही ते याबाबीकडे दुर्लक्ष्य करत आहे ,त्यामुळे आपण लवकरच नगरपंचायत समोर उपोषण करणार असून त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल मोठा निधी येऊनही रस्ते गटारी,नाले करण्याची मानसिकता नगरपंचायत पदाधिकारी व नगरसेवकांची दिसत नाही याबाबत लवकरच आपण आवाज उठविणार असून नगरविकास मंत्री यांना निवेदन पाठवले आहे . भाऊसाहेब आभाळे (धरणग्रस्त शेतकरी व नागरिक ) कोट - निळवंडे वसाहतीचा गटारीचा ले औट नसल्याने गटारीचे पाणी सोडायचे कुठे असा यक्ष प्रश्न असून मागील वर्षात गटारीसाठी आलेले एक कोटी रुपये परत गेले असून ले औट क्लेयर झाल्यास अंतर्गत गटारीचे कामे करता येईल तर गटारी मुले रस्ते करणेही अडचणीचे ठरत आहे .लवकरच याबाबत नगरपंचायत बैठकीत निर्णय घेऊन प्रस्ताव सादर करावा लागेल बाळासाहेब वडजे (नगराध्यक्ष अकोले नगर पंचायत ) कोट - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत प्रकल्प वसाहतीतील सांस्कृतिक भवन दुरुस्ती व गटार पाईप लाईनसाठी १५लाख ७५हजाराचा निधी वर्ग केला आहे .त्यातून सांस्कृतिक भवनाचे पत्रे बदलणे व इतर कामे झाली आहेत ,नगरपंचायतीच्या माध्यमातून ही कामे होणे आवश्यक आहे . डॉ किरण लहामटे (विधानसभा सदस्य )

No comments:

Post a Comment